tag:blogger.com,1999:blog-3384574592494037302024-03-05T13:26:59.933+05:30सुरुवात...दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...Unknownnoreply@blogger.comBlogger45125tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-9123418098380277952011-01-02T15:33:00.004+05:302011-01-12T17:48:53.462+05:30वेळेचे नियोजन<div class="separator" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><span id="goog_815531473"></span><img border="0" height="150" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWmDqLHWA0djjry8OnocxDy_cBdGwJ9I89o7l2RrVCdR-_kpNEIJiY0vYL7sAAGpTzUI0X5hG88T_O72Oz3qZOgDVz6AYdHNvsR5kQ5WAX1-_yeAHADLEZHlfwGvIVaGZIry936bvn0hIC/s200/to-do_completion.jpg" width="200" /><span id="goog_815531474"></span></div>हं, तर नवीन वर्षाला सुरुवात झालीय म्हणायची. गेल्या दशकात अशा कित्येक महत्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यात घडून गेल्या असतील ज्यांमध्ये तुमचा राहिलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग तुम्ही हयात असेपर्यंत कधीच विसरु शकणार नाहीत. बहुतेकदा अशा घटनांच्या परिणामांचे स्वरुप—प्रचंड आनंद, रंगतंद्रीमय सुखातिरेक, भयानक, पार दुःखाच्या डोहात बुडल्याची जाणीव, भावशून्यता, नैराश्य असे काहीसे असते. अशा गोष्टींबद्दल विचार करताना मग लगेच असा प्रश्न किंबहुना मस्तकी चमकून जातो की या सर्व गोष्टींमागचे कारण तरी काय, का असे अनुभव अनुभवायला मिळतात, कशामुळे? विचार करायला बसले की अनन्य प्रश्न समोर उभे ठाकतात आणि ते तुम्हाला स्वतःला उत्तरे माहित नसताना देखील एकामागोमाग एक अशा प्रकारे मुळ प्रश्नाला लागूनच असलेल्या अतिशय कठिण प्रश्नांचा भडिमार तुमच्यावर करण्यास सुरुवात करतात. हीच बाब माझ्या बाबतीत घडली. नववर्षाचा रम्य स्वागत सोहळा अनुभवण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. आता केवळ काही दिवसांच्या सुट्ट्यानंतर चालू होणारे सेमिस्टर माझ्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे याची पुरती जाणीव मला झालेली आहे, अन् त्याचाच परिणाम म्हणजे गत घटनांपासून, पूर्वी केलेल्या गत कर्मांपासून काही तरी शिकायचे—अशी बनलेली मानसिकता; झाले "मी पणा"चे भान देखील मी विसरत गेलो, निराशेचे सूर माझ्या एकूणच हालचालींवरुन समोरच्याला स्पष्ट दिसत असावेत. ही बाब बहुतेकांनी हेरली, सोमेश दादाने याची दखल घेत मला "<a href="http://www.cs.cmu.edu/%7Epausch/" target="_blank">रँडी पॉश् <img src="https://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/extlink.png" /></a>" या आजतागायत मला माहित नसलेल्या व्यक्तिबद्दलची व त्यांच्या लेक्चर्सविषयी माहीती पुरविली. सोमेश दादाला तुम्ही [<a href="http://thelife.in/" target="_blank">या <img src="https://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/extlink.png" /></a>] त्याच्या संस्थळावर त्याने अतिशय काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक पद्धतीने बनवलेल्या माइंड मॅप्सवरुन बहुधा आधीपासूनच ओळखत असाल. <br />
<br />
<br />
अवघ्या काही तासांतच मी रँडी पॉश् यांचा चाहता झालो. अगदी साध्या-साध्या घरगुती उदाहरणांचा प्रत्यय देत त्यांनी आजवर लक्षावधी लोकांच्या जीवनात हर्ष रुपी बीजे पेरण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे, पॉश् हे स्वतः संगणक क्षेत्रातील प्रख्यात अभियंते आहेत; त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे प्रभावी वक्तृत्व व संभाषण कौशल्य—ऐकणाऱ्या रसिक श्रोत्याला हसवत-खेळत ठेऊन मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्याकडे अथांग शक्ती आहे. पॉश् यांच्याबद्दल अधिक माहीती गोळा करीत असताना त्यांचे "<a href="http://video.google.com/videoplay?docid=7653564598486729089#" target="_blank">टाइम मॅनेजमेंट <img src="https://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/extlink.png" /></a>"वरील लेक्चर पाहण्यात आले, एकूणच एन्जॉय करण्यासारखे आहे ते! या लेक्चरमधील त्यांनी समजावलेले "स्टीफन कॉव्हेचे फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स" मला अधिक भावले. वरील परिच्छेदातील सुरुवातीच्या ओळींत ज्या प्रश्नांचा मी उहापोह केला आहे, त्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे शोधण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन आपल्या हाती लागले आहे, अशी मला पक्की खात्री झाली.<br />
<a name='more'></a><br />
दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या कामांची आपल्या पुढ्यात रोज रेलचेल असते. यातील कुठले काम तुम्ही पहिले निवडता व कुठले त्यानंतर, यावर पुढील परिणाम अवलंबून असतात, या परिणामांची परिणीती प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे असते. तेव्हा याबाबतीत काळजीपूर्वक अभ्यास करण्याची गरज भासते. कॉव्हेने त्याच्या "सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" या पुस्तकात अशी दैनंदिन कामे कोणती-कोणती असतात आणि त्या कामांना निवडताना विभागणी कशी करावी यासाठी "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स" दिले आहे. १, २, ३, ४ असे चार साचे (प्रकार) असलेल्या तक्त्यात कॉव्हे कामांची विभागणी करतो. कॉव्हेच्या मते आपल्याला करावयाची दैनंदिन (किंवा निश्चित कालावधीसाठीची) कामे ही या चार प्रकारांत मोडतात. हे चार प्रकार खालीलप्रमाणे आहेत:<br />
<blockquote>१. अतिशय महत्वाची अन् तातडीची कामे<br />
२. महत्वाची पण तातडीची नसलेली कामे<br />
३. महत्वाची नसलेली पण तातडीची कामे<br />
४. महत्वाची अन् तातडीची नसलेली कामे</blockquote><br />
या "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"चे स्वरुप खालील तक्त्यावरुन स्पष्ट होईल,<br />
<br />
<div style="text-align: center;"><b style="color: #741b47;">तक्ता १</b>: <i>कॉव्हेचे "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"</i></div><table align="center" border="1" cellpadding="2" cellspacing="0" style="height: 258px; width: 400px;"><tbody>
<tr><td align="center" bgcolor="#ffa7af" width="130"><br />
</td> <td align="center" bgcolor="#ffa7af" width="130"><table style="height: 51px; width: 141px;"><tbody>
<tr></tr>
<tr><td><b>तातडीचे असलेले</b></td></tr>
</tbody></table></td> <td align="center" bgcolor="#ffa7af" width="130"><b>तातडीचे नसलेले</b></td> </tr>
<tr> <td align="center" bgcolor="#ffa7af" height="100" valign="middle"><b>महत्वाचे<br style="font-weight: bold;" /><span style="font-weight: bold;">असलेले</span></b></td> <td align="center" valign="middle">१ <b><br />
</b><b>⟹</b></td> <td align="center" valign="middle">२<br />
<b>⟹</b></td> </tr>
<tr> <td align="center" bgcolor="#ffa7af" height="100" valign="middle"><b>महत्वाचे<br style="font-weight: bold;" /><span style="font-weight: bold;">नसलेले</span></b></td> <td align="center" valign="middle">३<br />
<b>⟹</b></td> <td align="center" valign="middle">४</td> </tr>
</tbody></table><br />
याच तक्त्याला एका हाताशी धरुन मी खालील माइंड मॅप बनवला आहे. या माइंडमॅपमध्ये वेळेचे नियोजन करताना मला ज्ञात असलेल्या बहुतेक कामांचे चार प्रकारांत वर्गीकरण केले असून प्रत्येक प्रकारातील कामे उरकल्यानंतर त्यांचे काय परिणाम होऊ शकतात/होतात, याची माझ्यापरीने मीमांसा केली आहे. कॉव्हेच्या मतानुसार—जर सर्वकाही सुरळीत राखायचे असेल तर ही कामे अनुक्रमे प्रकार १, त्यानंतर २, त्यानंतर ३ आणि वेळ असलाच तेव्हा शेवटी प्रकार ४ यानुसार पार पाडावीत; असा क्रम अवलंबण्याने जीवनात मानसिक, आर्थिक व प्रपंचिक समतोलत्व राखले जाऊन लक्ष्यित उद्दिष्टांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.<br />
<br />
<div style="text-align: center;"><b style="color: #741b47;">चित्र</b>: <i>वेळेच्या नियोजनासाठी कॉव्हेच्या "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"वर आधारित माइंड मॅप</i></div><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwDg04kMk4F4zU_TGza4qV37txc8O2Q3rtvDg6JNLEyhzzg6f0uqDeJHX_MStnyby5XKz2jKQrITTepXqkmrW_i4RVjzLKh5_4xf4LVEgHhzS0NDEPDQ6YHX0Bv9SDpZVPMu2xhrKiXknl/s1600/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%25E0%25A4%259A%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AF%25E0%25A5%258B%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8.png" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;" target="_blank"><img border="0" height="310" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwDg04kMk4F4zU_TGza4qV37txc8O2Q3rtvDg6JNLEyhzzg6f0uqDeJHX_MStnyby5XKz2jKQrITTepXqkmrW_i4RVjzLKh5_4xf4LVEgHhzS0NDEPDQ6YHX0Bv9SDpZVPMu2xhrKiXknl/s400/%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2587%25E0%25A4%259A%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AF%25E0%25A5%258B%25E0%25A4%259C%25E0%25A4%25A8.png" width="400" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">माइंडमॅप स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर क्लिक करा</td></tr>
</tbody></table><br />
या माइंडमॅपची संक्षिप्त स्वरुपातील रुपरेषा खालीलप्रमाणे आहे; या रुपरेषेच्या आधारे कामांची विभागणी आणि त्यांचे परिणाम—या गोष्टींचे आकलन होण्यास मदत होईल. प्रत्येक प्रकारातील कामांचे स्वरुप व त्यांच्या परिणामांचे स्वरुप—यावर बरेच काही लिहिता येईल, पण लेखाचे समतोलत्व (!) राखण्यासाठी तूर्तास तत्सम् खंड मी वगळण्याचा निर्णय घेत आहे, तरीही माइंड मॅपमधील वर्गवारी बद्दल काही शंका उद्भवल्यास त्यावर आपण नक्कीच चर्चा करु.<br />
<br />
<div style="text-align: center;"><b style="color: #741b47;">आराखडा</b>: <i>वेळेच्या नियोजनासाठी कॉव्हेच्या "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"वर आधारित माइंड मॅपची रुपरेषा</i></div><blockquote>✔ <b>वेळेचे नियोजन</b><br />
<br />
<i><b>१) अतिशय महत्वाची अन् तातडीची कामे</b></i><br />
» आणीबाणीची वेळ, निर्णायक स्थिती, पेचप्रसंग, संकटसमय इत्यादी <br />
» कालमर्यादा असलेले प्रकल्प, प्रोजेक्ट्स <br />
» दूरध्वनीद्वारे, टपालाद्वारे वा विपत्रांद्वारे करावयाची निकडीची संभाषणे, चर्चा <br />
<i>☛ <b>परिणाम </b></i> <br />
»» ताण, चिंता <br />
»» जळफळाट, चिडचिड <br />
»» मानसिक संतुलन बिघडणे <br />
»» अशा कामांत मग्न असताना अथवा ती झाल्यानंतर काही (वा बराच) काळ रागावलेले राहणे <br />
<br />
<i><b>२) महत्वाची पण तातडीची नसलेली कामे</b></i> <br />
» प्रतिबंधात्मक वा निवारणासाठी असलेली <br />
» स्व-सामर्थ्यशक्तित सुधारणा व शरीरसौष्ठवाबाबतची काळजी <br />
» आजवर अज्ञात असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेणे <br />
» नवीन नाते, संबंध जुळवणी <br />
» उपलब्ध झालेल्या नवीन संधींचा वेध घेणे <br />
» कामाचे स्वरुप समजण्यासाठी व पायाबांधणीसाठी योजना तयार करणे <br />
» मनोरंजन, करमणूक<br />
<i><b> ☛ परिणाम </b></i> <br />
»» नंतरच्या काळात चांगले फायदे मिळण्याची जास्त संधी <br />
»» मनाची दूरदृष्टित्मक जडणघडण <br />
»» कुठल्याही गोष्टीकडे/प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रवृत्ती, मनाची भूमिका, कल यांत बदल <br />
»» व्यवहारात व घरगुती/सामाजिक जीवनात समतोलपणा राखण्यात मदत <br />
»» स्वतःहून शिस्त लावून घेतली जाते वा लागते <br />
»» कुठल्याही घटनेनंतर मनावर अपेक्षित नियंत्रण, संयम राहण्यास मदत <br />
»» पेचप्रसंग उद्भवण्याचे प्रमाण कमी <br />
<br />
<i><b>३) महत्वाची नसलेली पण तातडीची कामे</b></i><br />
» चालू कामात व्यत्यय आणणारी, अटकाव करणारी अचानक येऊन टपकणारी कामे <br />
» तातडीची (बहुधा मदतीसाठी असणारी) हाक वा विनंती <br />
» आकस्मिकपणे येणारी टपालपत्रे, विपत्रे, अहवाल, प्रोजेक्ट्स, फोन कॉल्स इत्यादी <br />
» काही बैठकी <br />
» हितसंबंध जुळलेल्या असणार्या अगदी जवळच्या, सलोख्याच्या गोष्टींच्या वा व्यक्तिंबाबतच्या समस्या, संकटमय परिस्थितीशी निगडीत <br />
» (बहुधा समाजात वा घराबाहेर) घडणार्या लोकप्रिय, प्रभावशील घटना/हालचाली<br />
<i><b>☛ परिणाम </b></i> <br />
»» आपल्यावर अन्याय झाला आहे, केवळ आपल्यालाच जाणूनबुजून फसवले गेले आहे असे वाटणे <br />
»» परिस्थिती हाताबाहेर जाणे <br />
»» शॉर्ट टर्म फोकस <br />
»» पेचप्रसंग सोडवण्यासाठी अशा आकस्मिक घटनांचा वापर करुन भावी आयुष्यासाठी योग्यरीतीने नियोजन करता येऊ शकते <br />
»» हं, एका रात्रीत नावलौकिक, कीर्ती, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त होऊ शकतो <br />
»» रंग बदलणार्या सरड्याप्रमाणे सारखी विचार(निष्ठा) बदलण्याची प्रवृत्ती विकसीत होऊ शकते <br />
»» आपली लक्ष्ये, ध्येये, उद्दिष्ट्ये निरुपयोगी आहेत, असे पाहिले जाते <br />
»» नाते, संबंध यांत तणाव निर्माण होऊ शकतो किंवा ते तुटू देखील शकतात<br />
<br />
<i><b>४) महत्वाची अन् तातडीची नसलेली कामे</b></i><br />
» गांभीर्य नसणारी, क्षुद्र, क्षुल्लक, नीरस कामे/हालचाली<br />
» व्यग्र करणारी वा वेळेचा विनाकारण अपव्यय करणारी व्यर्थ कामे वा हालचाली<br />
» आलेली विपत्रे, टपालपत्रे <br />
» काही फोन कॉल्स<br />
» वेळेचा कायम अपव्यय करणारे लोक, गोष्टी <br />
» आनंददायक, सुखकारक वा आल्हाददायक<br />
<i><b>☛ परिणाम </b></i> <br />
»» अगदी बेजाबाबदार होणे <br />
»» कुठल्याही कामासाठी हात झटकणे वा त्यापासून मागे हटणे <br />
»» कामावरुन किंवा प्रसंगी नोकरीवरुन वा संस्थेतून पायउतार होऊ शकण्याचे वा हकलले जाण्याचे चान्सेस <br />
»» अगदी मुलभूत गरजांसाठी/गोष्टींसाठीदेखील इतरांवर वा संस्थेवर विसंबून राहण्याची सवय जडू शकते</blockquote><br />
वरील माइंड मॅपचे निरीक्षण करत असताना तुम्हाला प्रत्यय आला असेलच की बहुधा आपण बरेचदा महत्वाचे नसलेले व/वा तातडीचे नसलेले कामे प्रथम निवडतो, ती उरकल्यानंतर अगदी थोडा वेळ समाधान लाभते खरे, पण त्यानंतर अतिमहत्वाची व/वा तातडीची कामे हाताळताना मात्र आपला जीव मुठीत धरुन कुठल्याही परिस्थितीत ती पार पाडावीच लागतात. याचा परिणाम म्हणजे दिवस अखेर आपले मानसिक संतुलन बिघडते, व एकूणच परिस्थिती हाताबाहेर गेल्याची आपल्याला जाणीव होते. कॉव्हेच्या यावर मात करण्यासाठी सोपा उपाय सुचवतो तो असा—ही कामे १, २, ३, ४ अशा क्रमानेच करावीत, तुम्हालाही असेच वाटत असेल, नाही? तर मग लगेच २ x २ चा तक्ता असलेली अशी टू-डू लिस्ट बनवा व आपल्यापाशी असलेल्या अमूल्य वेळेचे योग्य रीतीने नियोजन करा!<br />
<br />
<b><span style="color: #741b47;">काही टीपा</span>:</b><br />
१. वरील माइंडमॅपवरुन एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की प्रकार ३ मधील अगदी आकस्मिक येऊन टपकणार्या कामाच्या (कामांच्या) ओझ्यामुळे जी अतिमहत्वाची कामे असतात, ती विसरली जाण्याचे चान्सेस फार जास्त असतात, तेव्हा जरा जपून!<br />
<br />
२. सोमेश दादाने काही महिन्यांपूर्वी "<a href="http://thelife.in/?p=612" target="blank">पर्सनल डिझास्टर प्लॅन <img src="https://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/extlink.png" /></a>"चा माइंड मॅप बनविला होता, त्यामध्ये त्याने "लक्षात ठेव" या मुद्द्यामध्ये "स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात सतत व्यग्र ठेव" असे सांगितलेले आहे. पण वरील माइंड मॅप मध्ये मला ही गोष्ट इतर कामांचा प्रभाव बघता थेट ४ थ्या प्रकारात फेकावी लागली—यासंबंधी काही शंका असतील तर कळवाव्यात. <i>(खालील चित्र पहा)</i><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" height="160" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2NfSyVlMzG1CvmuUfN3VleDxj-_7QpRrNztxzpmRdCo4eM8XOHH8gXkxAiNQWCxALMGa4NDid0VVduuHA8XajFE6LtxWpa1_GlzaUhIGogWfE2dbSToACt-kfvXiAFeX-6ydbS3yBnFR3/s400/cite_crop.png" width="400" /></div><br />
<br />
<i style="color: #666666;"><b>दुरुस्ती</b></i><span style="color: #666666;">: वरील चित्रातील (आणि माइंडमॅपमधील) उठून दिसणारा शब्दप्रयोग असा वाचावा: "व्यग्र करणारी वा वेळेचा विनाकारण </span><b style="color: #666666;">अपव्यय</b><span style="color: #666666;"> करणारी व्यर्थ कामे वा हालचाली"</span><br />
<br />
---<br />
<br />
<br />
असंच याबाबतीत आणखी माहीती मिळविण्याच्या उद्देशाने आंतरजालावर भटकत असताना [<a href="http://www.markforster.net/blog/2007/2/15/the-four-quadrants-a-different-version.html" target="_blank">हा <img src="https://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/extlink.png" /></a>] लेख वाचनात आला. वेळेचे नियोजन करीत असताना कॉव्हेच्या क्वाड्रंटपेक्षा अगदी तसाच पण जरा निराळा असणारा "<a href="http://www.amazon.co.uk/gp/product/0007190352?ie=UTF8&tag=markforstthet-21&linkCode=as2&camp=1634&creative=6738&creativeASIN=0007190352" target="_blank" title="The On-time, On-target Manager (One Minute Manager)">केन ब्लेंचर्ड <img src="https://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/extlink.png" /></a>"चा क्वाड्रंट अधिक प्रभावी असू शकतो, असे प्रतिपादले आहे. या क्वाड्रंटचे साधारण स्वरुप खालील तक्त्यावरुन स्पष्ट होईल,<br />
<br />
<div style="text-align: center;"><b style="color: #741b47;">तक्ता २</b>: <i>केन ब्लेंचर्डचे "फोर क्वाड्रंट मॅट्रिक्स"</i></div><table align="center" border="1" cellpadding="2" cellspacing="0" style="height: 258px; width: 400px;"><tbody>
<tr><td align="center" bgcolor="#c8e4ff" width="130"><br />
</td> <td align="center" bgcolor="#c8e4ff" width="130"><table style="height: 51px; width: 141px;"><tbody>
<tr></tr>
<tr><td><b>Want to do</b></td></tr>
</tbody></table></td> <td align="center" bgcolor="#c8e4ff" width="130"><b>Don't want to do</b></td> </tr>
<tr> <td align="center" bgcolor="#c8e4ff" height="100" valign="middle"><b>Have a to do<span style="font-weight: bold;"><br />
</span></b></td> <td align="center" valign="middle">१ <b><br />
</b><b>⟹</b></td> <td align="center" valign="middle">२<br />
<b>⟹</b></td> </tr>
<tr> <td align="center" bgcolor="#c8e4ff" height="100" valign="middle"><b>Don't have to do<span style="font-weight: bold;"><br />
</span></b></td> <td align="center" valign="middle">३<br />
<b>⟹</b></td> <td align="center" valign="middle">४</td> </tr>
</tbody></table><br />
वरील तक्त्याचे निरीक्षण केले असता असे दिसेल की आपण सामान्यतः १, ३, २ अशाप्रकारे कामांचा अवलंब करीत असतो. याचा परिणाम म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करावयाची निकड नाहीये त्या पहिले केल्या जातात, उलटपक्षी ज्या करणे अतिशय निकडीचे आहे त्या गोष्टी मात्र अपूर्णच राहतात. ब्लेंचर्डच्या मते, यावर मात करण्यासाठीचा एकदम सोपा व सोयिस्कर उपाय म्हणजे १, २, ३, ४ या क्रमाने कामांचा अवलंब करणे.<br />
<br />
<blockquote>एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्यावी, ती म्हणजे—तुम्ही काहीही करु शकता पण सर्वकाही करु शकत नाही. (~ अनामिक)</blockquote><br />
---<br />
<br />
<blockquote><div style="color: #274e13; font-family: Georgia,"Times New Roman",serif;"><b>अतिशय महत्त्वाची नोंद: </b></div>आत्ताच काही क्षणांपूर्वी<sup>[जानेवारी ३, २०११]</sup> सोमेश दादाने एक हृदय हेलावणारी खूप मोठी गोष्ट या लेखात दुरुस्त करायला सांगितली, ती म्हणजे—<i>"रँडी पॉश् हे आता हयात नाहीत."</i> :( <br />
[त्यांच्या शब्दान्-शब्दाची खरी किंमत आता मला कळतीय. ही बाब हा लेख लिहिण्यापुर्वी वा लिहून पूर्ण झाल्यानंतर अद्याप मला माहित नव्हती. या अशा माझ्या चुकीबद्दल क्षमस्व. प्रस्तुत लेखात त्यांच्याबद्दल उल्लेख केलेल्या सर्व घटना गतकाळातील आहे, याची वाचकांनी शेवटी नोंद घ्यावी.]<br />
सर्वांना आवाहन आहे की त्यांचे पुस्तक <i>"दि लास्ट लेक्चर"</i> यावरील [<a href="http://www.youtube.com/watch?v=ji5_MqicxSo" target="_blank">ही</a>] चित्रफीत अवश्य पहावी.</blockquote>Unknownnoreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-86483859674060606602010-12-29T08:55:00.000+05:302010-12-30T10:11:34.656+05:30मागे वळून पाहताना...<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><img align="center" alt="मागे वळून पाहताना..." height="300" src="http://lh4.ggpht.com/_fwez--bKPlQ/TN-aqqAqHVI/AAAAAAAAAdM/uGmEWOXXJXQ/s400/DSC01885.JPG" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="400" /></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><i>मागे वळून पाहताना...</i></td></tr>
</tbody></table><br />
आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "<a href="http://vishaltelangre.blogspot.com/2010/01/blog-post.html">नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन</a>" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्याप्रमाणे मनाच्या अदृश्य पटलावर भरधाव वेगाने असंलग्न शृंखलेतील पताक्यांप्रमाणे अवतरायला लागली.<br />
<br />
ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या जीवनात काहीही न म्हणण्यापेक्षा "जैसे थे!" घटनांचा प्रभाव होता, असं माझं अन् माझ्या स्वार्थी मनाचं मत; याबाबतीत दोहोंपैकी का कुणाचं दुमत नाही, तेच उमगत नाहीये, असो. कॅन्टीनमध्ये साजरा केलेला वाढदिवस, त्यानंतर त्याच दिवशी रिजल्ट लागून फर्स्ट इयर क्लिअर केल्याची दूतर्फा आनंद देणारी बातमी; सगळं काही अगदी जसं हवं होतं तसंच घडलं. नंतरच्या काळात बाहेर भटकणं, बागडणं इत्यादी गोष्टी तर आल्याच. आमच्यासारख्या मतलबी लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही मिळणं वा तसं काही घडणं म्हणजे खूप अलौकिक बाब असते, हे सांगायला नको!<br />
<a name='more'></a><br />
ऑगस्टच्या सुरुवातीलाच आजवरची सर्वात मोठी घटना घडली, अगदी आकस्मिकच म्हणता येईल; घटनेचा एवढा परिणाम झाला की मी स्वतः माझ्यात एकाएक झालेले परिवर्तन (चमत्कारिक बदल!) अनुभवले. गेल्या काही दिवसांपर्यंत त्या घटनेच्या वेळेपासून मिळालेल्या प्रचंड रेट्यामुळे मी प्रभावित झालेलो होतो, मात्र आता सरत्या काळानुरुप व इतर अनेक बाह्य बलांचा रोध सहन करीत तो प्रभाव ओसरत चाललाय; संपूर्णतः मावळणार मात्र नक्कीच नाही, हं कदाचित मीच स्वतः त्या गोष्टीसाठी कारणीभूत असेन. या मध्यंतरीच्या काळात मी अद्यतनीत केलेले वा लिहिलेले काही ठराविक ट्विट्स, लेखन इत्यांदीवरुन या उतार्याचे आकलन होऊ शकेल, असे मला वाटते. ;)<br />
<br />
क्षणा-क्षणांत अनुभव लपलेले असतात, याच गत अनुभवांवरुन स्वतःला सुधारण्याची प्रवृत्ती माझ्या अंगी आहेच. शिवाय अनुभवांवरुन कुठलाही जीव शिकतो अन् त्याला हवे असलेले वा गरज असलेले बदल अंगिकारुन तो स्वतःचा उत्कर्ष साधत असतो; याची देखील मला प्रचिती आहे. या उक्तिंचे यापुढे अनुसरण करण्याचा माझा प्रयत्न असेल.<br />
<br />
वर्षाच्या सरतेशेवटी अनेक गतकालीन घटनांच्या बेरीज-वजाबाकीची उकल नोंदवताना इतरांना नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा दिल्यास स्वतःचा आनंद द्विगणित होतो अन् मन उल्हसित होते, याचा मला आत्ताच प्रत्यय आला; सो हॅव ए व्हेरी हॅपीऽ न्यू इ`यर टू ऑल ऑफ माइ ब्लॉग रीडर्स्! आपले प्रेम असेच दिवसेंदिवस वाढत राहील, ही सदिच्छा.<br />
<br />
<blockquote>मागे वळून पाहताना<br />
आठवतायत ते सुख-दुःखाचे अविस्मरणीय क्षण<br />
मन अंतरी विव्हळववणारे<br />
अशात नकळत गुलाब कधी उमलला<br />
याची जाणीव देखील नव्हती<br />
आपल्या आयुष्यात कधी असंसुद्धा घडेल<br />
असं वाटलं देखील नव्हतं<br />
असो, झालं ते गेलं<br />
पण आठवणी मात्र राहिल्या<br />
त्याच विचित्र आठवणींचा पूर आलाय आता<br />
त्या फुलणार्या फुलाबरोबर जगताना<br />
हं, सारं कसं असबंध वाटतंय आता<br />
आज मागे वळून पाहताना...</blockquote>Unknownnoreply@blogger.com2अज्ञात स्थान19.843904131706367 75.23609161376953119.823720631706365 75.206909113769527 19.864087631706369 75.265274113769536tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-60359546196195479192010-11-17T10:45:00.003+05:302010-11-24T09:56:53.126+05:30त्याग<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><img border="0" height="300" src="http://2.bp.blogspot.com/_fwez--bKPlQ/TN-Yf5jRVmI/AAAAAAAAAc4/5fd7VpwXKlk/s400/DSC01879.JPG" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="400" /></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">ही वाट दूर जाते...</td></tr>
</tbody></table><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><br />
पूर्वी त्याला सहजीवनाची तर सोडाच पण अगदी आप्तांमधल्या जन्मजात जुळलेल्या नात्यांची सुद्धा जाणीव नव्हती किंवा त्या नात्यांमध्ये स्वतःला गुंफून घेण्यासही तो कधी तयार होत नसे. "लाइफ इज सोऽ लॉन्ग..." अशी त्याची जीवनाबद्दलची भावना बनलेली होती. कौटुंबिक नि नैतिक हितसंबंध जपणे देखील त्याला जड जाई, अशा वेळी त्याची नेहमी पलायनाचीच भूमिका त्याच्या समोरच्याच्या नजरेत येत असावी कदाचित... त्याला या गोष्टीची जाणीव होती, पण मुळी ती गोष्टच आपल्यात कमतरता किंवा कमकुवतता (वीक पॉइन्ट) असावी, असे तो मनात आणून त्यावर पुढील वैचारिक मंथन करण्यासाठीची दरवाजे एकार्थी बंद करुन टाकत असे. असं असूनदेखील त्याने त्याच्या भवितव्याची स्वप्ने मात्र अशी उत्तुंग अन् अफाट रंगवली होती, जी इतरांनाच काय, पण स्वतः त्यालासुद्धा अविश्वसनीयच वाटायची. या काळात—निखळ मैत्रीची, एकमेकांत स्वैर गुंफलेल्या नाजूक नात्यांची किंवा एखाद्या प्रेमळ साथीदाराची मात्र त्याने कधीच स्वप्ने बघितली नाहीत वा त्याच्या नेहमी पडणार्या स्वप्नांत या गोष्टींना फारसे महत्वाचे स्थान नव्हतेच! अशी ही संकुचित भावना बाळगण्याचा त्याचा अट्टहास मनापासून मुळीच नव्हता, त्याने असं जगणं स्वतःहून अंगिकारलं देखील नव्हतं—मुळात त्याला या व अशा कित्येक गोष्टींची पुरती ओळख देखील झालेली नव्हती.<br />
<br />
<a name='more'></a><br />
आता कुठे त्याला आयुष्याच्या निराकार आभाळात जीवनाचा अन् त्याच आभाळात चहूबाजूंनी साकारलेल्या सप्तरंगी इंद्रधणुप्रमाणे स्वच्छंद व हर्षमयरित्या जीवन जगण्याचा आजवर अपरिचित असलेला खरा अर्थ उमगू लागला होता. सबबसुद्धा पूरक होती. एकाएकी शिशीरात ग्रीष्म बरसावा, अशा योगानेच घडणार्या चमत्कारिक घटनांसारखी घटना त्याच्या बाबतीत घडली. एकमेकांची कदर करणारे, एकमेकांबद्दल कसलेही संकुचित वा तत्सम् मत्सरयुक्त भाव मनी न बाळगणारे अन् सदैव मदतीस तत्पर राहणारे मित्र-मैत्रिणी त्याला मिळाले. किती आनंदाचे क्षण होते ते त्याच्या आजवर वाळवंटमय जगत असलेल्या जीवनात—अगदी एखाद्या सुगंधित व अतिशय मोहक अशा कमलपुष्पाने त्या रखरखत्या वाळवंटात उमलावे अशी! हो, आता तो त्याच्या पूर्वीच्या जगत असलेल्या जीवनाला "वाळवंट" म्हणू शकत होता अन् अगदी कमी काळात, याच मैत्रीच्या रिंगणात सर्वांचे हात आपल्या हाती धरुन, स्वच्छंद बागडता येईल अशा वातावरणात त्याच्यात नकळत अनेक मोठाले बदल घडून आले. जे अगोदरपासूनचे मित्र त्याच्या संगतीत अजुनही होते, त्यांच्याकडूनच या त्याच्यात एकाएकी घडून आलेल्या बदलांबद्दल त्याने ऐकले व तसे स्वतः अनुभवले देखील...<br />
<br />
त्याग, दुःख, दुरावा म्हणजे काय असते, यांचीच प्रचिती त्याला आता यायची शिल्लक राहिली होती. मित्र-मैत्रिणींच्या त्या घोळक्यातल्या एका जणाबद्दल त्याने आता स्वप्ने रंगवायला चालू केले होते, स्वतःहून नाही तर अनैच्छिकरित्या... प्रेम, तमा, जिव्हाळा, लळा, एकांत, कविता, सौंदर्य या नि अशा अनेक बाबींची उकल त्याला आता आपसूकच मिळत होती. दरम्यानच्या काळात त्याच मित्र-मैत्रिणींमधील निवडक जणांशी त्याचे जीवलग नाते जडले, ज्यांच्याकडे तो त्याच्या मनातल्या व त्याला सलत असलेल्या सार्या गोष्टी हलक्या करु शकत होता. त्याने या अशाच एका जीवलग मित्राकडे वरील "ती"च्याबद्दल कानी घातले, अन् तीच्यावर तो किती प्रेम करतो ते कळवले. पहिला धक्का—त्या जीवलग मित्राकडूनच कळाले की त्याच्याच मैत्र-रिंगणातल्या आणखी एकाचा, त्याच्याप्रमाणेच "ती"जवर जीव जडलाय, त्याने ते स्वतः अनुभवले देखील... त्याला नेमके कळून चुकले नि जाणवले की त्याच्यापेक्षा तो दुसरा, ज्याचासुद्धा "ती"जवर जीव जडलाय, तो त्याच्यापेक्षा अधिक प्रेम करतो, तो "ती"ला अधिक शोभेल, तो त्याच्यापेक्षा अधिक हूशार आहे, इत्यादी इत्यादी... त्याग काय असतो, याचा त्याला त्यावेळी प्रत्यय आला. मैत्र-रिंगणातील "त्या" निवडक जीवलग मित्र-मैत्रिणींशी अनेक बाबींवर चर्चा-विनिमय करुन त्याने पहिल्यांदा, अतिशय जीव जडलेल्या "ती"चा त्याग केला, फक्त मैत्रीसाठी! दुःख त्याने पहिल्यांदा मनापासून सोसले, पण फक्त काही काळापुरतेच!<br />
<br />
पहिल्या धक्क्यातून स्वतःला सावरतांना तो पुरता हतबल झाला होता, त्याला आता कुठल्याही गोष्टीत रसच उरला नव्हता. फुलांच्या मखमली अंथरूणावर झोपून देखील त्याला काटे रुतण्याचा भास होई. सर्व काही उदास, भकास असे त्याचे आता जीवन जगणे चालू होते. नेमकी त्याच काळात आणखी एक घटना घडली. जरी पहिले प्रेम हे "प्रेम" असते, असे लोक म्हणत असले तरी त्याला हे दुसरे प्रेम अधिक स्मरणात राहील. मैत्र-रिंगणातील "त्या" काही निवडक मैत्र-मैत्रिणींमधल्या दोघींची "ती" जीवलग मैत्रिण, जी त्यांच्या ग्रुपमधली नव्हतीच... योगायोगच होता तो, त्यावेळी त्याने पाहिले, तो "ती"च्याशी थोडा बोलला, अन् मग काय—हरपला देखील... यावेळी त्याचा आनंद द्विगुणीत होता, तो त्यावेळचे गुलकंदाने भरलेले सुखद क्षण आठवून-आठवून हर्षाने वेडापिसा झाला होता, कावरा-बावरा होऊन दिवास्वप्नांमध्येदेखील "ती"च्या सवे नांदण्याचे क्षण उपभोगत होता. पहिल्या प्रेमापेक्षा हे दुसरे प्रेम त्याला अधिक पटले. आतापर्यंत त्याने ही "बाब" कोणाकडेच बोलून दाखवली नव्हती किंवा तसे भावसुद्धा चेहर्यावर झळकू दिले नव्हते, यद्यपि, सगळ्यांना नसले तरी त्याच्या "जीवलग" मित्रांना मात्र त्याच्यात असा अचानक काय उत्साह संचारलाय हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्याने त्याच्या व "ती"च्या "त्या" दोघी जीवलग मैत्रिणींकडे मनातले भाव अगदी तन्मयतेने हळूवारपणे बोलून दाखवले. ऐकताच त्या दोघी तर डोळे विस्फारुन त्याच्याकडे तोंडाचा "आऽऽ" वासून बघत किंचित हसल्याच... दुसरा धक्का—त्यांच्याकडून कळाले, अरे बाबा, "ती"ला तीच्या घरी पाहुणे पाहून गेलेत, "ती"चं लग्न ठरलंय! तु खूप उशीर केलास रे... किऽतीऽ जड शब्द होते ते, त्याला त्याक्षणी ते पेललेच नाही. पुढे काही बोलायला उरलेच नव्हते, अनंत हुंदके भरुन आल्यामुळे कंठ दाटून आला होता, शब्दांना बाहेर पडायला जागाच उरली नव्हती, डोळे टचकन् पाणावले, तो तसाच कसाबसा घरी परतला. त्याच्या चेहर्यावर "विरहा"चे चिंतायुक्त भाव स्पष्ट झळकत होते. "त्या" दोघी व आणखी एका जीवलग मित्राने त्याला बरेच समजावले, विविधांगी पैलूंवर चर्चा-मसलत झाली, हे केल्याने काय होईल, तश्याने काय होईल, इत्यादी इत्यादी... त्याने "तीज"वर मनापासून अन् खरेखुरे प्रेम केले होते, तीच्या बाबतीत किंचितदेखील अनिष्ट वा "ती"ला थोडादेखील त्रास होईल, असं काहीही करण्यास तो तयार झाला नाहीच आणि कधीच तयार झालादेखील नसता... त्याला "ती"ची जास्त काळजी होती, आणि अखेर त्याने तेच केले, जे त्याला योग्य वाटले. "त्याग"...! हो, त्याग, दुसर्यांदा प्रचंड दुःख पचवत त्याने "त्याग" करण्याचा/पत्करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचे सारे पुलकित जीवन, जे त्याने मध्यंतरीच्या काळात आनंदाने जगले होते, ते सारे अंधुकमय झाले होते. नियती त्याच्याशी कसे हे "सुख-दुःखाचे खेळ" खेळते आहे, हे मंथन करतांना त्याला संदीप खरेच्या खालील कडव्यांची आठवण होई, जी त्याच्याबाबत घडत असलेल्या घटनेशी अगदी जुळत होती:<br />
<blockquote><br />
हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...<br />
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...<br />
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...<br />
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...<br />
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...</blockquote><br />
<br />
मधल्या काळात त्याने कितीतरी कविता अवतरविल्या होत्या, पण या दुःखाच्या आक्रोशात त्या सर्व विरुन गेल्या, त्यामुळेच की काय आता त्याला इतरांच्या कवितांकडे बघावे लागत होते!<br />
<br />
त्याला अखेर ती बातमी कळाली, "ती"चे लग्न, हो लग्नच... पार पडणार आहे,पार पडत आहे, आनंदात पार पडले... त्याने सुटकेचा निःश्वास टाकला... त्याने त्यावेळी घेतलेल्या "त्यागा"च्या निर्णयामुळेच तो आज स्वतःला कोणाच्याही मदतीशिवाय सावरु शकत होता व यापुढेही त्याला तशी कोणाच्याही सांत्वनाची गरज भासणार नव्हती. त्याच्या "त्या" निर्णयामुळे "ती"ला त्याच्याकडून किंवा त्याच्यामुळे मुळात काहीच कष्ट वा त्रास झाला नाही व होणारही नाही, या भावनेनेच डोळ्यांत पाणी तरतरतं ठेऊन बळजबरीने तो हसण्याची जणू नाट्यमय-क्रिडाच करतोय व मनातल्या-मनात "क्षण" चित्रपटातले एक गाणे घोळत आहे:<br />
<blockquote><br />
जरी दूर तू गं, तरी ना दुरावा...<br />
तुला आठविता, तुझा गंध यावा...<br />
सुखाचा तुझा, गोड संसार व्हावा...<br />
हीच प्रार्थना—ईश्वराला...</blockquote><br />
<br />
स्वैर गुंफलेल्या नात्यांमधली गुंतागुंती त्याला आज उमगलीय, त्याने अनुभवलेल्या घटनांवरुन तरी तो आता बरंच काही शिकला आहे.Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-57803732808654816562010-11-02T07:40:00.002+05:302010-11-20T00:56:42.936+05:30विचित्र स्वप्नानुभव किती अफाट हे वाळवंट... जिकडे नजर टाकावी, तिकडे वाळूचे उंचच-उंच डोंगर... गेल्या दोन-तीन तासांपासून मी सलग, कुठेही न वळता चालतोय... वर तळपता सूर्य, तहानेने अगदी व्याकूळ झालोय... व्याकूळ म्हणजे कंठ एखाद्या दुष्काळग्रस्त झर्याप्रमाणे कोरडा पडलाय, अगदी दयनीय अवस्था... ओसाड, पडीक, वाट नसलेल्या वाळवंटामधून वाट काढत मी चालतोच आहे. मी इथे का, कसा, व नेमका कशासाठी आलो—सगळे प्रश्न निरुत्तरित, माझे मलाच उत्तर मिळत नाहिये... आता माझ्यापुढे फक्त एकच ध्येय उरलंय, ते म्हणजे या अत्यंत उष्ण अन् रेताड नरकातून कसल्याही परिस्थितीचा सामना करीत बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच... मला वाळवंटात असणार्या नंदनवनाबद्दल म्हणजेच ओअॅसिस बद्दल माहिती आहे, म्हणजे मी त्याबाबत कुठेतरी, कुणाकडूनतरी ऐकलंय... त्याच्याच शोधार्थ मी आता पायपीट करीत, सूर्य मावळतीच्या दिशेने वाळूचे एक-एक डोंगर पादाक्रांत करीत चालतोच आहे. एव्हाना प्रचंड तळपणारा सूर्य आता मावळतीच्या दिशेने जात असतांना फारच विलोभनीय दिसतोय, ना का माझ्या मनात त्याच्याबाबत तिटकारा व्यक्त होईल असा भाव निर्माण झाला असला तरी... सृष्टीचे असे हे भावविभोर करुन टाकणारे सालस, मनमोहक दृश्य पाहण्याचा योग सगळ्यांच्याच नशिबात नसतो, त्यामुळे त्या सूर्याबाबत मी आज बाळगत असलेला द्वेष टाकून दिला. थंडी वाढत चाललीय... मनात काहीतरी विचार चालू आहे, कसला ते मात्र माहिती नाही... डोक्यात असेच काही-बाही विचारांचे चक्र चालू असतांनाच मला कसलातरी पूर्वपरिचित आवाज अगदी पुसटश्या स्वरुपात ऐकायला आला. पहिल्या क्षणी तरी तो केवळ घायाळ झालेला मनाचा भ्रम असावा, असे मानून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण जसजसे मी समोर जाऊ लागलोय, तसतसा तो आवाज अधिकच स्पष्ट, सुस्पष्ट होत येतोय... अरेच्चाऽऽ, देव पावला म्हणायचा... हा गाडीचाच आवाज, त्यातील जोडपं हसत-खिदळत माझ्याच दिशेने येतंय... एरवी त्यांच माझ्याकडे लक्ष नव्हतं, मी अगदी मधोमध, त्यांच्याच वाटेत थांबलेलो... जर त्यांचं माझ्याकडे अजुनही लक्ष गेलं नसेल, तर मी नक्कीच यांच्याच गाडीखाली चिरडला जाईल, हा विचार डोक्यात एकाएकी चमकून गेला अन् माझा तर थरकापच उडाला... मी संपुर्ण शक्तिनीशी जोरात किंचाळलो... माझं नशीबच बलवत्तर म्हणावं लागेल... अवघ्या काही फुटांवर असतांना माझा कर्कश आवाज ऐकून त्यांनी गाडी लागलीच थांबवली... उष्णता, भूक, तहान, थंडी इत्यादींमुळे माझ्या जीर्ण झालेल्या शरीरयष्टीकडे बघून त्यांना माझ्याबाबत अंदाज बांधायला जास्त वेळ लागला नसावा... त्या जोडप्याने त्यांच्याकडील पाणी असलेली बाटली घेऊन ते खाली उतरणार... नि एवढ्यात... माझ्या पायाला काही वेळेपासून काहीतरी हालचाल मला जाणवत होती, पण आता आपण या भकास व निर्मणुष्य वाळवंटातून सुखरूप वाचणार या आनंदात मी एवढा बूडून गेलो होतो की त्या हालचालीकडेदेखील मी पुर्णतः दुर्लक्ष केले होते. ते जोडपे गाडीतून खाली उतरते नि उतरते...<br />
<a name='more'></a>ती मुलगी माझ्या पायाकडे पाहून अक्षरशः किंचाळलीच... ती माझ्या पायांकडे तीच्या हाताचे बोट रोखून अचानक स्तब्ध व निःशब्द झाली... तीच्या प्रियकराने देखील अक्षरशः तोंडाचा 'आ' वासला... मी तर या युगुलाकडे पाहून आधीच हैरान झालोय, नंतर त्यांच्या नजरेच्या दिशेने माझ्या पायांकडे मी कटाक्ष टाकतो नि टाकतो... तोच... मी देखील टाहो फोडला... एका भला आडदांड, काळाकुट्टं साप (कोणता ते मात्र आठवत नाहिये) माझ्या उजव्या पायाच्या पोटर्यांवर एका मागोमाग एक असे दंश करतच चाललाय... मला याचे भानच नाही... तरीदेखील माझे प्राण वाचवण्यासाठी कशाचीही पर्वा न करता ती दोघे माझ्या दिशेने धावून येऊ लागली... तोच... आणखी एक विचित्र घटना... कानाचे परदे फाटतील, इतका भयंकर आवाज कानी पडला... सर्पाने दंश केल्याने माझ्या चेतासंस्थेवर परिणामी भौतिक गोष्टींचे आकलन करण्याच्या प्रभागावर मोठा परिणाम झालाय... पुढचे काहीच आठवत नाहीये, पण तो आवाज अतिशय वेगाने माझ्या डावीडून आला... तो कदाचित धरणीकंपच असावा... मला आठवतंय... मी ओरडतो आहे... वाचवा... कोणीतरी वाचवा मला... धरणीकंपामुळे त्या वाळवंटात अगदी माझ्या दोन्ही पायांच्या मधोमध पडलेल्या अरुंद व अतिशय खोल भगदाडामध्ये मी तळाच्या दिशेने पडतोय...<br />
<br />
धप्पऽऽ... मी अचानक बेडवरून खाली पडलो... अजुनही माझे आरबळणे चालूच आहे... वाचवा... कोणीतरी वाचवा मला... माझ्या बेडवरून खाली पडण्यामुळे आणि आरबळण्याच्या आवाजाने तीची झोपमोड झाली असावी, तशी ती एकदमच उठून माझ्याकडे आली... व मला गदागदा हलवतेय... ती नेमकी काय व कोणत्या भाषेत बोलत होती, हे मात्र मला आठवत नाहीये आता... ओह्हऽऽ... अरेच्चाऽऽ... ते स्वप्न होते तर... माझा घामाघूम झालेला चेहरा तीने टॉवेलने पुसला... काही वेळातच थंड पाणी अन् नंतर गरम दूध आणून दिलं तीने... एवढी प्रेमळ व काळजी घेणारी सहचारिणी मिळणे फारच कठिण अन् माझ्यासारख्या नशिबवान व्यक्तिलाच तशी सोबतीण मिळत असते, असा मी विचार करत असतांनाच ती खिडकीकडे चाललीये... खिडकीची काचेची तावदाने उघडी असल्यामुळे ती ते व्यवस्थित बंद करण्यासाठी जात असणार असं मला वाटलं... पण नाही, ते तसं काही नव्हतंच... मला प्रसंग आठवतोय, डॉक्टर सांगत होते की हिला निद्रानाश झाल्यानंतर देखील काही क्षणांतच पुन्हा झोप लागून झोपेतच चालण्याची अत्यंत वाईट विकृती जडलीये... मी नुसता बघत होतो, बेडवर मांडी घालून... खिडकी एवढी रूंद की अख्खा माणूस त्यातून सहज आत-बाहेर येऊ शकेल... दिसले, नाही मी बघितले... खिडकीची तावदाने उघडीच होती... ती खिडीकीच्या दिशेने जात होती... मला पक्कं जाणवलं, मी तिच्याकडे एकदम धावलो... पण नाही फारच उशीर केला मी... माझ्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली... ****** (तीचं नाव काय आहे पण?)...<br />
<br />
मी अजुनही ओरडतोच आहे... ******... जोरात कानापाशी एखादा सुतळी बॉम्ब फोडावा असा कर्कश आवाज मला जाणवला... आमचा क्र्यू-लीडर माझ्या पुढ्यात मला कॉम्प्युटरसदृश्य स्क्रीनकडे बोट दाखवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय... हे देखील एक स्वप्नच होते तर... च्यायला... $@#*?&% असा माझा मलाच कुठलातरी शिवीवजा आंग्ल वाक्प्रचार मी मनातल्या-मनात घोळला... माझी दिवास्वप्ने पाहण्याची सवय त्याला माहिती आहेच... पण यावेळी काहीतरी खूप मोठे अनिष्ट होण्याच्या मार्गावर आहे... अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका भल्या-मोठ्या अवकाशीय दगडाशी आमच्या अंतराळ-यानाची टक्कर होणार... माझ्याकडे मोठ्या विश्वासाने त्या आमच्या क्र्यू-लीडरने कुणालाही न जुमानता मला यानाचे कंट्रोल-युनिट सांभाळण्याचे काम सुपुर्त केले होते... पण माझी दिवास्वप्ने पाहण्याची खुळचट सवय आज आम्हाला यमसदनी नेण्याच्या मार्गावर आहे... नाही यमसदनी नेणारच... शेवटच्या क्षणापर्यंत काय झाले, ते मला व्यवस्थित आठवत नाहीये, पण जेव्हा आमचे यान त्या प्रचंड दगडाशी धडकले, तेव्हा आम्ही सर्वांनी अगोदरच आत्महत्या केलेली होती...<br />
<br />
मी वर्गात बसलोय... कसलेतरी कंटाळवाणे लेक्चर चालू आहे... अगदी मागच्या बाकावर बसण्याची माझी हौस काही औरच... पण मॅऽमच्या आता कुठे माझ्याकडे लक्ष गेलं... माझं तर पुर्ण लक्ष विचलीत झालेलं... यान, आत्महत्या, धडक, स्फोट... मी ते दृश्य बघतोय... हेलो यू... येस्स फ्रॉम लास्ट बेंच ऑन बॉइज् साइड, स्टॅण्ड अप... मी आतापर्यंत डोळे उघडे ठेऊन यानाची दृश्ये न्याहाळतोय... मॅऽमनी तिसर्यांदा जोरात आवाज दिल्यानंतर कुठे मी भानावर आलो... च्यायला वर्गात बसलोय मी... म्हणजे ते स्पेस-शटल मध्ये आत्महत्या, धडक वगैरे निव्वळ स्वप्न होतं तर... अचानक कसलातरी आवाज येतो... ह्म्म, वायब्रेशन तर माझ्याच खिशातूनच जाणवतंय... अरेच्चाऽऽ... रिंगटोन देखील परिचयाची वाटतीये... माझाच मोबाइल, ह्म्म, माझाच वाजतोय तर... फोन कट करायला मी मोबाइल हातात घेतला...<br />
<br />
Snooze again after 2 minutes... ओके बटन दाबल्यानंतर मी हा मेसेज बघितला... ह्म्म, सकाळचे ६ वाजले तर... मी वर्गात बसलेलो होतो ना... नाही आता तर झोपीतून उठल्यासारखं वाटतंय... चला म्हणजे फोन कट करण्यासाठी मी वर्गामधून थेट घरी आलो तर... काय स्वप्न आहे गड्या... हेत्तीच्या मारी... मला सर्व काही अगदी थोडं-थोडं आठवतंय... चला लिहायला सुरुवात करतो... लॅपटॉप काढला, खात्री पटावी म्हणून एकवेळ चिमटा काढला... आऽऽऽऽ... जाणीव होतेये चिमटा काढण्याची... काही क्षणांपुर्वी(?) मला <u>एकामागे एक</u>, नाही <u><b>एकात-एक</b></u> पडलेल्या स्वप्नांना लिहायला सुरुवात केली... मी हे जे लिहितोय, ते तरी वास्तव आहे ना की आधीच्याप्रमाणेच एक स्वप्न??? यावर काही कमेंट्स आल्या, तर त्या मी मुळात स्वप्नात वाचत असेन की प्रत्यक्षात जागी असतांना???Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-60060012942283917332010-10-14T19:36:00.002+05:302010-11-20T00:55:56.539+05:30यस्सऽ नोऽ...<i><b>[डिस्क्लेमर</b>: पुढील कथानकातील कुठल्याही प्रसंगाचा/पात्राचा/स्थळाचा/वचनांचा कशाशीही कसलाही संबंध नाहीये. यातील "मी" हे पात्र देखील काल्पनिक आहे. कसल्याही बाबतील जर तुम्हाला हे तुमच्याशी घडलेल्या घटनेशी संबंधित आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.<b>]</b></i><br />
<br />
पहिलंच लेक्चर... तसं सगळेच लेक्चर्स आम्ही म्हशीसारखे उदास मुस्कटं करुन कसे-बसे मार्गी लावत असतो, कुठलंही लेक्चर त्याला अपवाद नसतंच मुळी! आज मुलांना जरा हूरूपच चढलेला दिसत होता बहुदा, नाही नाही... मला तर दाट शंकाच होती की कित्येकांनी डायलूट (विरल ~ पिण्याच्या पाण्यात मिक्स करुन) ढोसलेली होती... खासकरुन आमचे एमबीबीएस (बॅक बेंचर्स हो!) इंजिनिअर्स... <br />
<br />
मॅऽमनी लेक्चरला सुरुवात केली... एखाद्यावेळी गच्चीवर रात्री झोपतांना १२ वाजता अतिशय कर्कश आवाजात बाजुच्याच मंदिरावरील खडूस पुजार्याने झोपेच्या सुरात म्हणलेली "वट पाहे सदना" च्या जागी "वाट पाही सजनी" अशाप्रकारची मॉडिफाइड स्वरूपातली गणपतीची आरती ऐकणं चालेल, पण मॅऽमचं लेक्चर म्हणजे वर्गांच्या खिडक्या डोक्याने आपटून-आपटून फोडाव्या की काय, अशी स्थिती निर्माण करणारं कंटाळवाणं पारायण...! असो... नशिबी पडलंय, ते भोगावं तर लागणारंच... अर्धा तास झाला, मॅऽमचं भारूड चाललंय, पोरा-पोरांची तोंड तर अशी दिसत होती की कोणी जोर-जोरात त्यांच्या थोबाडींत भडकावल्या असाव्यात... पिन-ड्रॉप-सायलेंट का काय जे म्हणतात ना, त्याचा आम्ही तना-मनाने अवलंब केलेला... फळ्यावर मॅऽमनी कसलातरी तक्ता काढला. तक्त्यात मॅऽमनी नावे विचारली... ज्याने-त्याने त्यांची -त्यांची सांगितली देखील. च्यायला, पहिल्या कॉलममध्ये मुलांची नावे भरल्यावर दुसर्या कॉलमकडे मॅऽम वळाल्या... मुलींची नावे विचारणं मॅऽमनी चालू केलं... पहिल्या बेंचपासून... हा हा... मनात नसूनही कित्येकींना त्यांची नावे सांगावी लागली. मुली सांगत होत्या, मॅऽम लिहित होत्या...<br />
<br />
<a name='more'></a> या काळात जो व्हॅक्क्युम हशा (म्हणजे हसणं, पण मुखरे-मुखरे, फार आवाज न होऊ देणं, एवढाच त्यामागचा उद्देश्य!) वर्गात पिकला होता, काय सांगावं... पहिल्या मुलाच्या नावासमोरील फिल्डमध्ये जेव्हा पहिल्या मुलीचे नाव आले, तेव्हा पासूनच खळखळाट सुरु झाला होता... पोरगा खल्लासच झाला... टॉपर अन् त्यात क्लासमधली सगळ्यांत क्लास(!) पोरगी त्याच्यासमोर, म्हणजे काय प्रत्यक्षात त्याच्यासमोर नव्हे तर तीचं नाव त्याच्या नावासमोर...! कॉन्ग्रॅट्स... कॉन्ग्रॅट्स... आम्हा बॅक-बेंचर्सकडून शुभेच्छांचा त्याच्यावर काही काळ अविरत वर्षाव चालू होता... पण मॅऽम लय म्हणजे लयच स्ट्रिक्ट... आधी त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, नाही फर्मानच सोडला, जो बोलला/बोलली, तो/ती क्लासच्या बाहेर... यानंतरची वेळ असते ती म्हणजे व्हॅक्क्युम हशा क्रिएट होण्याची, साहजिकच आहे... शेजारच्याशी/चीशी खाली मुंडकी वाकवून या आजच्या प्रकरणाबद्दल कुजबुज सुरू झाली. मुलींची नावे येत गेली, तसा आमच्या साइडने व्व्यॉऽऽक, व्वॉऽऽव्व, श्शीऽऽ, हात्तीऽऽच्च्या मारी.. अशा प्रकारच्या नॉन-सेन्स अन् मिनिंगलेस कमेंट्स पास होत गेल्या... त्याही उघड-उघड! दहा मिनिटांत तक्ता पुर्ण झाला... एक सांगायचेच राहिले की... ते जे दोन कॉलम्स तयार केले होते, त्यांमध्ये काही प्रमाणात मोकळी जागा होती... माझी नजरच कमी... चष्मा लागलेला असेल बहुतेक, पण मी हट्टी... चष्मा घालून 'बॅटरी' सारख्या फालतू टवाळक्या ऐकण्याची घोडचूक आपुण कधी करणार नाही बुवा... आणि मागे बसलेलो असल्यामुळे फळ्यावर काय लिहिलेले/काढलेले असेल, ते अंदाज बांधत-बांधत (पोरींकडेही असेच अंदाजपंचे डोळे मारण्याचे उपक्रम मी कधीकाळी केले असल्याचे मला आठवते अजून!) समजून घ्यावे लागते मला... चुकी झाली... ते दोन भिन्न तक्ते होते, हं, भिन्नच होते, खात्रीने... एकाच तक्त्याचे दोन कॉलम्स नव्हते हे लक्षात घ्या आता...! :P<br />
<br />
इथून पुढे खरी मजा येणार होती... आतापर्यंत लेक्चर चालू होऊन ४० मिनिटे झाली असावीत. मॅऽमनी दोन्ही तक्त्यांतील फिल्ड्समधून तिरपे-तारपे बाण रेखाटीत जोड्या जुळवायला सुरुवात केली... च्यायला... आता हसू आवरणं अतिशय कठिण... पहिल्या वेळी कॉन्ग्रॅट्स सारख्या शुभेच्छा मिळवणारा पोरगा सोडून सगळ्यांच्या जोड्या मॅऽमनी जुळवल्या... काय इज्जत उरली असेल त्या पोराची...! नाइंसाफीच म्हणावी लागेल, काडी असलेल्याच्या (नुसत्या हाडांचा!) चार-चार पोरींशी जोड्या...! साफ नाइंसाफी... लग्गा, लग्गा (म्हणजे फिक्सिंग हो, किरकेट मंधी होते ना तसला काहीसा प्रकार!) अशा भेसड्या आवाजाने क्लास दणाणून निघला! २ मिनिटे... मॅऽमनी आता बोलायला सुरूवात केली... सगळे चिडीचूप!<br />
<br />
मॅऽमने लेक्चरच्या सुरूवातीला कार्डिनॅलिटी—सेट रिलेशनशिप (विषय-संदर्भ: डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम!) बद्दल ज्ञानार्जन वाहिलं होतं, पण आधी सांगितल्याप्रमाणे कोणीच ते ऐकलेलं नसावं, हे मात्र पक्कं! आता मॅऽम त्या जोड्यांकडे बोट दाखवून सांगत होत्या, पोरं-पोरी तसाच उत्स्फूर्त प्रतिसादही देत होती:<br />
<br />
<br />
<blockquote> "धिस इज नोन टू बी वन टू वन रिलेशनशिप"<br />
"<b>यस्सऽ... यस्सऽऽ</b>"<br />
"धिस इज वन टू मेनी"<br />
"<b>नोऽ नोऽ...</b>" <br />
"अॅण्ड धिस इज मेनी टू वन"<br />
"<b>चऽऽक... चऽऽक.. नोऽ.. यस्सऽ... यस्सऽऽ..</b>"<br />
"फायनली, धिस हॅविंग नो रीलेशनशिप विथ एनिवन अमंग दि सेकंड टेबल, राइट?"<br />
"<b>हा... हा... यस्सऽ... यस्सऽऽ...</b>"</blockquote> <br />
॒Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-4917622949242068472010-10-11T18:01:00.001+05:302010-10-11T18:04:31.075+05:30गोष्ट समाप्त!<i><b><a href="http://3.ly/mxCx">अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३</a></b> पासून पुढे...</i><br />
<br />
<i> </i>काही वैयक्तिक कारणांमुळे ही कथा यापुढे लिहिणे मला शक्य नसल्याने या कथेचे उर्वरीत लिखान कायमस्वरुपी स्थगीत करीत आहे.<br />
<br />
<br />
<hr width="200" /><blockquote><ul><li><b><a href="http://3.ly/n65r"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १ </i></a></b></li>
<li><b><a href="http://3.ly/vdvY"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २ </i></a></b></li>
<li><b><a href="http://3.ly/mxCx"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३ </i></a></b></li>
</ul></blockquote>Unknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-68571648083847511712010-09-28T14:50:00.006+05:302010-10-11T18:03:58.404+05:30अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३<i><b><a href="http://3.ly/vdvY">अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २</a></b> पासून पुढे...</i><br />
<br />
दुसरा दिवस उजाडण्याअगोदरच पहाटेच्या काळोखात सर्वांच्या घरी वातावरण जरी नेहमीप्रमाणे शांत असलं तरी ही मित्रमंडळी स्वप्नांच्या निराळ्याचा दुनियेत धुमाकूळ घालण्यात व्यस्त होती. जरी आधीच ठरलेलं असलं तरी निव्वळ औपचारिकता म्हणून आणि तयारीमध्ये कसलीही कसर राहू नये यादृष्टीने सकाळी ७ च्या सुमारास राहूलने सर्वांना ठराविक जागेवर ज्याने-त्याने थांबावं, अशी सुचना देणारा संदेश मोबाइलवरुन सर्व ग्रुप-मेंबर्सना पाठवला. राहूलच्या गाडीवर असणारा ड्रायव्हर त्याच्या अगदी जवळचा नि जिव्हाळ्याचा, तो त्यांना काका असे आदरात्मकरीत्या संबोधायचा. ड्रायव्हरला राहूलने अगोदरच त्याच्या फ्रेंड-सर्कल मधील मित्रांची माहिती दिलेली होती. सर्व तयारी आटोपल्यावर वेळेचा व्यवस्थित अंदाज घेत राहूलने घरुन गाडी सुमेधाच्या घराच्या दिशेने वळवली... पुर्वनियोजीत वेळेनुसार सुमेधा तिच्या घरापासून जरा लांब अंतरावर ठराविक ठिकाणी थांबलेली होती. तीला तेथून गाडीत बसवून नंतर अजय, हर्षद, राजश्री, अनिता, अंकित, कावेरी, निशा या सर्वांना वेळेवर पोहोचून गाडीत घेतले. सर्वजण अगदी खूष व आनंदाने अतिशय भारावलेले होते. निशाकडे गाडी सर्वात शेवटी पोहोचली, तसं ते ठरलेलंच होतं... कारण तीने दोन भले-मोठाले डबे भरुन खाण्याचे पदार्थ घेतले होते, ती पहाटेपासूनच ते बनवण्यात व्यस्त होती तशी... गाडी जशी शहराच्या बाहेर जाणार्या चौपदरी हायवेला लागली, तसा ड्रायव्हरने ताशी वेग वाढवला, सुमारे ताशी ५०-६० मैल असा असावा. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरील रहदारी दिवसा असणार्या प्रचंड गर्दीच्या तुलनेने अतिशय विरळ असल्याने गाडी अधिक जलद गतीने हाकण्यास कसलीच अडचण नव्हती, शिवाय रस्ताही अतिशय गुळगुळीत व सरळ होता. मुली तर असा पहिल्यांदाच प्रवास करीत होत्या नि एवढ्या जलद जाणार्या प्रवासाची बहुतेकींना सवय देखी नव्हती, किंचीत घाबरल्याच होत्या काहीजणी... राहूलने त्यांच्या मनावरील द्विधा भाव लागोलाग हेरुन ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. आज यांच्यावर हवामान मेहेरबान दिसत होते, कारण सकाळचे साडे-आठ वाजूनदेखील सुर्याचा पत्ताच नव्हता, जरी दिवस थंडीचे असले तरी हिवाळ्यात देखील ऊन्हाचा भयंकर कहर आता लोकांना सहन करावाच लागत होता, परिणामी गरमीमुळे होणारी दगदग इत्यादी गोष्टी आल्याच... गाडी निश्चित ठिकाणाकडे जाणारी वाट पादाक्रांत करीत होती, तसे आतमध्ये बसलेल्या या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांना, गलबलाटाला, किंकाळ्यांना उधाण वाढत गेले... सर्वांना ते हिलस्टेशन कधी एकदाचे येते याची उत्सुकता लागलेली होती. तासाभरात गाडी तेथे पोहोचली...<br />
<br />
<a name='more'></a><br />
<br />
वार्याचे झाडांच्या पानांशी चाललेले हितगूज आणि पक्ष्यांची मधूर किलबिल वगळता संपूर्ण परिसरात नीरव शांतता पसरलेली होती. त्या डोंगराच्या लगतच्या रस्त्यावरुन आपसुकच एखादं वाहन फिरकत होतं, त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा हर्ष प्रत्येकालाच होत होता. सकाळचे फक्त दहा वाजले असल्याकारणाने अजुनपर्यंत तरी तेथे फिरण्यासाठी कोणीच आलेले नव्हते, सहसा तेथे दूपारच्या नंतरच लोकांचं येणं चालू होतं. डोंगर चढण्याकरीता फार कठिण म्हणता येईल असा नव्हता पण तेवढा सोपादेखील मुळीच नव्हता. कित्येक ठिकाणी डोंगर चढतांना भल्या-भल्यांच्या नाकी नऊ येतील, असे अडथळे वाटेत बनलेले होते. एकूणच ही ट्रिप एक मस्त ट्रेक होणार, या भावनेनेच अनेकांचे चेहरे खुलले होते, मात्र अनिताने जेव्हा डोंगराकडे पाहिले तेव्हा तीच्या तोंडून चक्क 'बाप्पऽऽरे' असे आश्चर्योद्गार नकळत बाहेर पडले. तीने यापूर्वी कधीच अशा रांगड्या डोंगरांची चढाई केली नव्हती, त्यामुळे साहजिकच ती प्रथम घाबरलीच... सर्वांनी समजूत घातल्यावर तशी ती लगेच तयार देखील झाली. जेमतेच व गरजेपुरतेच सामान म्हणजे डबे, पाण्याच्या बॉटल्स इत्यादी काही बॅग्ज मध्ये भरून त्या मुलांकडे सुपूर्द करण्यात आल्या. गाडी व्यवस्थित पार्क करुन ड्रायव्हरने ते सर्वजण फिरून येईपर्यंत मस्त झोप काढण्याचा निर्णय घेतला. डोंगर चढण्यास साधारणतः पाऊण तास लागत असे, पण आता मुली सोबत असल्यामुळे हे वेळापत्रक बदलू शकणार होते. अंकित धावतच डोंगर चढण्यासाठी असलेल्या पाऊलवाटेकडे गेला, त्याला ट्रेकिंगची फार आवड... पण सर्वांनी सोबतच रहावं हा राहूलचा हट्ट होता, अखेर राहूलने समजावल्यावर अंकितला त्याची आगेकूच मोहिम आवरती घ्यावी लागली.<br />
<br />
सर्व मुली आता पुढे चढत होत्या, व मुले त्यांच्या मागोमाग... पण अंकित फार आग्रही, तो अजुनही सर्वांच्या पुढेच होता, हं मुलींना वेळोवेळी चढतांना तो त्यांची मदत देखील करत होता तसा... सलग पंधरा मिनिटांपासून ते सर्वजण डोंगर चढीत होते आणि अचानक... अनिता एका ठिकाणी तोल जाऊन जागीच खाली पडली. राहूल धावतच तीच्यापाशी पोहोचला व त्याने त्याच्याच जवळ असलेल्या बॅगमधून प्रथमोपचार किट उघडून त्यातून निर्जूंतीकरणासाठी असलेली कुपी आणि बॅंडेज पट्ट्या काढल्या. बाजूलाच असणार्या चुनखडीच्या ओबडधाबड खडकावर घसरुन पडल्यामुळे तीचा उजवा तळहात थोडाफार खरचटला होता... जखम फार काही मोठी नव्हती, पण राहूलने ती जखम व्यवस्थित साफ करुन तेथे बॅंडेज पट्टी बांधली. भाग्याचीच गोष्ट, डोंगराच्या पायथ्याशी असतांनाच ही घटना घडली, अन् त्यात अनिताला जास्त इजादेखील झाली नाही. अनिताला त्रास जरी होत असला तरी ती अद्याप विव्हळत नव्हती. सर्वांनी तीला खाली जाऊन आराम करण्याचे सांगितले, पण तीने ते ऐकले नाही, त्यांच्यासोबतच डोंगर चढण्याचा तीने निर्णय पक्का केला. आता मात्र राहूल तीच्या समवेत होता, तीचा हात घट्ट धरुन तो तीच्यासोबत डोंगर चढत होता. सगळेजण अखेर डोंगरावर पोहोचले, अद्याप राहूल, अनिता व हर्षद चढतच होते. हर्षदने राहूलला त्याच्याशी त्याला काहीतरी वैयक्तिक बोलायचे आहे असं कसलातरी संकेत देऊन थांबण्यास सांगितलं... डोंगराची चढाई संपली तशी अनिता तेथे आधीच पोहोचलेल्या मित्र-मैत्रिणींकडे जाण्यास निघाली. अनिता जाती आहे, हे पाहून तेथेच, थोडं खाली, राहूल व हर्षद थांबले. <i></i><br />
<i><br />
</i><br />
<b>(क्रमश:)</b><br />
<br />
<br />
<hr width="200" /><blockquote><ul><li><b><a href="http://3.ly/n65r"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १ </i></a></b></li>
<li><b><a href="http://3.ly/vdvY"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २ </i></a></b></li>
<li><b><a href="http://goo.gl/GLGN"><i>गोष्ट समाप्त!</i></a></b></li>
</ul></blockquote>Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-83428661498955111182010-09-20T13:19:00.006+05:302010-10-11T18:03:38.499+05:30अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २<i><b><a href="http://3.ly/n65r">अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १</a></b> पासून पुढे...</i><br />
<br />
<i> </i>गेल्या काही वेळापासून सुसाट्याने वाहत असलेल्या वार्याच्यासोबत व ढगांच्या गडगडाटांसोबत अखेर मोसमातील पहिला-वहिला पाऊस सुरु झाला. रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या त्या कट्ट्यावर, जेथे राहूल अन् अनिता बसलेले होते, तेथे पावसापासून बचावासाठी काही आच्छादनाची सुविधा नव्हतीच, त्यामुळे त्यांना तेथून एखाद्या सुरक्षित जागी जाणे भाग होते. आधीच आक्राळ-विक्राळ थेंबांच्या सरींसह पाऊस सुरु झाला होता, अन् त्यात वीजांचा कडकडाटसुद्धा चालूच होता. राहूलचे बोलणे मध्येच तोडत अनिताने स्वतः उभं राहू त्याचा हात धरुन त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. राहूल आपल्या धूंदीत होता, त्याला पहिल्या क्षणी तर कळालेच नाही की अनिता अशी काय करती आहे ते... पण नंतर जेव्हा ओल्या-चिंब भिजलेल्या अनिताकडे त्याने पाहिले तेव्हा कुठे त्याला जाणवले की पाऊस सुरु झाला आहे... :) पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनिता खचली नाही, ती त्याला उठविण्याचे प्रयत्न करीतच होती. एव्हाना राहूलच्या ध्यानात आलं होतं की अनिता नेमकी काय करण्याचा प्रयत्न करते आहे ते... तसा तो स्वतःदेखील उठला असता, पण त्याने तसे केले नाही. अनिताने त्याचा हात आपल्या दोन्ही नाजूक तळहातांनी घट्ट धरून शक्य तेवढ्या ताकदीनिशी पुन्हा एकदा आपल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र राहूल तीने ओढल्याबरोबर उठून उभा राहिला अन् लगेच तीलादेखील आपल्याकडे ओढले... शेवटी तो शरीरयष्टीने तसा धष्टपुष्ट होताच, आणि अनितासारखी नाजूक मुलगी म्हणजे त्याच्या एका हाताचाच खेळ...! असं आकस्मिक ओढलं गेल्याने ती थेट त्याच्या कुशीत जाऊन विराजली. तिचे कपाळ त्याच्या छातीवर आदळले गेले, हं पण दोघांनाही त्याच्या वेदना मात्र जाणवल्या नाहीत. कसलाही प्रतिकार न करता तीने त्याच्या छातीवर तीच्या गालांचा हळूवार दाब देऊन दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारली... ती काही बोलणार, एवढ्यातच राहूलने तीच्या बोलण्याला न जुमानता त्याचं बोलणं चालू केलं,<br />
<br />
"काय गं... भिती वाटतीय का पावसाची... घाबरली तर नाहीस ना तू?" तो तीच्या डोक्यांवरील भिजलेल्या केसांवर तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्याची <strike>दाढ</strike> हनुवटी ठेऊन पुटपुटत होता. <br />
<a name='more'></a><br />
"नाही रे... भिती कसली, पावसाऽची... छेऽऽ रे... आणि आता तर तुझ्या कुशीत असताना कशाची म्हणजे कश्शाऽऽचीच भिती नाही वाटत मला..." अनिताने अजुन त्याला दोन्ही हातांनी घट्ट आवळण्याचा प्रयत्न केला.<br />
<br />
"रिअलि?" तो तिच्या चेहर्यावरुन ओघळणार्या थेंबांना पुसत अन् तिच्या केसांची बट सावरत म्हणाला.<br />
<br />
"अरे हो रे बाबा... पण आज पावसात तुफान वारा वाहतो आहे, त्यामुळे खूप थंडी वाजतीय आता..." तीने त्याच्या छातीत आपला संपूर्ण चेहरा लपविण्याचा प्रयत्न चालू ठेवला.<br />
<br />
"ओह्ह माय बॅडलक, आधीच सांगायचं ना... तसं माझ्या कुशीत तुला खूप ऊब मिळत असेलच नाही...?" आता त्याने देखील तीला दोन्ही हातांनी मिठी मारुन स्वतःकडे आणखी ओढून घेतली.<br />
<br />
" हो रे राजा... मी तर मरेपर्यंत तुझ्या कुशीत अशीच निपचित राहण्यास तयार आहे, पण मला तुझी जास्त काळजी वाटते आहे..." <br />
<br />
"अच्छा... म्हणजे राणीसाहेबांना आमची जास्त काळजी आहे तर..."<br />
<br />
"चल आता येथून... पाऊस थांबल्यावर परत येऊ इथे..."<br />
<br />
"जो हुकूम, राणीसाहेबा..." <br />
<br />
हात बाजुला सावरत तो अनिता बाजुला होण्याची वाट पाहू लागला. अनितानेदेखील त्याच्याभोवती आवळलेले हात काढून घेतले व तीसुद्धा त्याच्यापासून बाजूला झाली.<br />
राहूलने तेथेच बाजूला उभी केलेली बाइक काढली व अनेक प्रयत्नांति शेवटी चालू केली... अनिता तोवर स्तब्ध उभी होती, व बाइक चालू झाल्यानंतर राहूलच्या पाठीमागे जाऊन बसली. ती व्यवस्थित बसली आहे की नाही, याचा अंदाज घेऊन त्याने बाइक शाळेच्या दिशेने हाकली. तिथून शाळा फक्त २ किमी अंतरावर होती. सुटी असल्याने शाळेच्या गेटला देखील कुलूप होते व चोहोबाजूंनी उंच भिंतींचे कुंपण असल्याने मध्ये जाण्यासाठी इतर कुठलिही वाट नव्हती. शाळा मोठी असल्याकारणाने तेथे गेटच्या बाहेरच सेक्युरिटी गार्डसाठी एक एक छोटीशी खोली करण्यात आली होती. तिथे दरवाजा मात्र नव्हता, ही गोष्ट राहूल व अनिताला आधीपासूनच ठाऊक होती, म्हणूनच ते तिथे आले होते. पावसाच्या सरी ज्या दिशेने कोसळत होत्या, त्या दिशेला खोलीमधून त्या सरी भिंतीमुळे आतमध्ये येऊ शकत नव्हत्या, त्यामुळे ती खोली अजुनही कोरडीच होती. आणि चांगली गोष्ट म्हणजे तिथे बसण्यासाठी आधीपासूनच बाकासारखे वीटा-सिमेंट इत्यादींद्वारे बांधकाम केलेले होते. राहूलने बाइक लगेच बाहेर उभी केली व ती दोघे त्या खोलीत गेले. राहूल खोलीत गेल्या-गेल्या तेथील बाकावर जाऊन बसला. अनिताने खाली बसण्याअगोदर आपले विस्कटलेले केस व्यवस्थित करु लागली, यावेळी तीच्या केसांमधील पाण्याचे थेंब त्याच्या चेहर्यावर तुषाराप्रमाणे उडत होते... तो तिच्याकडे एखाद्या नलाप्रमाणे पाहत होता, ती आता दिसतच तशी होती, एखाद्या रतीप्रमाणे... अगोदरच ती अतिशय सुंदर होती, तीचे तारुण्य तीच्या प्रत्येक अवयवात, अंगात झळकत होते... आणि आता तर ती पुर्णपणे भिजून ओली-चिंब झालेली होती. आज तीने पर्पल रंगाचा अतिशय सुंदर टॉप अन् निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती, हा ड्रेस तिच्या मागच्या वाढदिवसाच्या वेळी राहूलनेच तीला भेट म्हणून दिला होता. कोणतीही सुंदर तरुणी तीच्याकडे बघणार्याला कामोवृत्त करतच असते... अनिताही तशीच, आणि आता तर संपुर्णतः भिजलेली... जरी राहूल तीच्याकडे कामुक नजरेने पाहत असला तरी तो संयम बाळगून होता. त्याच्याजागी एखादा दुसरा असता, तर आतापर्यंत त्या दुसर्याने सीमोल्लांघन करुन अग्नि पेटवला असता... हे तर नैसर्गिकच म्हणता येईल. मग राहूल का संयम ठेवून होता, आणि एवढा संयम बाळगणं कसं शक्य होतं बरं... आणि महत्वाचं म्हणजे अनितालादेखील ही गोष्ट ठाऊक असणारच की तो सध्याच्या घडीला काय करु शकत होता ते, पण तरीही ती त्या गोष्टीकडे काहीच लक्ष देत नव्हती... त्याच्यामध्ये अथवा तीच्यामध्ये काही प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच नव्हता... या सर्व गोष्टींमागचे अप्रत्यक्ष कारण पुर्वी झालेल्या एका घटनेमध्ये दिसून येतं...<br />
<br />
घटना आहे, ती दोघे तीसर्या सेमीस्टरला असतांनाची, म्हणजे सेमीस्टरची परिक्षा झाल्यानंतरची... अभियांत्रिकी मध्ये प्रत्येक वर्षात २ सेमीस्टर्स असतात, म्हणजे ४ वर्षांत एकूण ८ सेमीस्टर्स... राहूल आणि अनिता यांची भेट द्वितिय वर्षाच्या सुरूवातीला, म्हणजेच तीसर्या सेमीस्टरच्या वेळी झाली होती. त्यानंतर त्यांच्यामधली सलगी वाढतच गेली. राहूलचे तीन जवळचे वर्गमित्र अन् अनिताच्या चार वर्गमैत्रिणी असे एकूण ९ जणांचे फ्रेंड सर्कल काही दिवसांतच तयार झाले. राहूल, हर्षद, अंकित, अजय, अनिता, राजश्री, सुमेधा, निशा, कावेरी असे हे या फ्रेंड-सर्कलचे सदस्य... राहूल अन् अनिता यांची भेट हाच सुरुवातीला या फ्रेंड-सर्कलमधील गजबजलेला विषय असायचा... त्यासाठी लेक्चर्स, काहीवेळा प्रॅक्टिकल्स बंक करण्याचेदेखील प्रमाण वाढत गेले. दररोज एकमेकांचे डबे एकत्र बसून खाण्यात काय मजा असते, हे त्यावेळी कॅंटीनमध्ये या सगळ्यांना पाहणारे त्यांच्याच वर्गातले इतर मुले-मुली त्यांचा खूप हेवा करीत असतील. त्यांच्या गप्पा रंगायच्या, त्या तास-दोन तास सहज चालायच्या... त्यांची रोजची हीच दिनचर्या, कॅंटीन, पार्किंग, आणि केलं तर एखाद-दोन लेक्चर्स वा प्रॅक्टिकल... तीसरे सेमीस्टर असेच मजेत निघून गेले... परिक्षा तशा अपेक्षेप्रमाणे कधी जातच नसतात, पण नेहमीप्रमाणे मुलींनीच (आणि यांच्या ग्रुपमध्ये देखील अपवाद नव्हता!) टॉपच्या जागा मिळवल्या... आनंदाची गोष्ट म्हणजे सुमेधा क्लास-टॉपर आली होती त्यावेळी... सर्वांनी तीच्याकडून तशी जबरदस्त पार्टी देखील घेतली होती त्यासाठीची... राहूल, हर्षद, अजय, अनिता, सुमेधा ही सुखवस्तू कुटूंबांतील एकुलती-एक मुलं... त्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या तशा होत्याच, शिवाय राहूलकडे घरी दोन लक्झुरी कार्सशिवाय टोयोटोची इनोव्हो देखील होती. वडीलांचा स्वतःचा व्यवसाय असल्याकारणाने त्याला पैश्यांची तशी कधीच गरज भासत नसे, पण तो इतर "रईसजादोंकी औलाद"प्रमाणे कधीच आपली श्रीमंती मिरवीत नसे वा त्याला त्या गोष्टींचा गर्व देखील नव्हता. हं, फक्त त्याच्याकडे महागडी बाइक, ब्रॅंडेड कंपन्यांची साधने, कपडे इत्यादी गोष्टी असायचा, पण त्यामुळे कोणाला त्याचा हेवा वाटेल, असं त्याचं वर्तन कधीच नसे. अंकित, राजश्री, निशा ही सुद्धा तशी मिडल-क्लास कुटूंबांतील मुलं, त्यांनाही पैश्यांची म्हणावी तशी चिंता नसायची, फक्त त्यांच्याजवळ स्वतःच्या गाड्या नव्हत्या, एवढाच काय तो फरक...! परिक्षा झाल्या, आता कुठेतरी बाहेर ट्रिप करुन जावं, असं बहुदा प्रत्येकाच्याच मनात होतं... सुमेधाच्या पार्टीच्या वेळी अनितानेच विषय काढला. सर्वांनी होकार दिला, हिवाळा असल्याने मस्त हिल-स्टेशन वगैरेकडे जाण्याचा मुलांच्या बाजुने सुर निघाला. पण मुलींना आधीच ट्रिपसाठी घरच्यांकडून परवानगी मिळण्याचे चान्सेस नव्हतेच, आणि जरी परवानगी मिळाली तर ती फक्त मुलीच ट्रिपला जाणार आहेत, असं सांगूनच मिळणार होती आणि त्यासाठी दिवसभरात हिंडून परत येता येईल, असे ठिकाण त्यांना हवे होते. शहरापासून अंदाजे ७०किमी लांब असलेलं एक लोकप्रिय हिल-स्टेशन ठरलं... पर्वतरांगेमधला एक उंचच-उंच डोंगर, उंचावरून वाहणारा धबधबा, चोहोबाजूंचा निसर्गरम्य परिसर, दाट हिरवळ व अनेक इत्यादी एकापेक्षा एक मनोरम गोष्टी असलेलं हे हिल-स्टेशन सर्वांनी पक्कं केलं... लगेच दुसर्या दिवशी जायचं, हे देखील नक्की करण्यात आलं. राहूलची इनोव्हो करून जायची, हे निश्चित. त्याने घरी अगोदरसुद्धा ट्रिपसाठी गाडी मागितली होती, अन् त्याला मिळालीही होती, त्यामुळे यावेळीही गाडी मिळून जाईल, हे राहूलला माहित होतं. दुसर्या दिवसासाठी सर्वांनी प्लॅनिंग चालू केलं, खायला काय-काय आणायचं की बाहेरच कुठेतरी जेवायचं वगैरे वगैरे गोष्टींवर दुसरा दिवस उजाडेपर्यंत चर्चा चालूच होती. <i></i><br />
<i><br />
</i><br />
<b>(क्रमश:)</b><br />
<br />
<hr width="200" /><blockquote><ul><li><b><a href="http://3.ly/n65r"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १ </i></a></b></li>
<li><b><a href="http://3.ly/mxCx"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३ </i></a></b></li>
<li><b><a href="http://goo.gl/GLGN"><i>गोष्ट समाप्त!</i></a></b></li>
</ul></blockquote>Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-62644109004468513502010-09-16T21:26:00.005+05:302010-09-28T14:55:46.564+05:30अशीही एक लव्ह स्टोरी - भाग १<i>कथालेखन आणि त्यात प्रेमकथेसारख्या अत्यंत अवघड विषयाशी निगडित लेखन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न...! असो... बर्याच विषयांशी संबंधित लेखन तर मी नेहमी करतो, पण त्याला पुर्णत्वास नेणं म्हणजे जीवावर येण्यासारखं काम... बघूयात, ह्या कथेचा शेवट तरी व्यवस्थित होतो का ते... शिवाय बर्याच... नाही, फारच दिवसांनंतर ब्लॉगवर काही लिखान करण्याचा आज योग आलाय, हीदेखील चांगली गोष्ट म्हणावी लागेल, नाहीतरी माझ्या कित्येक ब्लॉगर-मित्रांनी विशल्याच्या "सुरूवात"चा शेवट झाला की काय, अशी शोकांतिका (वा अफवा म्हणा!) गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यास सुरूवात देखील केलेली होती... त्यांच्यासाठी मी जीवंत असल्याची ही पोच-पावती! (राग नका येवू देऊ हो!) ;)</i><br />
<i><br />
</i><br />
<i>[<b>डिस्क्लेमर</b>: ही एकूणच कथा, यातील पात्रे, पात्रांची नावे, ठिकाणे, प्रसंग इत्यादी सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जर तुम्हाला कुठेही तुमच्या आयुष्यातील घटनांशी मिळते-जुळते प्रसंग आढळले, तर तो निव्वळ योगा-योग समजावा.]</i><br />
<br />
<br />
<div style="text-align: center;">---- </div><br />
"तुझ्या डोळ्यांत मला आभाळ दिसतं... तू असतेस तेव्हा मला कसं अगदी तुझ्या प्रितीच्या गार तुषार-सरींखाली मनसोक्त भिजल्यासारखं वाटतं... पण तू जेव्हा नसतेस ना जवळ, तेव्हा मात्र मी अगतिक होतो, कासावीस होतो... मला तुझ्याशिवाय क्षणभरही राहावत नाही प्रिये... हंऽऽ खरंच राहावत नाही गं..." राहूल अत्यंत भावविभोर होऊन स्वप्नरंजित शब्दांत काव्यमय पद्धतीने त्याच्या मनातले भाव अनिताच्या कानी ऐकवत होता.<br />
<br />
वेळ संध्येची... रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर ती दोघं बसलेली होती. रस्त्याचे जरी डांबरीकरण झाले असले तरी तो शहराबाहेर अंदाजे १५ किमी दूर असलेल्या एका खाजगी शाळेला मुख्य रस्त्याशी जोडणारा जोडरस्ता होता. शाळेला हल्ली सुट्ट्या असल्याने राहूल अन् अनिताला मनमुराद अशी ती जागा होती... क्वचितच कोणी फिरकत होतं तिकडे, त्यामुळे बरेच दिवसांनंतर भेटीसाठी आसुसलेल्या या जोडप्याला आज एकमेकांस कडकडून भेटण्याची इच्छा न झाली तरच नवल... पावसाळ्याचे दिवस असल्याने आभाळ भरगच्च अशा काळ्याकुट्ट ढगांनी सर्वत्र भरलेले होते. गेल्या अर्ध्या तासापासून अगोदर वाहणारा मंद वारा आता जरा आणखी सुसाट्याने वाहत होता. ह्या वर्षीचा तो पहिलाच पाऊस होता. अगोदरच २ महिने उलटून गेलेले तरीही पावसाची नुसती चाहूल देखील नव्हती, पण आज मात्र ढगांचा गलबलाट अन् वीजांचा एकसंध कडकडाट ऐकून तहानलेली धरणी निश्चितच सुखावली असेल...<br />
<br />
<a name='more'></a><br />
<div style="text-align: center;"> ----</div><br />
<br />
याच दिवशी, म्हणजे १७ ऑगस्टला ती दोघे एक-मेकांना एका पुस्तक प्रदर्शनात भेटली होती. खरे पाहता, ते दोघे एकाच वर्गात शिकणारी, म्हणजे अभियांत्रिकीच्या माहिती तंत्रज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिकणारी मुलं... पण आजवर त्यांना एकमेकांशी काही खास कारणास्तव बोलण्याचासुद्धा योग आलेला नव्हता. भेटी तर नेहमीच होतात, पण ही भेट त्यांच्या आयुष्यातल्या सर्वांत अनमोल व सुखद क्षणांची घटना ठरली होती. राहूल आधीपासूनच पुस्तकांची चाळाचाळ करण्यात मग्न होता. काही वेळातच अनिता तेथे येऊन धडकली व तीही पुस्तकं बघू लागली. तो तीला नावाने ओळखून होता, पण तिच्याशी काहीतरी सबब पुढे करुन बोलण्याचे धैर्य त्याच्याकडून होत नव्हते. अनिता दिसायला तशी सालस, करुण, सुंदर, गोर्या वर्णाची व काळेभोर लां केस असलेली देखणी युवती होती. राहूलने तीला ज्यावेळी प्रथम पाहिले होते ना, त्यावेळीच तो तीच्यावर फिदा झाला होता. त्याला नेहमी वाटे की, तीच्याशी काहीतरी बोलावं, पण गेल्या वर्षभर तरी त्याने तसा प्रयत्न देखील करुन बघितला नव्हता. उलट त्याला ती दुसर्याच कोणासोबत गुंतलेली असेल, असे वाटे... एरवी, त्याची उपस्थिती अनिताला समजली होती, तरीही तीने पुस्तकं चाळण्याचं तीचं काम चालू ठेवलं... तीलादेखील तो वर्गात आहे म्हणून माहिती होती, पण त्यावर अधिक जाणून घेण्याचा तीनेदेखील कधी प्रयत्न केला नाही व तसं करण्याची गरज देखील तीला यापूर्वी कधी वाटली नव्हती. दोघेही विरुद्ध दिशेकडून होते, व हळूहळू एकमेकांकडे येत होते, बहुदा त्यांना त्या गोष्टीची जाणीव नसावी. कवितेचे एक पुस्तक दोघांनीही नकळत एकाच वेळी उचलले अन् जे व्हायचे नव्हते ते झाले... राहूलकडून पुस्तकाची समोरची बाजू व पहिली काही पाने तर अनिताकडून अर्ध्यापासून मधली पाने हाती लागली, हे नकळत झाल्याने दोघांकडूनही ते पुस्तक त्यांनी आपापल्या दिशेने ओढले... एखाद्यावेळी जर पुस्तकाची बांधणी जर व्यवस्थित असती तर त्याचे तुकडे झाले नसते, पण निकृष्ट दर्जाची बांधणी अन् कमी दर्जाचा कागद असल्यामुळे त्या पुस्तकाचे दोन तुकडे झाले व काही पाने अस्ताव्यस्त फाटली गेली. ताड्कन तेथील समोरच्या टेबलापाशी बसलेला एक कारकूनवजा अधिकारी आणि पुस्तके वाचण्यात दंग झालेले इतर काहीजण त्यांच्यापाशी एकमेकांशी नाहक कसलीतरी गलबला करीत आले. एव्हाना राहूलने ते पुस्तक जरा व्यवस्थित करुन जिथून उचलले होते त्या जागी ठेवण्याच्या तो तयारीत होता, पण त्या कारकूनवजा अधिकार्याने त्याच्याकडून ते हिसकावून घेतले. त्यावेळी राहूलच्या चेहर्यावरील भाव तसे पाहणार्याला चकित करुन टाकणारे होते, कारण तो इतरांकडे पाहतच अशा पद्धतीने होता की जसे काहीच झालेलं नाही... पण निःशब्द प्रदर्शन कक्षात पुस्तकाच्या फाटण्याचा आवाज थेट कक्षाच्या दरवाज्यापर्यंत ऐकू गेलेला होता. अनिता मात्र एवढी घाबरलेली होती की तीला आता फक्त रडूच कोसळायचं शिल्लक राहिलेलं होतं...<br />
<br />
"तुम्ही कॉलेजकुमार कारटी म्हणजे..." काहीशा आचरट भाषेत तो अधिकारी राहूल अन् अनिताकडे त्याचा करडा रागीट चेहरा दाखवून त्यांना खडसावत होता.<br />
<br />
"असू द्या हो... उलट आजकालची मुलं-मुली अशा प्रदर्शनांकडं फिरकत देखील नाहीत, ही गोंडस मुलं इकडं आली हीच मोठी गोष्ट आहे आपल्या संस्कृतीसाठी..." एक वृद्ध आजोबा त्या अधिकार्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.<br />
<br />
"नाही, ते काही नाही... हे पुस्तक यांच्याकडून फाटलंय त्यामुळे त्यांना त्या पुस्तकावरील किंमतीएवढी रक्कम जमा करावी लागेल..." वृद्ध आजोबांचे वाक्य मध्येच तोडीत तो अधिकारी उत्तरला.<br />
<br />
"किती द्यायचे मग?" राहूलने खिशात हात घालीत त्या अधिकार्याला तावातावात विचारले. त्याला राग येणे साहजिकच होते, कारण काही क्षणांपूर्वी तो अधिकारी त्याला व अनिताला काही-बाही बोलला होता त्यामुळे निश्चितच त्याचा राग अनावर झाला असला तरी संयम बाळगून त्याने चेहर्यावरील हाव-भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला.<br />
<br />
"एकशे वीस रुपये!" त्या फाटलेल्या पुस्तकावरील किंमत बघण्यासाठी पाने चाळीत तो अधिकारी राहूलकडे डोळे वटारीत बोलला.<br />
<br />
अनिताने लगेच बाहेर ठेवलेल्या तीच्या पर्सकडे धाव घेतली. राहूलने पैसे काढून द्यायच्या आत स्वतः द्यावयाच्या उद्देशाने ती प्रदर्शन-कक्षाच्या बाहेर पळतच गेली. लोकांनी पुस्तकं चोरून सोबत घेऊन जावू नयेत म्हणून प्रदर्शन कक्षाच्या बाहेरच लोकांनी आपापल्या पिशव्या, बॅग्ज इत्यादी ठेवाव्यात, असा नियम होता. आजही ऍडमिशन न झाल्यामुळे ती घरी जाण्याच्या तयारीत होती, पण वाटेतच तीला हे प्रदर्शन दिसले. अगोदरच्या दिवशीही ती तेथे येऊन गेलेली होती. त्यामुळे आधीच्या दिवशी न पाहिलेली पुस्तकं आज पाहायची, आणि पुस्तक-वाचनाची तशी फार आवड असल्यामुळे तीने घरी न जाता प्रदर्शनातच थोडा वेळ घालवण्याचा विचार करुन ती इथे आली होती, अन् वरील प्रसंग तीच्यासोबत अनासयाने घडला होता. ती पर्स लगबगीने धुंडाळीत होती, पण काही केल्या तीला तीची पर्स सापडत नव्हती. तीने सर्व पाहिले पण तीला काही केल्या पर्स मिळेना, शेवटी वैतागून तीने त्या अधिकार्यालाच हाक मारली, व विचारले,<br />
<br />
"अहो काका, मी इथे येतेवेळी पर्स ठेवली होती, ती मिळत नाहिये... प्लीज, बघा ना एकवेळ..."<br />
<br />
आतापर्यंत राहूलने मोजून एकशे वीस रुपये त्या अधिकार्याच्या हवाली केले होते व ते फाटलेले पुस्तक स्वतःजवळ घेतले होते... अनिताची हाक ऐकताच अधिकारी अन् तो अनितापाशी धावले... सगळीकडे शोधाशोध करुन झाल्यावर अनिताचा चेहरा एकदम व्याकूळ झाला व ती रडक्या अन् दबक्या आवाजात राहूलच्या कानात पुटपुटली,<br />
<br />
"अरे राहूल... कॉलेजहून इकडे येण्याअगोदर, माझी मैत्रीण सुमेधासोबत मी, श्री कॅफेटेरीयामध्ये कॉफी प्यायले होते, आणि बहुतेक तिथेच मी माझी पर्स विसरलीय... आणि खरं सांगायचं झालं तर पर्समध्ये तीस हजार रुपये आहेत..." ती कितीही दबक्या आवाजात बोलली असली तरी, तीचा आवाज राहूल व्यतिरिक्त नजिकच्या बर्याच जणांपर्यंत पोहोचला होता... पण तीस हजारांचा आकडा ऐकताच सर्वांनी मौन पाळणेच योग्य समजले असावे.<br />
<br />
"काऽऽयऽऽ? तीऽऽस हजार रुपये?" राहूलची तर बत्तीशीच बसायची बाकी होती...<br />
<br />
"चल पटकन..." प्रदर्शन-कक्षाच्या बाहेर ठेवलेली आपली कॉलेज-बॅग गळ्यात अडकावित त्याने त्याच्या बाइकची किक मारीत अनिताला मागे बसण्यासाठी खूण केली. अनिताचा कंठ दाटून आला होता, साहजिकच डोळ्यांत पाणी आल्यामुळे तीला सर्वकाही अस्पष्ट व अंधुक दिसत होते... कशीबशी ती राहूलच्या पाठीमागे स्वतःला थोडंफार सावरुन बसली. आता काहीही बोलण्याची तर तीच्यात शक्तीच उरली नव्हती...<br />
<br />
राहूल जमेल तेवढ्या भरधाव वेगाने श्री कॅफेटेरीयाकडे बाइक हाकत होता. त्यांचा कॉलेजला लागूनच ते कॉफीसाठीचे शहरातील एक नावाजलेले रेस्टॉरंट होते. तथापि, तेथील मालकाशी राहूलचे संबंध तसे चांगले होते. काही मिनिटांतच ती दोघे कॅफेटेरीयासमोर येऊन दाखल झाली. राहूलने लगेच गाडी हाफ स्टँडवर पार्क करुन कॅफेटेरीयात धाव घेतली... अनितासुद्धा त्याच्या पाठोपाठ पळतच गेली. जिथे ती व तीची मैत्रीण सुमेधा बसल्या होत्या, तिथे ती गेली... पण तिथं काही तीला पर्स आढळली नाही. तीने लगेच सुमेधाला फोन करुन विचारण्याचा प्रयत्न केला की, तीने तर पर्स सोबत नेली नाहिये ना... पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सुमेधाकडून नकारार्थी उत्तर मिळताच राहूल काउंटरपाशी गेला व त्याने कॅफेटेरीयाच्या मालकाकडे त्याबद्दल विचारणा केली. झाला प्रकार कॅफेटेरीयाचा मालक पाहतच होता, अन् त्याने अनिताला ओळखले देखील होते. राहूलशी त्याचे संबंध जरा चांगले असल्याने त्याने राहूलचे बोलणे व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकले. अनिता राहूलच्या मागेच उभी होती... तीने देखील बोलण्याचा प्रयत्न केला, पण तीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते... कॅफेटेरीयाच्या मालकाने लगेच अनिताची पर्स राहूलच्या हाती दिली, अनिताने पर्स राहूलच्या हातात असतानाच पर्सची चैन उघडून त्यामधून एका प्लास्टिकच्या पिशवीत दूमडून ठेवलेले बंडल काढले अन् ते राहूलच्या हाती देत पर्स स्वतःकडे घेतली. राहूलने त्या प्लास्टिकच्या पिशवीतून नोटांचे बंडल काढून अधाश्यासारखं मोजण्यास सुरूवात केली.<br />
<br />
"हुश्शऽऽ... बरोब्बर आहेत... हे घे..." हसर्या चेहर्याने अनिताकडे पाहत तीला त्या नोटा देत राहूल उत्तरला. गेल्या अर्ध्या तासाभरापासून गंभीर भाव असलेल्या त्याच्या चेहर्यावर एकदम काही कोटींचा खजिना हाती लागावा, त्यावेळी जसा अत्यानंद होत असेल, तसे भाव त्याच्या चेहर्यावर झळकले.<br />
<br />
"यापूर्वीही अशा वस्तू विसरण्याच्या अनेक घटना आमच्या कॅफेटेरीयामध्ये घडल्या आहेत... पण मी आणि येथील सर्व कर्मचारी आमच्या कामाशी प्रामाणिक आहोत. माझ्याजागी जर दुसरा कोणी असता, तर त्याने निश्चितच तुमची बॅग दिली नसती... आणि खरं सांगायचं म्हणजे, मला किंवा इथल्या कोणालाही याबद्दल मुळीच माहिती नव्हती की तुमच्या या बॅगमध्ये एवढे पैसे आहेत म्हणून... असो... तुम्हाला आतापर्यंत फार त्रास झाला असणार, झाल्या प्रकाराबद्दल..." कॅफेटेरीयाचा मालक अत्यंत सौम्य व विनम्र भाषेत बोलत होता. तिथे बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आणि इतर गिर्हाईकांना झाला प्रकार समजण्यास फार वेळ लागला नाही. कॅफेटेरीयाच्या मालकाचे वरील उद्गार ऐकताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाटाचा त्याच्यावर वर्षाव केला,<br />
राहूल व अनितानेही कॅफेटेरीयाच्या मालकाचे व इतर कर्मचार्यांचे आभार मानले व ते तिथून बाहेर पडले. तीला आतातर रडू आवरणे अवघड झाले होते. तीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडत होते. यावेळी राहूलने बाइकवर बसण्यासाठी तीला कसलीही खूण केली नव्हती वा तो तसं बोललाही नव्हता, पण कोण जाणे, ती त्याच्या त्याच्या पाठीमागे बाइकवर विराजमान झाली...<br />
<br />
राहूलने बाइक शहराच्या बाहेर जाणार्या मुख्य रस्त्याच्या दिशेने वळवली. राहूलच्या मनात गेल्या तासाभराचे चित्र खेळू लागले. पुस्तक प्रदर्शनात अनिताचं येणं, त्यानंतर पुस्तक फाटण्याचा विस्मयकारी प्रसंग, नंतर पैसे देण्यासाठी आपल्या पर्सकडे धावलेली अनिता, मध्यंतरी तेथील अधिकार्याशी झालेली वादावादी, अनिताची पर्स हरवल्याची बातमी कळणं, तीचा त्यावेळचा रडका चेहरा, नंतर तीचं त्याच्या पाठीमागे बाइकवर बसणं, कॅफेटेरीयातील ताज्या घडामोडी.... सर्वकाही आठवून राहूल स्वतःशीच स्मीत करीत मिश्किलपणे जोरजोरात खिदळत होता. अनिताचं रडणं आता जरा कमी झालं होतं, साहजिकच होतं म्हणा ते... राहूलही जाणून होता, त्याने शहराच्या बाहेर असलेल्या एका शाळेकडे जाणार्या रस्त्याकडे त्याची बाइक वळवली. अनिताचे रस्त्यावरील रहदारीकडे फारसे म्हणण्यापेक्षा मुळीच लक्ष नव्हते. तीने राहूलच्या पाठीवर तीचा उजवा गाल, कान दबेल अशा स्थितीत स्वतःला झोकून दिलं होतं... कॅफेटेरीयापासून शहराच्या बाहेर येईपर्यंत तीने याच स्थितीत राहूलच्या पाठीवर उसासे सोडले होते. पहिले-पहिले तर राहूलही झाला प्रकार पहिल्यापासून आठवण्यात गर्क होता, त्यामुळे त्याला तीच्या उसासे टाकण्याच्या गोष्टीबद्दल जराही संवेदना जाणवल्या नाहीत... पण नंतर शाळेकडे गाडी वळवतांना त्याला त्याची पाठ ओली झाल्याचं जाणवलं व ती कशाने झाली असणार हे देखील कळालं... तो हसतच अनिताला म्हणाला,<br />
<br />
"अगं आधीच एवढी थंडी वाजतीय, अन् त्यात तू रडून-रडून माझी पाठ ओली केलीहेस बघ... शिवाय तुझ्या मोत्यांसारख्या टपोर्या अश्रुंनी माझ्या शर्टावर किती सुंदर नक्षी बनली असेल नाही... माझ्या आईला फार आवडेल बघ... उद्या त्याच ठिकाणी पाठीवर धपाटे खाऊन यावे लागेल मला, आईच्या हातचे..."<br />
<br />
हे राहूलचं बोलणं ऐकून, न राहावून अनितादेखील हसायला लागली अन् हसतच त्याच्या पाठीवर झोकून दिलेले आपले मुंडके हटवून हलकेच बुक्क्यांचा मारा करीत ती म्हणाली,<br />
<br />
"चल चावट कुठला... एखाद्या रडक्याला हसवण्याचं काम तुला फार छान जमतं रे..."<br />
<br />
"ह्म्म, तेवढंच जमतं मला फक्त..." राहूलने अनिताच्या म्हणण्याला दुजोरा दिला व दोघेही हसायला लागले.<br />
<br />
संध्याकाळचे चार वाजून गेले होते, अन् शिराळ असल्याने उन्हाचा त्रास नव्हताच... शिवाय तेथील त्या शाळेला काही कारणास्तव त्या दिवशी सुटी होती... राहूलच्या तर मनासारखं झालं होतं आणि होत होतं आज सगळं... रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्ट्याजवळ राहूलने बाइक पार्क केली. दोघेही त्या कट्ट्यांवर जाऊन बसली अन् एकमेकांकडे चेहर्यावर स्मीत आणून एकटक पाहू लागली... आता हे देखील साहजिकच आहे, सुमारे १० मिनिटं ती दोघं नुसतं हसत होती, एकमेकांकडे पाहून... झालं, साडेचार वाजण्याच्या सुमारास राहूल एकदम उठून उभा राहिला व तीच्यासमोर दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर वाकून तीला म्हणाला,<br />
<br />
"ए अनिता... तू खूप सुंदर आहेस अगदी रतीप्रमाणे, असं वाटतं की तुझ्याकडे नुसतं पाहतंच राहावं... मला तू खूप खूप आवडतेस... मी तुझ्यावर आजवर जरी प्रेम करीत नसलो, तरी आतापासून यानंतर मात्र अखेरपर्यंत जीवापाड प्रेम करीन. तुझ्यासाठी वाट्टेल ते करीन, प्रसंगी प्राणही देईन. तू माझी होशील का गं?"<br />
<br />
तो होकाराची वा त्याच्या म्हणण्याला दुजोरा तरी मिळेल या भावनेने, तन्मयतेने अनिताकडे एकटक पाहत होता.<br />
क्षणभर त्याच्याकडे शांत मुद्रा ठेऊन अनितासुद्धा पाहत राहिली व नंतर तीही त्याला म्हणाली,<br />
<br />
"अरे हो रे... मी तुझीच आहे व राहीन... त्यात विचारण्यासारखं काय एवढं... मी तर माझं सर्वस्वच तुला अर्पण केलंय... तुझा माझ्यावर संपूर्ण अधिकार आहे आता... पण फक्त माझी एक विनंती आहे ती तू मान्य केलीस तर फार छान होईल..."<br />
<br />
"बोल गं प्रिये... तुझं काहीही ऐकायला मी तयार आहे..."<br />
<br />
"आपण आज पहिल्यांदाच असं भेटतो आहोत... माझ्यामते व बहुदा तुलाही असं वाटत असेल, की आपण एकमेकांना जाणून घेणं फार फार गरजेचं आहे. वाटतंय ना?"<br />
<br />
"ह्म्म, बरोबर बोलतीहेस तू... पटतंय मला तुझं... मग काय करायचं ठरवलंहेस तू?"<br />
<br />
"आपलं एकमेकांवरील प्रेम कधीच कमी होणार नाही, तशी त्याची सर्व काळजी आपण दोघंही आपापल्या परीने घेत जावू... आतापासून ते आपली डिग्री मिळेपर्यंत म्हणजे तब्बल तीन वर्षे आपल्या एकमेकाच्या सानिध्यात राहून जाणून घेता येईल... चालेल?"<br />
<br />
"चालेल..."<br />
<br />
"नंतरचा विचार आपण याच तारखेला, याच ठिकाणी, तीन वर्षांनंतर बसून करूयात, ठिक?"<br />
<br />
"हो गं बाई... मंजूर... जशी राणीसाहेबांची आज्ञा..."<br />
<br />
संध्याकाळचे ५ वाजून गेले तरी अजुनही त्यांचं दिवसभरातील झालेल्या एकन्-एक प्रसंगांवर हसणं काही आवरत नव्हतं...<br />
<br />
<div style="text-align: center;"> ----</div><br />
आज त्याच कट्ट्यावर, त्याच तारखेला म्हणजे, १७ ऑगस्टला, तीन वर्षांनंतर ती दोघं भेटून भावी आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी पुन्हा एकत्र आली होती..<br />
<br />
<br />
<br />
<b>(क्रमशः)</b><br />
<br />
<hr width="200" /><blockquote><ul><li><b><a href="http://3.ly/vdvY"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग २ </i></a></b></li>
<li><b><a href="http://3.ly/mxCx"><i>अशीही एक लव्ह स्टोरी - भाग ३ </i></a></b></li>
</ul></blockquote>Unknownnoreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-54764262320696378212010-08-06T09:43:00.001+05:302010-08-22T14:18:08.723+05:30६ ऑगस्ट...<i><span style="font-size: x-small;">(वाचलेल्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी व अमेरिकेवरील द्वेष जाहीर करण्यासाठी म्हणून हा लेख लिहिण्याचा यथेच्छ खटाटोप!)</span></i><br />
<br />
६ ऑगस्ट... तारीख ऐकतानाच त्या निष्पाप लक्षावधी लोकांच्या आर्त किंकाळ्या तुमच्या कानांत घुमल्या नाहीत, तर नवलच...! दुसर्या जागतिक महायुद्धाच्या काळात आशिया (खासकरुन चीन) व आखाती देशांमध्ये साम्यवादाची बीजे अंकुरत होती, त्याला पायबंद घालणे गरजेचे होते, शिवाय जपानचे चीनशी पार्श्व-ऐतिहासिक शत्रुत्व उघड होते, जपानसाठी योग्य संधी चालून आलेली होती. चीनला आधीच रशियाचे सहकार्य होते, त्यामुळे जपानला जर्मनीकडून यावे लागले. चीनसारख्या हत्तीसमोर एखाद्या उंदरासारख्या वाटणार्या जपानने कसल्याही शिल्लक मदतीशिवाय एक तृतियांश चीन काही महिन्यांतच काबीज करुन टाकला होता. या काळात जपानने आपला सर्व राग चीनवर काढला.. शेवटी जय झाल्यावर गर्व सामावलेली जयाची आणखी भूक वाढतेच... पॅसिफिक महासागरात त्यावेळी अमेरिकेचे वाढणारे वर्चस्व जपानला मुळीच पचण्यासारखे नव्हते, शिवाय पर्ल हार्बर बेटावर अमेरिकेच्या कारवायांमध्ये होत असलेली वाढ जपानसाठी धोक्याची घंटा होती. जपानने वेळीच सावध होऊन पर्ल हार्बर वर एका-पाठोपाठ आकस्मित हवाई हल्ले करुन अमेरिकेच्या तेथील सर्व युद्धसाहित्याची अक्षरशः नासाडी केली, यामध्ये अमेरिकेच्या नौदलातील सैनिकांव्यतिरिक्त शेकडो सामान्य नागरिकांचे बळी गेले. या घटनेचा अमेरिकेने तीव्र निषेध नोंदवत दोस्त राष्ट्रांच्या बाजूने दुसर्या महायुद्धामध्ये अचानक उडी घेतली. येथेच हिटलरची पंचाईत झाली. आता रशिया पाठोपाठ अमेरिकेसारख्या आणखी एका बलाढ्य राष्ट्राशी जर्मनी व इतर अक्ष कराराने जोडल्या गेलेल्या राष्ट्रांना कुरघोडी करणे भाग होते. तरीसुद्धा हिटलरने न डगमगता व खचून न जाता हे आव्हान पेलले व आपली विजयाची घोड-दौड चालू ठेवली.<br />
<br />
<a name='more'></a><br />
<br />
याच काळात जर्मनी, रशिया व या दोहोंच्या पाठोपाठ अमेरिकेमध्ये आण्विक प्रकल्पांना सुरुवात देखील झालेली होती. अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रकल्पाने यामध्ये आघाडी घेतली. सर्वच बड्या राष्ट्रांमधील गुप्तहेर-संघटना या प्रकल्पांवर नजर ठेऊनच होत्या. शंका, लाचखोरी इत्यादी प्रकारांमुळे या प्रकल्पांमध्ये सामील असणारे अनेक मुख्य संशोधक व शास्त्रज्ञ बळी गेले. अमेरिकेला सर्वप्रथम यश मिळाले व त्यांनी चाचणी घेण्याच्या उद्देशाने म्हणा वा जपानवर आपला सूड काढायच्या हेतूने म्हणा, दिनांक ०६ ऑगस्ट, १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या गजबजलेल्या शहरावर त्यांचा पहिला अणु-बॉम्ब टाकून स्फोट घडवून आणला. काही क्षणांतच ७० हजारांच्या जवळपास लोकं या नर-संहारक घटनेने दगावले. व त्या काळापासून आजपर्यंत नुसत्या हिरोशिमामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. किरणोत्सारी पदार्थ किती नरसंहारक असतात, याची जाणीव अमेरिकेला झालीच नाही, लगेच दिनांक ०९ ऑगस्ट,१९४५ म्हणजे लगेच दोन दिवसांनी त्यांनी जपानच्याच नागासाकी शहरावर दुसरा अणु-बॉम्ब स्फोट घडवून आणला. सुमारे १४ लक्ष निष्पाप जीव तत्काळ जीवाला मुकले व त्या प्रलयकारी भस्मासुराच्या पोटात जाऊन राख झाले. जपानने या दोन घटनांमुळे आजपर्यंत सुमारे ३० टक्के प्राणहानी नाहक सहन केलीय, आनुवांशिक दोषांचे बळी ठरलेल्यांची तर गणतीच नाही... युद्ध-काळात आण्विक-अस्त्रे वापरणारे अमेरिका हे इतिहासात पहिले राष्ट्र (व अजुनही पहिलेच आहे) ठरले. सहनशीलतेच्या पलीकडील दुःख पचवताना त्या निष्पाप लोकांच्या, निष्पाप बालकांच्या, निष्पाप महिलांच्या किंकाळ्या अजुनही घुमत आहेत. मी ऐकतोय... पुढे दुसरे-महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर एकमेकांवर कुरघोडी घालण्याच्या उद्देशाने रशिया व अमेरिका यांच्यात चुरस सुरु झाली. काय हे, रशियाच्या चेर्नोबील शहरातील घटना म्हणजे नुसता हाहाकार... थोड्याश्या चुकांमुळे अख्खे चेर्नोबील उडाले... इतिहास साक्ष आहे... पण कोणीच, खास करुन अमेरिकाने या घटनांपासून काहीच व कसलाही बोध घेतल्याचे वाटत नाही. उलट आता तर आशियामध्ये रशिया व चीनला आव्हान देण्यासाठी शिवाय इरानला कमकुवत दर्शवण्यासाठी उत्तर व दक्षिण कोरिया मधील भांडणामध्ये तेल ओतण्याचे काम अमेरिकेने चालू केलेय... <br />
<br />
<b>बस्सं, आता एका ठिणगीची गरज आहे, क्षणार्धात अख्खी पृथ्वी भस्म होऊन जाईल!!! </b>Unknownnoreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-55119638857685913472010-06-11T11:28:00.001+05:302010-06-11T12:40:37.889+05:30ऐसे दिस जाती...काही प्रश्न आहेत:<br />
<br />
नुकत्याच परिक्षा संपल्या... महिनाभरापासून नुसतं टेन्शन होतं परिक्षेचे... झाल्या एकदाच्या! असो... प्रत्येक वेळी नव-नविन अनुभव मिळताहेत, अनेकांकडून मोलाचे सल्ले मिळताहेत, त्यांचा मला पुढे नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही... पण हाच मार्ग योग्य आहे का जगण्याचा, शिकण्याचा, अनुभव मिळवण्याचा, आणि दररोज दिवस (वाया) घालवण्याचा?<br />
<br />
मला इंजिनिअरिंगला अजुन दोन वर्षे जायची आहेत, तोपर्यंत मला माझ्या फिल्डमधले आवश्यक तेवढे ज्ञान प्राप्त होईल खरे, पण ते तेवढेच असावे की मी माझ्या इच्छा-आकांक्षा अजून उंचावून इतरही अनेक गोष्टींवर लक्ष द्यायला हवे? तुम्हा लोकांचे जीवन दररोजचे रेग्युलर ऑफिस, नोकरी, घरकामे इत्यादी एवढ्यावरच थांबते का, की तुम्ही त्यात रंग भरण्यासाठी अजुन काही करता?<br />
<br />
माझा ह्या लेखात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सारांश एवढाच आहे, की हे जे दिवस जाताहेत, ते असेच जाऊ द्यावेत का?<br />
<br />
सल्ले, अनुभव, आणि मला व माझ्यासारख्या इतरांना उपयोगी ठरतील अशा प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत...Unknownnoreply@blogger.com16tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-47725312346054333282010-04-05T15:50:00.006+05:302010-06-30T12:41:19.452+05:30प्रोजेक्ट कसा तयार करावा?परवा दिवशीच कॉलेजमध्ये आमच्या चार जणांच्या ग्रुपने एक मिनी प्रोजेक्ट सबमिट केला. त्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीवर एखादी पोस्ट लिहावी, असे काल मनात आले, पण पोस्ट लिहितांना काय लिहावे, हा विचार माझ्या मनात घोळत होता. मग म्हटलं, आपण प्रोजेक्ट साठी जशी तयारी केली होती, तशीच इथे पोस्टली तर.. पण त्यासाठी चित्रे काढणे तर खुप अवघड काम!! मग मला <a href="http://twitter.com/atthelife" target="_blank">सोमेश दादा</a>ने सांगितलेले एक सॉफ्टवेअर आठवले! तुम्हीही त्याच्या "<a href="http://thelife.in/" target="_blank">द लाईफ!</a>" संस्थळावर अनेक माईंडमॅप्स पाहिले असतील.. तसाच एखादा माईंड मॅप मीसुद्धा काढावा असे ठरवले. त्यासाठी त्याने सुचवलेले ते सॉफ्टवेअर शेवटी मी माझ्या उबुन्टू मशीनवर इन्स्टॉल केले. त्याचाच वापर करून मी खालील माईंडमॅप तयार केला आहे.<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a ;="" href="http://bit.ly/9irovz" imageanchor="1" rel="lightbox" style="margin-left: auto; margin-right: auto;" target="_blank" title="माईंडमॅप"><img border="0" height="177" src="http://bit.ly/9irovz" class="captify" alt="माईंडमॅप - प्रोजेक्ट कसा तयार करावा?" width="400" /></a></td></tr>
<tr style="color: black;"><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: small;">माईंडमॅप स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर क्लिक करा.</span></td></tr>
</tbody></table><br />
वरील माईंडमॅपच्या आधारे तुम्हाला मिळालेला एखादा कोणत्याही विषयाशी संबंधित असणारा प्रोजेक्ट (उदा. एखादा ब्लॉग किंवा संस्थळ!) कसा तयार करावा याचा अंदाज आला असेलच, तरीही त्याबद्दल मी आणखी डिप मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो...<br />
<br />
<br />
<a name='more'></a><br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी १: तयार रहा!</b></div>तुम्हाला ज्या विषयाबद्दल नेहमी भिती वाटते, त्याच विषयाशी संबंधित एखादा प्रोजेक्ट तयार करावयास मिळू शकतो, त्यामुळे कसलिही भिती न बाळगता, तयार रहा!<br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी २: लक्षपूर्वक ऐका!</b></div>तुम्हाला मिळत असलेल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगणार्या शिक्षक/अधिकारी/बॉसचा एकन्-एक शब्द काळजीपूर्वक ऐका. यावेळीच तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टबद्दल सर्व काही माहिती मिळू शकते. काही अडचणी असतील (तांत्रिक/वैयक्तिक) तर त्या त्यांना विचारून लगेच दूर करण्याचा प्रयत्न करा.<br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी ३: आवश्यक माहिती टिपून ठेवा.</b></div>पायरी २ मध्ये तुम्ही ऐकत/पाहत असलेली सर्व आवश्यक माहिती टिपण्याचा प्रयत्न करा. याच माहितीचा तुम्हाला नंतर खुप फायदा होऊ शकतो.<br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी ४: माहिती नोंदवतांना the, a सारखे बिनकामीचे शब्द सोडून द्या!</b></div>पायरी ३ मध्ये माहिती टिपत असतांना the, a सारखे शब्द सोडून दिले तरी चालतील. शिवाय काही शब्द शॉर्ट करून (उदा. definition लिहिण्यापेक्षा def<sup> n</sup> असे) लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला माहिती टिपतांना कमी वेळ लागेल, व जास्तीत-जास्त माहिती टिपता येईल!<br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी ५: मिळवलेली माहिती बरोबर आणि अद्ययावत आहे की नाही हे तपासा.</b></div> मिळालेल्या प्रोजेक्टसाठी तुम्ही जमा केलेली माहिती ही योग्य आणि अप टू डेट आहे की नाही हे तपासा. यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षक/अधिकार्याशी सुद्धा सल्ला-मसलत करू शकता!<br />
<div style="color: #274e13;"><br />
</div><div style="color: #274e13;"><b>पायरी ६: सर्व माहिती मिळाल्यानंतर ती एकत्र करून तीचा व्यवस्थित अभ्यास करा.</b></div> प्रोजेक्टसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती गोळा केल्यानंतर ती पद्धतशीर लावणेही तेवढेच गरजेचे आहे. त्या माहितीचा मग कसून अभ्यास करा.<br />
<div style="color: #274e13;"><br />
</div><div style="color: #274e13;"><b>पायरी ७: अभ्यास केल्यानंतर त्या माहितीच्या आधारे प्रोजेक्टचा नमुना आराखडा तयार करा.</b></div>पायरी ६ मध्ये तुम्ही एकत्रित केलेल्या माहितीचा चांगला अभ्यास केल्यानंतर त्याआधारे तुमच्या प्रोजेक्टचा एक छानसा नमुना आराखडा (लेआउट) तयार करा आणि त्यावर तुमच्या ग्रुप मेंबर्सचे काय मत आहे, ते जाणून तो आराखडा फायनल करा.<br />
<div style="color: #274e13;"><br />
</div><div style="color: #274e13;"><b>पायरी ८: आराखड्याच्या साह्याने प्रोजेक्ट साठी लागणारे साहित्य मिळवा.</b></div>आता तुम्ही प्रोजेक्टचा आराखडा बनवला आहात, त्यामुळे तुम्हाला त्या आराखड्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टींची गरज पडेल, त्यांची जमवा-जमव करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तत्सम क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची मदत घ्या.<br />
<div style="color: #274e13;"><br />
</div><div style="color: #274e13;"><b>पायरी ९: ग्रुप-प्रोजेक्ट असल्यास आपापली कामे वाटून घ्या.</b></div>तुम्ही प्रोजेक्ट जर ग्रुपमध्ये तयार करत असाल, तर कसलाही संशय, द्वेष वा मत्सर किंवा कमीपणा न बाळगता सर्व कामे सर्व ग्रुप-सदस्यांमध्ये सारखी वाटून घ्या.<br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी १०: वेळेचे नियोजन करा.</b></div>प्रोजेक्टसाठी दररोज किती वेळ खर्च करायचा, यासाठी वेळेचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे, नाहीतर विनाकारण तुमचा अमूल्य वेळ खर्ची होईल, शिवाय प्रोजेक्टसाठीचे कामे पण योग्य वेळेत पूर्ण होणार नाहीत.<br />
<br />
<div style="color: #274e13;"><b>पायरी ११: मिळालेले काम मन लावून करा.</b></div>आधी सांगितल्याप्रमाणे कसलाही कमीपणा वाटू न देता, वाट्याला आलेले काम मन लावून करा. शेवटी तुमच्या अथक परिश्रमाचे फळ तुम्हाला नंतर नक्कीच मिळेल! थिंक बी पॉसिटिव्ह!<br />
<div style="color: #274e13;"><br />
</div><div style="color: #274e13;"><b>पायरी १२: वेळेच्या आत प्रोजेक्टवरील काम संपवून तो सबमिट करा!</b></div>प्रोजेक्ट सबमिशनची डेडलाईन यायच्या आत प्रोजेक्टवरील सर्व कामे संपवून तो सबमिट करा. यामुळे तुमचे शिक्षक/अधिकारी/बॉस तुमच्यावर अतिशय खुष होण्याचे बरेचसे चान्सेस असतात!<br />
<br />
<div style="color: #cccccc; text-align: center;"> ****************************** </div><br />
तर मित्रहो, कसा वाटला हा माईंड मॅप मग?Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-39549725331374088832010-04-02T11:40:00.001+05:302010-04-06T17:51:54.400+05:30एक्जाम्स...<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnKExNgvw6ZLdaIsXOAPEpnW7A-3FTVc_enxjQht9cr2nbsvPlTJVX7WHMdvF8nDLE3CtY9_FQ99uhQybOuwbVi9KLbs6GZnQlGCayCjlcRKVJl3Owy2JBdDU9J0hUWUGE6ka4WuhFxFer/s1600/exam.jpg" /></div>बहुदा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझे चौथ्या सेमिस्टरचे पेपर चालू होतील... कित्येक दिवसांपासून ब्लॉगवर काहीच लेखन केलेले नाही, त्यामुळे मलाही बोर होतंय, पण माझा एक सबजेक्ट बॅक आहे आणि तुम्हाला तर माहित असेलच की इंजिनिअरिंगला अभ्यास, मुले पी.एल. च्या सुट्ट्यामंध्येच करतात म्हणून... सेम हिअर टू..! चौथ्या सेमच्या कोणत्याच विषयाचा अजुन अभ्यास मी चालू केलेला नाहीये, पण आता करावा लागेल. शिवाय प्रोजेक्ट्स, असाइनमेण्ट्स, प्रॅक्टिकल्स, इत्यादींच्या सबमिशनची डेट लाईन पण काही दिवसांवरच आहे!!!<br />
<br />
असो... मी अभ्यासाला लागतोय आता... नेटवर ऑनलाईन तर मी असतोच तसा, <b><a href="http://twitter.com/suruwat" target="_blank" title="ट्विटरवर माझ्याशी थेट चर्चा करा!">ट्विटर</a></b>, <a href="http://facebook.com/vishaltelangre" target="_blank" title="माझे फेसबुक!">फेसबुक</a>, <a href="http://bit.ly/aKkfpY" target="_blank" title="ऑर्कुटवर सुद्धा आहे!">ऑर्कुट</a> आणि <a href="http://www.google.com/buzz" target="_blank" title="गूगल बझ">बझ</a> वरही...!!! पण ब्लॉगवर नविन लेख लिहू शकण्याची शक्यता कमी आहे!<br />
<br />
<b><a href="http://marathimandali.com/" target="_blank">मराठी मंडळी</a></b>, <a href="http://techmarathi.com/" target="_blank">टेक मराठी</a> या संस्थळांवर थोडेफार लेखन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे काही दिवसांत.. परिक्षा झाल्यानंतर तर तेच कामं आहेत म्हणा..!Unknownnoreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-54240656345591537302010-03-16T10:58:00.002+05:302010-04-06T17:51:22.735+05:30गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjBXhms879a5-4Y7D5f7TMcQCJJa9a2Q5wWzuNZYxtjyiD8JHcVBNdqKTJmsdKII6YkY3wR4sQ6a1-9NjFoDAlQ8cqkcgp6LdrtAPO56HElX4bkyFAR1cX7sdaWTPbiroPfXz9-MySqHLfU/s400/bb-gudhi-padwaa.png" width="295" /></div><br />
<div style="color: orangered; text-align: center;">आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा</div><div style="color: orangered; text-align: center;">सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !</div><div style="color: orangered; text-align: center;">जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन</div><div style="color: orangered; text-align: center;">नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !</div><div style="color: orangered; text-align: center;">साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख</div><div style="color: orangered; text-align: center;">या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..</div><div style="color: orangered; text-align: center;">येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडू द्या</div><div style="color: orangered; text-align: center;">मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढू द्या.</div><div style="color: orangered; text-align: center;">नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा</div><div style="color: orangered; text-align: center;">माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !</div>Unknownnoreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-19358185173000619342010-02-27T09:44:00.004+05:302010-04-06T17:50:30.090+05:30मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!<div style="color: #ff6600; text-align: center;"><span style="font-size: small;"> लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ।</span></div><div style="color: #ff6600; text-align: center;"><span style="font-size: small;">जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।</span></div><div style="color: #ff6600; text-align: center;"><span style="font-size: small;">धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।</span></div><div style="color: #ff6600; text-align: center;"><span style="font-size: small;">एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥</span></div><br />
<div style="text-align: left;"><blockquote><b> 'मराठी भाषा दिवस' च्या सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!</b></blockquote><a href="http://bit.ly/aLFXaR" target="_blank"><span style="font-size: x-small;">( मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी.)</span></a></div>Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-20813271187189790302010-02-25T19:02:00.006+05:302010-04-06T17:49:53.217+05:30सादर करीत आहोत: "मराठीमंडळी.कॉम"<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div style="text-align: center;"><b>सादर करीत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, </b></div><div style="color: red; text-align: center;"><a href="http://www.marathimandali.com/" target="_blank"><b><span style="font-size: x-large;">मराठीमंडळी.कॉम</span></b></a></div><div style="text-align: left;"><b> </b></div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: center;"><b>यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.</b></div><div style="text-align: center;">फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.</div><div style="text-align: center;">रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)</div><div style="text-align: center;">आपली ऑनलाईन<br />
<div style="color: red;"><span style="font-size: large;"><a href="http://marathimandali.eventbrite.com/" target="_blank">उपस्थिती नोंदवा</a>.</span></div><br />
<u><b>अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा</b></u><br />
pankajzarekar[AT]gmail[DOT]com<br />
mebhunga[AT]gmail[DOT]com<br />
aniket.com[AT]gmail[DOT]com<br />
vikrant.deshmukh888[AT]gmail[DOT]com<br />
vishaltelangre[AT]gmail[DOT]com<br />
<b><br />
</b><br />
<b><br />
</b></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><img border="0" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhf1dDCJHhelCotHqmgKdpnuljN8zBPdBPtkJxezYsmPqGLzxxNrnwptV3y0YqG3eRt45VGy4kvFQpeqFYUavZaasGvFKI4UZzN8VaWdiX5MP9kENi55cD4loqR9uSfxiRmmx38IBdtnbl8/s400/mm-invitation.jpg" width="273" /></div><div style="text-align: center;"><b></b></div><div style="text-align: center;"></div><a name='more'></a>ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा.<br />
होय तोच मराठी जिथे प्रांत उगवत्या सुर्याच्या साक्षीने मंदिरातल्या काकडआरतीबरोबरच मशिदीची पहिली सुरेल बांगही तेवढीच सुंदर ऐकू येते. जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीने अवघ्या जगाला वेडे केले. तुकोबांच्या अभंगांनी अवघा मनुष्यगण अद्वैत झाला. संत एकनाथांनी जगाला भूतदयेचा संदेश दिला. रामदास स्वामींनी बलोपूजेचा मंत्र फुंकला.<br />
याच संत-महंतांपासून स्फूर्ती घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, शिवाजी महाराजांनी याच ओघवत्या मराठी भाषाकौशल्यावर जेधे, पिंगळे, देशपांडे, गुजर, मालुसरे अशी वाघाच्या काळजाची माणसे जोडली, महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रांत जोडला आणि परक्या शक्तींना आपल्या तलवारीच्या आणि या मराठी मातीतून आलेल्या धाडसाच्या जोरावर पाणी पाजले. याच मराठी धर्मापायी संभाजीराजांनी मृत्यू कवटाळला.पेशव्यांनी शिंदे फडणीसांच्या बळावर अटकेपार झेंडे लावले. तात्या टोपेंनंतर वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची पताका उभारली आणि पुढे टिळक, आगरकर आणि सावरकरांसारखे निधड्या छातीचे वीर ती पताका घेऊन मिरवले.<br />
<blockquote>गोखले, आंबेडकर, कर्वे, फुले, विनोबा भावे, भाऊराव पाटील, कॉ. डांगे यांसारख्या समाज धुरिणांनी जो पाया घालून दिला होता त्यावर बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय, अशासारख्यांनी कळस उभारला. कला-क्रीडा आणि साहित्यामध्येही फाळके, मंगेशकर, प्रभात, भीमसेन जोशी, पुल देशपांडे, माडगूळकर, तेंडुलकर ते आजचे सलील-संदीप, अजय-अतुल, गावसकर, कुंटे, हजारे, वाडेकर अशा अनेक रथी-महारथींनी जग पादाक्रांत केले आहे.</blockquote><br />
ही सगळी ऊर्जा कुठून आली? त्याचे एकच उत्तर आहे “आमची मराठी”. होय तीच मराठी अस्मिता जी सह्याद्रीच्या कातळकड्यांत आहे, भीमा-कृष्णा-कोयनेच्या तीरावर आहे, कोकणातल्या लाल मातीत आहे, विदर्भाच्या रांगड्या बोलीत आहे, मराठवाड्यातल्या अजंठा-वेरुळच्या पाषाणकलेत आहे, सातपुड्याच्या थंड हवेत आहे. त्याच मातीने आम्हाला जन्म दिलाय. आणि तिचे आमच्यावर सात जन्माचे ऋण आहे. या ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. पण थोडी का होईना परतफेड नक्की करावीशी वाटते आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. “मराठी मंडळी”चा…!!!<br />
<br />
नऊवारी जरीकिनारी पैठणी, बुगड्यांची माळ आणि पसाभर मोठी नथ घातलेले खानदानी सौंदर्य या मराठी भाषेच्या अलंकारामध्ये दडलेले आहे. शाहिरी पोवड्याची डफाची थाप, लेझीमची गाज आणि ढोल-ताशाचा नाद मराठी भाषेत वीररस काठोकाठ ओतत आहेत. ढोलकीवरचा ताल आणि घुंगराचा छणछणाट ऐकून मराठीचा घट शृंगाररसाने निथळत आहे. नाट्यसंगीताचा आब मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आहे. तसाच सुमधुर भावगीताने धबाबा कोसळणारा अधीर मनःप्रपातही संथ होतो आहे.<br />
संक्रांतीच्या तिळगूळाने ऊबदार आणि मधुर झालेली मराठी वाणी जहालपणे शिमग्याला मुक्तहस्ते शिव्या देऊ शकते आणि धुळवडीला गटारात लोळवू शकते. काळ्या आईचं दान संक्रांतीला वाणाच्या रुपाने तिला परत करायचं हे या मराठी माणसांनीच जगाला शिकवले. याच मराठी काव्य-शास्त्र-विनोदाने अवघ्या विश्वात सन्मानी गुढ्या उभारल्या आहेत. आषाढी-कार्तिकीला अवघा महाराष्ट्र “ग्यानबा-तुकाराम” करत भक्तीरसात न्हाऊन लाडक्या विठूमाऊलीला भेटायला पायी वारीला निघतो. श्रावणी सोमवारच्या गाभाऱ्यातल्या पहाटेची धीरगंभीर मंत्रोच्चारणा अवघे ब्रम्हांड अवतरल्याचा अनुभव देते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचा घास भरवून त्याच्याही उपकारांची जाणीव आम्हांला असते. गौरी-गणपतीला अवघा महाराष्ट्र उत्सवी वातावरणात रमून जात असतो. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात केशरी दुधाच्या साथीने गप्पांना काय तो बहर येतो. दिवाळीला अवघा मराठी मुलुख ऐश्वर्यात न्हाऊन निघतो. एवढे ऐश्वर्य की लक्ष्मीपूजनला उदारपणे जुगारही खेळावा. पाडव्याला नथ सांभाळत कारभारीला ओवाळणारी घरधनीण आपल्या सख्याकडे किती नजाकतदार लाडिकपणे पाहून पाडवा “वसूल” करत असते हे काय अवघ्या मराठी मुलखाला ठाऊक नाही?<br />
<br />
अशी ही विविधरंगी विविधढंगी मराठी संस्कृती. हिच्या पायीच आम्ही हा यज्ञ सुरु केला आहे. खात्री आहे की आपण पण या यज्ञात सामील व्हाल. आपणा सर्वांचे स्वागत.<br />
<br />
आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. आत्ताच्या जगामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये कोणतीही प्रादेशिक भाषा टिकवुन ठेवणं तसं अवघड झालंय. पण ते अशक्य नक्कीच नाही! आपली मराठी या रेट्यातही टिकुन राहावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मराठी साहित्य तर समृद्ध आणि सक्षम आहेच. कोणी अजुनही मराठी वाचन आवर्जून करतोय, कोणी मराठीमधुन लेख लिहीतोय. अनेक मराठी वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आहेत ज्यातुन बरेच लोक आपले लेख लिहीत असतात. असंच अजुन एक माध्यम आहे – ब्लॉग्स. तुम्हाला वाचतांना आश्चर्य वाटेल, पण आजमितीला सुमारे १५ ते २० हजार लोक आपापल्या ब्लॉग्सवर मराठीमधुन लिहीत आहेत! हे लोक तिथं आपल्या कथा लिहीतात, कविता प्रकाशित करतात, मतं मांडतात, अभ्यासपुर्ण लिखाणसुद्धा करतात!! आणि हो, इथं सुद्धा तेवढंच दर्जेदर लिखाण असतं!!! पण अजुन म्हणावा तेवढा प्रकाशझोत या माध्यमावर आणि या माध्यमातुन लिहिणाऱ्यावर पडलेला नाहीये. नेमकं याच कारणासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञाचं स्वरुप, त्याची व्याप्ती आणि त्याची फलनिष्पत्ती याबद्दल स्वतंत्रपणे लिहुच, पण यात सगळ्यात महत्वाचं ते सुरुवात करणं.<br />
<br />
तर अशी ही आमची “इये मराठिचिये नगरी”!<br />
<br />
<div style="text-align: center;"><b>संक्रांतीचा मुहुर्त साधून याच मराठी आईचे वाण घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली. आमची सगळी एकेकाची संगणक कौशल्ये एक केली आहेत या “मराठी मंडळी” नावाच्या सुगड्यात. येताय ना तुम्ही पण? यंदाच्या धुळवडीला हा चौदा विद्या, चौसष्ट कला असा विविधरंगांनी भरलेला घट आम्ही तुमच्यावर रिता करत आहोत, तुम्हांला नवरसात चिंब भिजवायला… आहात ना तयार?</b></div>Unknownnoreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-12753897498399550382010-02-14T13:14:00.004+05:302010-04-06T17:48:41.838+05:30अमर्याद PDF डॉक्युमेण्ट्स बनवा एका क्लिकसह!सध्या घाईत असल्याने एकदम थोडक्यात सांगतो आहे, काही अडचण आल्यास आपल्या प्रतिक्रिया खाली टाका, त्यांना मी योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन!<br />
<br />
<a href="http://bhunga.blogspot.com/" target="_blank">भुंग्या</a> दादाच्या ब्लॉगवर हल्ली खुपच पुस्तके डाऊनलोड करण्यास मिळत आहेत, पण ती सर्व <b>.PDF</b> या एक्स्टेंशन मध्ये असतात. माझ्या बहुतेक ब्लॉगर्स मित्र अन मैत्रिणींना तसेच वाचकांना असा प्रश्न पडला असेल की, हा भुंग्या ही पुस्तके बनवतो तरी कशी?? त्याचेच एक अतिशय सोपे उत्तर मी तुम्हाला या लेखात सांगतो आहे!<br />
<br />
तुम्ही कधी ओपन सोअर्स सॉफ्टवेअर्स बद्दल ऐकले आहे का? जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ! मी सध्या उबुन्टू ९.१ ही लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टीम वापरत आहे. आणि हे तर सर्वांना माहित असेलच की लिनक्स (लायनक्स?) ही ओपन सोअर्स अणि मोफत मिळणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे! त्यात अगोदरच "<a href="http://en.wikipedia.org/wiki/OpenOffice.org" target="_blank">ओपन ऑफिस.ऑर्ग</a>" हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे सॉफ्टवेअर पॅकेज मिळते. विन्डोजच्या सर्व फ्लेवर्ससाठी(विन्डोज एनटी, २०००, एक्सपी, व्हिस्टा, सेव्हन..) साठीही हे ऑफिस पॅकेज अगदी मोफत उपलब्ध आहे. <br />
<br />
<blockquote style="color: red;">"ओपन ऑफिस डॉट ओआरजी" ला <b><a href="http://download.openoffice.org/">येथून डाऊनलोड करा.</a></b></blockquote><br />
<a name='more'></a>या पॅकेजमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस सेव्हन प्रमाणे सर्व महत्वाचे टुल्स मिळतील, जसे की वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट टूल, मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन रायटर, पॉवरपॉईंट स्लाईड मेकर आणि आणखी भरपूर काही...<br />
<br />
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><img border="0" height="280" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj4qI82zfbgibBB2skXxjtIfZ4W0zJ9yCP-vcRKKmQOGe29DGFVSXoHvQvSkx_SXMZ13DTNHId6mbH-ebfkxjtnqtxSsOXFcRyhD2mOy0St8rcKHJdLCgSEePHPVoe9_EhpZAkAk8RV_zCr/s400/PDF.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="400" /></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">PDF डॉक्युमेण्ट तयार करण्यासाठी "Export Directly as PDF" हे बटन दाबा.</td></tr>
</tbody></table><br />
<imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">आता राहिला प्रश्न यात <b>PDF</b> डॉक्युमेण्ट्स कसे तयार करायचे? एकदम सोप्पं आहे. यापेक्षा सोप्पं तुम्ही कधीच अनुभवलं नसेल. तुम्ही ओपन ऑफिसच्या वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल किंवा इतर कोणत्याही टुल मध्ये कोणत्याही स्क्रिप्ट मध्ये (मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, जपानी, जर्मन, चायनिज किंवा कुठलिही भाषा, फॉन्ट!!), काहीही लिहिले असेल, ते सुद्धा कसलिही मर्यादा न ठेवता (म्हणजे लाखो पाने असली तरी चिंता नाही....!), वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे <b>"Export Directly as PDF"</b> या बटनावर क्लिक केल्याबरोबर तुमच्या डॉक्युमेण्टचे <b>PDF</b> तयार होते. कुठे सेव्ह करायचे सागितल्याबरोबर थोड्याच वेळात त्या ठिकाणी (डॉक्युमेण्ट जिथे <b>PDF</b> म्हणून सेव्ह केले ते फोल्डर/डिरेक्टरी...) तुमच्या डॉक्युमेण्टची <b>PDF</b> कॉपी दिसेल. फाईलची साईज अतिशय कमी असते, काही केबींपासून ते ५ एमबीच्या दरम्यान (५०० ते ६०० पानांकरिता!!!) आणि दर्जाही अति-उत्कृष्ट!!!<br />
<br />
तर मग लगेच डाउनलोड करा, आणि तुमच्या सर्व डॉक्युमेण्ट्सच्या (कसलेही!) <b>PDF</b> प्रती तयार करून शेअर करा, लोकांना डाउनलोड करण्यास द्या...<br />
<br />
आणि हो, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करण्याची तुम्हाला नंतर मुळीच गरज भासणार नाही, अशी माझी पक्की खात्री आहे! <br />
<br />
अरे हो, एक सांगायचे राहूनच गेले, भुंग्या दादा <b>PDF</b> डॉक्युमेण्ट्स तयार करण्यासाठी <b><a href="http://www.globalgraphics.com/en/gdoc/free-creator" target="_blank">जीडॉक क्रीएटर</a></b> हे सॉफ्टवेअर वापरतो, तुम्हाला इच्छा असेल तर हेही वापरून बघा, पण यात नुसतं <b>PDF</b> तयार केले जातील, पण ओपन ऑफिस डॉट ओआरजी प्रमाणे सर्व सुविधांचा लाभ मात्र घेता येणार नाही!! ;)<br />
<br />
काही अडचणी असतील, तर त्या खाली टाका, प्रतिक्रिया म्हणून...!!!<br />
<br />
</imageanchor="1"><br />
<div style="color: orange;">जय हिंद, जय महाराष्ट्र!</div>Unknownnoreply@blogger.com16tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-65103951858829804262010-02-14T11:30:00.000+05:302010-02-14T14:32:49.512+05:30श्रद्धांजली...दिनांक १३ फेब्रुवारी, २०१० रोजी पुण्यातील दुर्दैवी आत्मघातकी अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना मनःपूर्वक श्रद्धांजली...Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-31990556754231323212010-02-07T15:35:00.001+05:302010-02-14T14:11:42.315+05:30पाणी डोक्यावरून गेलंय आता...!स्वतंत्र भारताच्या संविधानाने भारतवर्षाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, हे पुन्हा सांगावे लागू नये व माझ्या अश्या पोस्ट्सवर कसलीही बंधने येऊ नयेत, यासाठी आधीच हे नमूद करतो. पण आजकाल या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे भरपूर लोकं नजरेस पडताहेत. काय या लोकांना लोकशाही नकोशी झाली आहे (तसं लोकशाही पद्धती असण्यावर माझासुद्धा विरोध आहे.), या लोकांना अगदीच माज चढलाय की यांचा महाराष्ट्र या एकाच प्रांतावर तिरपा डोळा आहे...??? या प्रश्नांना या नेतेमंडळींकडूनच उत्तरे मिळाली तर माझ्या महाराष्ट्राला या सुवर्णमहोत्सवी वर्षातही पीडत असेलेले बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतील, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक म्हणून मला ज्या गोष्टींबद्दल आक्षेप आहे, त्या मी या ब्लॉगच्या स्वरूपाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कित्येकांचा मी मांडलेल्या मुद्द्यांवरही आक्षेप असू शकतो, पण चर्चेने हा विषय-लेख बराचसा परिणामकारक होईल अशी आशा आहे. वाचकांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीने प्रतिक्रिया नोंदवावी.<br />
<br />
माझे मुद्दे, आक्षेप, सुचना इत्यादी खालीलप्रमाणे: <br />
<br />
<blockquote>१) संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुमारे १०५ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कसलीही तमा न बाळगता संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी (मराठीभाषिकांना एकत्र करण्यासाठी) "संयुक्त महाराष्ट्र लढा" चालू केला, अन आपल्या प्राणांची आहूती देऊन (त्यांचे प्राण कसे व का गेले, कोणी घेतले, त्यांच्या हत्यांमागचा मुख्य सुत्रधार कोण या गोष्टी अजुनही सामान्य मराठी माणसाला अज्ञातच आहेत.) संयुक्त १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . हे वर्ष त्यांच्या बलिदानाचे ५०वं वर्ष, पण आपल्या नेत्यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाला थोडी जरी लाज, शरम असती तर भव्य अन दिव्य असे कार्यक्रम आणि उत्सव साजरी केले असते. नाही काही तर हुतात्म्यांच्या मागासलेल्या व सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या परिवारांना भरघोस आर्थिक मदत तरी देऊ केली असती. पण जिंकल्याचा माज सध्याच्या सरकारकडून सध्या तरी उतरेल, असं दिसत नाही. आपण आपल्या खिशातून सरकारच्या तिजोरीत पैसे खाली करतो तो अशा सदुपयोगी अन समाजपयोगी कामांसाठीच ना....! नेतेमंडळी १ मे ची वाट पाहत असणार... १ मे ला सकाळी १०-११च्या सुमारास प्रत्येक शासकिय कार्यालयात झेंडावंदन करायचं... अन बाकी काय, झाला महाराष्ट्र दिन साजरी...</blockquote><br />
<a name='more'></a><br />
<br />
<blockquote>२) मान्य आहे, शिवसेना अन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या लोकांसाठी नेहमी झटत आले आहेत (कधी कधी रागही येतो यांचा!)... पण नुसतं एकमेकांना आपल्या रागाचे लक्ष्य बनवणे तरी बरोबर नाहिये... युपी-बिहारी लोकं छोटे-छोटे (रोडवर, फुटपाथवर) जमेल ते व्यवसाय थाटतात. या दोन्ही पक्षांच्या मते (मला त्यांची विचारसरणी माहित नाही, पण त्यांच्या कृत्यांवरून तरी असं वाटतंय...), बेरोजगार मराठी लोकांनी ते व्यवसाय करावेत व युपी-बिहारी लोकांनी महाराष्ट्र सोडावा... असले छोटे-छोटे व्यवसाय मराठी माणसांना करायला लावण्यापेक्षा असे काही मोठ-मोठाले उपक्रम राबवावेत, जे महाराष्ट्राचा विकास करण्यात भागिदारी तर निभावतीलच, शिवाय आपल्या लोकांना क्षुद्र प्रकारचे जीवन जगावे लागणार नाही... हं, परप्रांतियांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांचे-त्यांचे मतदारसंघ बनताहेत, त्यामुळे आपल्याला खुप मोठा धोका आहे... पण त्यांच्या वाढत्या संख्येस आळा घालण्यासाठी नेहमीच हिंस्र होण्याची गरज नाही, असे मला वाटते. वेळ्प्रसंगी हिंस्र होणेही गरजेचे (मी गांधीवादी मुळीच नाही, अहिंसा-हिंसा दोन्ही परस्पर-पूरक गोष्टी आहेत, एकाच गोष्टीच्या भरवश्यावर राहून हाती काहीही लागत नाही, त्यामुळे मी मोहन गांधीच्या विचारांशी असहमत आहे...) असते... बाय द वे, हा भाषेचा वाद खुपच झाला... जर पक्कं विरोधी नेतृत्व सिद्ध करावयाचं असेल, तर ग्रामिण भागाच्या प्रश्नांकडे खुप लक्ष देण्याची गरज आहे.</blockquote><br />
<blockquote>३) वाढत्या महागाईबद्दल आज-काल खुपच चर्चा रंगतांना नजरेस पडतात. दोन महिन्यांपूर्वी १३-१४ रू. प्रति किलो असलेली साखर आज दुकानात ४५ रू. प्रति किलो पेक्षा कमी भावात मिळणं अशक्य आहे. यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने जरासा कमी पाऊस झाला. आणि खुपच उशिरा आल्यामुळे यावर्षी महाराष्ट्राला कोरड्या दुष्काळाने झोडपले... आपण लोकं शहरी भागात असल्यामुळे तरी खुपच आनंदात आहोत, पण ग्रामिण भागात लोकं पाण्याच्या तीळ-तीळ थेंबासाठी हैराण आहेत. आपली इलेक्ट्रॉनिक मिडिया एवढी सुसज्ज अन लोकांची कैवारी आहे की ग्रामिण भागातील कोणतेच प्रश्न त्यांच्याकडे दिवसभराच्या कोणत्याही बातमीपत्रांमध्ये दिसत नाहीत. शेवटी भ्रष्टाचाराचे लोण तिकडेही पसरले आहे, यात आता मात्र कसलीही शंका उरलेली नाही... माझ्या मते, मागील पंचवार्षिक योजनेत, कृषी विषयाला खुप वाव देण्यात आला होता. येत्या पंचवार्षिक योजनेपर्यंत कोणत्याही नैसर्गिक, आर्थिक किंवा इतर प्रसंगांच्या वेळी दिलासा मिळण्यासाठी खुप मोठ-मोठाले पॅकेजेस मंजूर करण्यात आले होते... वाढत्या महागाई वरून तरी आता तो फक्त एक लोकांना फसवण्यासाठी खेळला गेलेला एक खेळ होता, असं आता जाणवतंय... प्रत्येकाच्या खिशात (मग ते सरकारसोबतचे नेते, विरोधी नेते, अन त्यांच्यावर नजर ठेऊन असलेले पत्रकार) आता ते पॅकेजचे पैसे खळखळताहेत, तसं उघड दिसतंय... अन जरी दुष्काळ आला, उत्पन्न कमी झालं, तरी सरकारने प्रत्येक आर्थिक वर्षासाठी काही योजना केलेल्या असतात, कितीही वाईट प्रसंग आला तरी त्यामधून राष्ट्राला सावरण्यासाठी, आणि तेही कमीत-कमी ५ वर्षे तरी, त्या योजना अतिशय कामी पडतात. अश्या प्रकारच्या योजनांचा अवलंब करतांना तर सध्याचे सरकार दिसत नाही. एवढा अमाप पैसा सरकारकडे आहे, त्याचा आता वापर करणार नाही तर कधी करणार...??? महान आर्य चाणक्य (कौटिल्य), एक महान अर्थतत्वज्ञ या भारतवर्षात होऊन गेला, त्याने मांडलेल्या नित्यांचा वापर आज जगातील संपूर्ण देश, संस्था, समाज करतांना दिसतात, पण आपल्याच देशात मात्र......... हे अनिष्ट घडतंय... शरद पवारांना जर कृषी-विषयक गोष्टींमध्ये आणि भाववाढीबाबत योग्य व ठाम निर्णय घेण्यामध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी इतरांच्या टिपण्ण्यांचे लक्ष्य न बनता, आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकावा... उगाच आपल्या माणसाची कोणी खिल्ली उडवतंय, अन ते मुकाटपणे पाहणं प्रत्येक मराठी माणसाला अवघड जातं... महाराष्ट्रात येऊन, स्वतःच्या अनुभवांवरून आपल्या महाराष्ट्राचा उद्धार करावा, व लोकांचे आशिर्वाद घ्यावेत... शरद पवारांनी या गोष्टीवर जर विचार केला, तर नक्कीच काहीतरी घडेल...</blockquote><br />
<blockquote>४) राहूल गांधी म्हणतात, मुंबईला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापासून पासून उत्तर भारतीयांनीच वाचवले. प्रत्येक स्वाभिमानी अन राष्ट्रप्रेमी सैनिकाचे रक्त फक्त देशावर तिरकी नजर असलेल्यांवरच खवळते... मग तो सैनिक मराठी असो, पंजाबी असो तामिळी असो किंवा भारतातील कोणत्याही प्रांताचा... त्याच्यासमोर देशाचा प्रत्येक नागरिक एकसमान असतो. भाषावाद तर त्याच्या रक्तात नसतोच. मग २६/११ च्या हल्ल्यात म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्या-ज्या भारतियाचे रक्त सांडले, तो भारतिय खरेच खुप भाग्यवान होता आणि असेल... कारण प्रत्येक सच्च्या भारतियाचे तेच तर खरे स्वप्न असते, मातृभूमीसाठी लढता लढता एखाद्या वाघासारखे निडर होऊन मरायचे... राहूल गांधीच्या आजी आणि वडिलांना अशीच विरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे तेच प्रांतवाद सुरू करताहेत, याचं त्यांनाही भाण राहिलेलं नाहिये वाटतं... दुसर्यांना नावं ठेवण्यापेक्षा अन दुसर्यांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांनी स्वतः आरशात पाहावं, ते काय करताहेत ते... त्यांचं नेतृत्व तर मी कदापि मान्य करणार नाही... त्यांच्यात निडरता दिसत नाही, आवाजात कणखरता नाही, नेमके, स्पष्ट आणि ठाम मुद्दे नाहीत, बाप-जाद्यांनी कमावलेल्या मतांशिवाय दुसरी मतं मिळवणं त्यांना फारसं काही जमत नाही... जर उद्या भारतावर परकिय हल्ला झाला, अन त्यावेळी ते भारताचे पंतप्रधान (बिल्कुल असू नयेत!) असले, तर ते नेमके काय करतील, मोहन गांधीच्या "अहिंसा परमो धर्म" च्या मार्गावर जातील की पलायन करतील???? (त्यांच्या सदिच्छक मंडळींनी जरा संयम ठेवावा, अन त्यांच्या याबाबतच्या तीव्र नाराजीयुक्त प्रतिक्रिया खाली नोंदवाव्यात!! नाहीतर तुमच्या संगणकावर राग काढसाल!!! ;) )</blockquote><br />
<blockquote>५) नारायण राणेंनी दोन वेळा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री म्हणून काम पाहिलंय... त्यांचे खालचे-वरचे सगळे खिसे भरले असतील तर त्यांनी आता तर ते पद सोडावे अशी विनंती आहे... महसूल मंत्री बनून ते नेमकं काय काम करतात, हे अजुनही पाहण्यात आलं नाही... नेमकं ते काय करतात, ते त्यांनी जनतेला दिसू तरी द्यावं ना... अकेले अकेले ही त्यांचं गोदाम भरणं चालू आहे... म्हणूनच तर म्हटलं आजकाल ते एवढे निष्क्रिय का बसलेत ते...! ;) आता तर त्यांनी त्यांच्या पोराला पण उतरवलंय राजकारणात... स्वाभिमान संघटना काढून दिलीय पोराला... कॉंग्रेसमध्ये असतांना कॉंग्रेसबद्दलचा स्वाभिमान न बाळगता, नारायण राणेंनी ही एक नविन संघटना (सध्या तरी बीटा टेस्टिंगमध्येच दिसतेय, कधी कधी सध्याच्या सरकारविरोधातच संघटनेची आंदोलणं चालतात!) हे सर्व बंद करून जरा चांगली कामं करावी... हां, आत्ता काही दिवसांपूर्वी कोका कोला कंपनीला मिळणारं पाणी बंद करण्यासाठी स्वाभिमान संघटनेने आंदोलन केलं होतं. पण त्यामागचा नेमका उद्देश्यच कळाला नाही. कोल्डड्रिंक्स, दारू आणि इतर नाहक वस्तू बनवण्यासाठी चालू असलेल्या कंपन्या, कारखाने बंद पाडले किंवा त्यांना पाणी-पुरवठाच बंद केला तर खुप पाणी बचत होईल, अन सध्या असलेली पाणी-टंचाई कमी होण्यास खुप मदत होईल. कारण अश्या कंपन्यांमध्ये दैनंदिन लाखो गॅलन्सचे पाणी वाया घातले जाते. स्वाभिमान संघटनेने हा मुद्दा का उचलला नाही मग?? नुसती हवा करायची होती वाटतं नितेश राणेंना (नारायण राणेंचा मुलगा!)...........!!! ;)</blockquote><br />
<blockquote>६) सगळ्या वस्तूंना आता वाट्टेल तसे भाव मिळताहेत, पण कापूस अन ऊस यांच्या बाबतीत मात्र असं कधीच होत नाही, अन झालं तरी गरीब शेतकर्यांना त्याचा १ टक्का सुद्धा नफा मिळत नाही... आपल्या सिस्टीममध्ये असलेल्या अश्या संवेदनशील त्रुटी विशिष्ट शीष्ट मंडळाने व्यवस्थित अभ्यास करून काढणे गरजेचे आहे, नाहीतर शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांना कोणीच थांबवू शकत नाही...</blockquote><br />
<blockquote></blockquote><blockquote>७) मुळा-प्रवरा वीज कंपन्यांसारख्या (पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची कंपनी) प्रत्येक नेत्याच्या करोडो रूपयांची मालमत्ता असलेल्या संस्था, कंपन्या, कारखाने सरकारने जप्त कराव्यात, अन नॉन-प्रॉफिट सहकारी तत्त्वावर काही गरजू लोकांना (जे खरंच लायक आहेत, अन समाजासाठी काही करू इच्छितात, त्यांना) <br />
द्याव्यात... अशामुळे कित्येक भ्रष्ट नेत्यांची चरबी उतरेल.</blockquote><br />
<br />
म्हणूनच मी म्हणतो की पाणी खुपच वर चढलंय, जर आत्ताच काही योग्य बंदोबस्त नाही केला गेला तर त्याचे अतिशय भयावह आणि अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतील.<br />
<br />
अजुनही अनेक मुद्दे आहेत, जे मी इथे मांडू शकलो नाही, वेळेअभावी इथे एवढेच टाकतोय, तुम्हालाही अजुन मुद्दे, तुमच्या सुचना, मी मांडलेल्या मुद्द्यांवरील आक्षेप आणि इतर काही माहिती लोकांसोबत शेअर करायची असेल तर या लेखाखाली तुम्ही प्रतिक्रियेच्या स्वरूपात ती नोंदवू शकता.<br />
<br />
<span style="color: #b45f06;">जय हिंद, जय महाराष्ट्र!</span>Unknownnoreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-33791320231406505882010-01-30T10:53:00.002+05:302010-02-14T14:10:46.241+05:30"पद्म"ला ग्रहण...कालच मंगेश पाडगावकरांनी संगमनेरमध्ये अशी खंत व्यक्त केली की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना अजून कसं "पद्म" पुरस्कारांपासून डावललं जातं ते... असो. त्यांना अश्या पुरस्कारांची गरज नाही, हे सांगून त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला.<br />
<br />
संत चटवाल सारख्या एनाआरआय उद्योगपतीला (मोठ-मोठाली हॉटेलं आहेत त्याची विदेशात..), जो मागेच बॅंकेतील ९० लाख डॉलर्सची गफलत करण्याच्या गुन्ह्यामुळे तुरूंगवास भोगून आला आहे. त्याचं मागेच वक्तव्य आलं होतं की भारतात पण तो काही हॉटेलं काढणार आहे म्हणे.. त्याला खुष करण्याच्या नांदात तर त्याला "पद्म" दिला गेला नाही ना, अशी तीव्र नाराजी समाजाच्या प्रत्येक वर्गातून तसेच इंटरनेटवरील ट्विटरसारख्या सोशल साईट्सवर व काही ब्लॉग्जवर लोकांनी जाहीर केलेली दिसतेय... तसेच सैफ अली खान, लोकप्रिय आहे पण अजून तशी लायकी नसलेला अन सध्या सिनेमांमध्ये बिभत्स कृत्ये करणारा माणूस "पद्म"चा हक्कदार कसा होऊ शकतो याबद्दलही तीव्र साशंकता आहे.<br />
<br />
मंगेश पाडगावकर, वि.दा. करंदीकर (ज्येष्ठ कवी), डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते) आणि अश्याच प्रत्येक क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींना अजूनही "पद्म"ने गौरवण्यात आलेले नाही.. याचं मला तीव्र दुःख आहे.. "पद्म" पुरस्कार प्रक्रियेवर गालबोट लागलंय, अन या पुरस्कारांवरून माझा समुळ विश्वासच उडालाय हे नक्की... शेवटी जो माणूस त्या-त्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र जगला, अन कष्टाचे चीज केले, त्याला त्याचे मानधन अन गौरव मिळत नसेल तर अश्या पुरस्कारांची नेमकी गरजच काय???Unknownnoreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-25677060930415535362010-01-22T22:31:00.004+05:302010-02-14T14:07:08.669+05:30नुकत्याच हाती आलेल्या बातम्या...<span style="font-weight: bold;">ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे</span>:<br />
<br />
<blockquote>१) तीव्र शीतलहरीचा फटका काही मराठी ब्लॉगर्संना... अनेकांचे ब्लॉग थंडीमुळे मृतावस्थेत आढळले...<br />
२) चोरांचा धूमाकूळ सुरूच... महेंद्रजींच्या ब्लॉगवरील लाखो रूपये किंमतीची मालमत्ता दिवस-ढवळ्या लंपास...<br />
३) मराठी ब्लॉग विश्व, मिसळपाव, उपक्रम, अन मनोगत यांचा पुढील "मराठी ब्लॉगर्स" स्नेह मेळाव्यास तीव्र विरोध...<br />
४) ब्लॉगर अन वर्डप्रेस यांनी एकत्रितपणे फक्त मराठी ब्लॉगर्ससाठी आजपासून चालू केलेल्या नविन ब्लॉग-डोमेन "xyz . marathi . com" सेवेला तीव्र प्रतिसाद...<br />
५) भुंग्या - एक सामाजिक किडा, यांच्या ब्लॉगवर वाचकांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांच्या ब्लॉगची एक साईडबार कालच्या रात्री तुटली...<br />
६) वाढत्या महागाईमुळे अनेक वाचकांचा ब्लॉगवर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय...<br />
७) पंक्या, यांच्या ब्लॉगवरील भाषेबद्दल अन फोटोंवर काही वाचकांचा आक्षेप...</blockquote><br />
<br />
****************************************************<br />
<br />
<span style="font-weight: bold;">आता</span><span style="font-weight: bold;"> </span><span style="font-weight: bold;">बातम्या</span><span style="font-weight: bold;"> </span><span style="font-weight: bold;">सविस्तरपणे</span><span style="font-weight: bold;">....</span><br />
<a name='more'></a><br />
<blockquote>१) उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीचा तीव्र फटका काही आता मराठी माहितीजालावर पण पसरलाय... दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले की मराठी ब्लॉग विश्वावर नियमित लेखन करणार्या काही ज्येष्ठ मंडळींचे ब्लॉग तसेच ओसाड पडून आहेत... भुंग्या - एक सामाजिक किडा अन डोक्यात भुणभुणणारा सामाजिक किडा यांच्या ब्लॉगवर विरळ प्रमाणात अपडेट्स दिसले. तसेच बहुतेक मराठी ब्लॉगर्सचे ब्लॉग तसेच गारठलेल्या अवस्थेत पाहण्यात आले.... यावर अनेक विचारवंतांनी अन काही वाचकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोज काहीतरी खरपूस वाचायला मिळावं, या उद्देश्याने काही वाचक मंडळी उद्या विधानपरिषदेवर मोर्चा नेणार आहेत अशी गुप्त बातमी काही हेरांमार्फत मिळाली आहेत. यांची प्रमुख मागणी अशी असणार आहे: "प्रत्येक मराठी ब्लॉगरने नित्यनियमाने दररोज काहीना-काहीतरी लिहावेच... असा नियम सरकारने संविधनात तयार करावा. अन या नियमाचे उल्लंघन करणार्या ब्लॉगरचा ब्लॉग समूळ नष्ट करावा अन त्याला नविन ब्लॉग तयार करण्यासाठी माहितीजालावर कुठेही परवानगी दिली जाऊ नये." यासंदर्भात आमच्या बातमीदारांनी काही ब्लॉगर्संना याबद्दल विचारले असता त्यांनी ऊत्तरे देण्यास टाळाटाळ केली... याबाबत पुढे काय घडेल, हे उद्याच कळेल...</blockquote><br />
<br />
<blockquote>२) आत्ताच संक्रांतीच्या दुसर्या दिवशी पार पडलेल्या पहिल्या-वहिल्या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात "ब्लॉगवरील लिखानाची चोरी" या विषयावर खुप चर्चा झाली होती... त्यावेळी आमचे प्रतिनिधी तसेच काही खाजगी चॅनेल आणि वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते. त्यावेळी अनेक शक्कली लढवण्यात आल्या. पण चोरांपासून वाचण्यासाठी योग्य मार्ग काही निघू शकला नाही. आत्ताच हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार आमचा प्रतिनिधी अखिल बोंबले, जो की सध्या महेंद्रजींच्या ब्लॉगवर उपस्थित आहे, त्याच्याकडून अशी सविस्तर माहिती मिळाली आहे की महेंद्रजी आज सकाळीच बाहेरगावी गेल्याचा फायदा उचलित काही चोरट्यांनी दुपारी लाखो रूपयांची मालमत्ता महेंद्रजींच्या "काय वाट्टेल ते"वरून लंपास केली. त्यात अनेक प्रकारचे दूर्मिळ साहित्य होते असे महेंद्रजी यांनी आमच्याशी फोनवर बोलतांना सांगितले आहे. महेंद्रजी यांनी यासंबंधी जळकी फाट्यावरील पोलिस चौकीत तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास जळकी फाटा चौकीचे पोलिस उप-निरिक्षक श्री चोरटे करीत आहेत. तपास अजुन चालूच आहे, अशी माहिती त्यांनी आमच्याशी फोनवर बोलतांना दिली आहे. चोरट्यांचा आय.पी. ऍड्रेस हस्तगत केला गेला असून ते चोरटे बहुतेक येसगावच्या नजिकच्या परिसरातील असल्याची तीव्र शंका वर्तवली जाते आहे. आमचा प्रतिनिधी अखिल बोंबले याने आत्ताच सांगितल्याप्रमाणे, "काय वाट्टेल ते" वरील दिनांक २२ जानेवारी, २०१० अन ३१ जानेवारीचे काही लाख-मोलाचे लेख चोरी गेले आहे... उद्यापर्यंत खरे चोरटे गजाआड होतील, अशी आशा "काय वाट्टेल ते" च्या शेजारी राहणार्या मंडळींनी अखिल बोंबले यांच्याकडे व्यक्त केली आहे.</blockquote><br />
<br />
<blockquote>३) आमच्या काही अधिकृत गुप्तहेरांना मिळालेल्या काही गुप्त कागदपत्रांवरून असा खुलासा झाला आहे की पुणे येथील काही मराठी ब्लॉगर्स मंडळींनी त्यांचे-त्यांचे, सर्व मराठी ब्लॉगर्संना सामवेल असे संकेतस्थळ निर्माण केले जात आहे. त्यावर पुण्यानजिकच्या कही खेड्यांमध्ये जोरदार काम चालू आहे. पण यामागे नेमका खरा सुत्रधार कोण आहे, याबद्दल मात्र अजुनही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.<br />
याबद्दल आमचा प्रतिनिधी विकास ब्लॉगतोडे यांनी मनोगत, मराठी ब्लॉग विश्व, उपक्रम, मिसळपाव अन अन्य संस्थाळांच्या कार्यवाहकांशी बातचित केली. या सर्वांनी पुनरोच्चार करीत आमच्याशी बोलताना असे सांगितले की हा कट यावेळी पार पडलेल्या पहिल्या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यातच रचला गेला आहे. अन तो कट उधळून लावण्यासाठी त्यांनी सर्व तयार्या आधिच करून ठेवल्या आहेत. तथापि शेवटी सर्वांनी एकत्रितपणे पुढील मराठी ब्लॉगर्स मेळावा होण्यास तीव्र विरोध दर्शविला.</blockquote><br />
<br />
<blockquote>४) आज सकाळीच लॉंच झालेल्या "xyz . marathi . com" या संकेतस्थळावर ब्लॉग तयार करण्यास उत्सुक मराठी ब्लॉगर्संनी "marathi . com" या ठिकाणी सकाळपासून खुपच गर्दी केली होती. नावाजलेल्या ब्लॉगर आणि वर्डप्रेस या मोफत ब्लॉग तयार करणार्या संकेतस्थळांनी एका कराराद्वारे फक्त मराठी ब्लॉगर्संना त्यांचे ब्लॉग्ज एका नविन संकेतस्थळावर तयार करण्यासाठी ही सुविधा भारतिय प्रमाणवेळेनुसार सकाळी २ वाजेच्या सुमारास लॉच केली. मराठी ब्लॉगर्सच्या लक्षणिय वाढीमुळे हा करण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी कडूबा अडाणी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी ते हजर होते, पण सर्व भाषणे इंग्रजीतून झाल्यामुळे त्यांना काहीही उमगले नाही. त्यामुळे याविषयी आम्ही तुम्हाला शिल्लकची माहिती देण्यास दिलगीर आहोत. तथापि कडूबा अडाणी यांनी इंग्रजी शिकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. फक्त मराठीतच पत्रकारिता करण्याचा त्यांचा निर्धार आहे व त्यांच्या या निर्धाराचा बहुतेक राजकिय मंडळींनी राजकिय फायदा घेतल्याचे आज दिवसभर दिसून आले.</blockquote><br />
<br />
<blockquote>५) माहितीजालावर मराठी ब्लॉग विश्वात सर्वांत लोकप्रिय ब्लॉगर भुंग्या - एक सामाजिक किडा, यांच्या ब्लॉगवर काल रात्री अचानकच काही वाचकांची संख्येने खुप मोठी टोळी आली. त्यातील बहुतेक वाचक हे साईडबारच असल्यामुळे भुंग्याने थर्माकॉलपासून बनवलेली अन काही आभूषणांनी आभूषित केलेली साईडबार, जी की लोखंडाची असल्याची जाणवत होती, ती एकदमच तुटली... यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पण भुंग्याच्या ब्लॉगचे खुप मोठे नुकसान झाले आहे. दुरूस्तीसाठी हा ब्लॉग काही दिवस बंद राहील, अशी माहिती भुंग्याने आमच्याशी फोनवर बोलतांना दिली आहे. तथापि डोक्यात भुणभुणणार्या भुंग्याने ही बातमी कळताच खदा-खदा हसायला सुरूवात केली... पण त्यामुळे त्याचे गाल खुपच फुगले... उपचारासाठी त्याला सध्या आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले आहे, अन त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आम्हाला कळाली आहे.</blockquote><br />
<br />
<blockquote>६) हल्ली वाढत्या महागाईमुळे अनेक वाचकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. साखरेचे भाव वाढले म्हणून चहाचे भाव वाढले, त्यामुळे आमची विचारशक्ती कमी झालीय, आणि त्यामुळे आम्ही ब्लॉग्जवर प्रतिक्रिया देणार्यांवर अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मराठी ब्लॉगर्स संघटनेच्या अध्यक्षांनी आमच्याशी फोनवर बोलतांना दिली. याबद्दल काही वाचकांच्या प्रतिक्रिया आम्ही (मोफत) जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, असे दिसून आले की सर्वच वाचकांनीदेखील यापुढे कोणत्याही ब्लॉगवर प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच खायचे वांधे आहेत, अन प्रतिक्रिया देण्यासाठी वाचकांनी पैसे मोजावेत.... हा खुळचट प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.</blockquote><br />
<br />
<blockquote>७) पंक्या, यांच्या "भटकंती - अनलिमिटेड, फ्रेम्स ऑफ माईंड" या ब्लोगवरील अर्वाच्य भाषेबद्दल अन तेच-तेच फोटो दाखवित असल्याबद्दल काही नियमित ब्लॉग-वाचक मित्रांनी आक्षेप घेतला आहे. "खाज", "माज", "च्यायला" अशा अर्वाच्य शब्दांचा वापर "पंक्या" यांनी थांबवावा, अशी या वाचकांची मागणी आहे. तसेच तेच-तेच फोटोज बघायला मिळत असल्यामुळे कधीतरी नविन अन वेगळ्या-वेगळ्या विषयांशी संबंधित फोटोज टाकण्याचीही मागणी हे वाचक मंडळी करत आहे. जर हे प्रकरण लवकर थांबले नाही, तर अखिल मराठी वाचक मंडळाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.</blockquote><br />
<br />
आतापर्यंत हाती आलेल्या या काही मोजक्या बातम्या होत्या. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी पाहण्यासाठी कृपया वर बघा. बातम्या संपल्या.<br />
<br />
**************************************************<br />
<br />
या बातम्या प्रसारित करण्याचे सर्वाधिकार श्री <a href="http://dooniyadari.wordpress.com/2010/01/11/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0/" target="_blank">गजानन</a> महाराज यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे...!Unknownnoreply@blogger.com19tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-28784455440225301162010-01-19T18:04:00.002+05:302010-02-14T14:06:18.561+05:30पहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा<table border="0"><tbody>
<tr> <td style="background-color: white;"><br />
<div style="color: #444444; text-align: center;"><b>सुरेश पेठे काकांनी आयोजित केलेला:</b></div><div style="text-align: center;"><img src="http://goo.gl/JOZm" /></div></td> <td style="background-color: white;"><br />
<span style="color: #009900;">»»</span> रविवार, १७ जानेवारी २०१० रोजी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, बिग<br />
बाझार जवळ, पुणे येथे पहिला-वहिला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा अगदी<br />
आनंदात पार पडला.<br />
<br />
<span style="color: #009900;">»»</span> पुणे खुप लांब असल्याने मी या मेळाव्यात सहभागी होवू शकलो नाही, पण पुढच्या वेळी सहभागी होण्याचा पुर्णपणे प्रयत्न करीन.<br />
<br />
<span style="color: #009900;">»» </span>अनेक ब्लॉगर्स मित्रमंडळींनी या मेळाव्यात मनसोक्त आनंद लुटला.<br />
<br />
<span style="color: #009900;">»»</span> त्याविषयीचे सर्व लेख व फोटोज बघण्यासाठी: <a href="http://bhunga.blogspot.com/2010/01/blog-post_18.html" target="_blank"> भुंग्या दादा (एक सामाजिक किडा!)</a>, <a href="http://manatale.wordpress.com/2010/01/17/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE/" target="_blank">दुसरा<br />
भुंग्या दादा (डोक्यात भुणभुणणारा!)</a>, <a href="http://sureshpethe.wordpress.com/2010/01/17/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A4-2/" target="_blank">सुरेश<br />
काका</a>, <a href="http://www.pankajz.com/2010/01/marathi-bloggers-meet-at-pune.html" target="_blank">पंक्या दादा</a>, <a href="http://my.opera.com/prabhas/blog/show.dml/6591831" target="_blank">प्रभास<br />
सर</a> यांच्या ब्लॉग्जवर बघा.<br />
<br />
<span style="color: #009900;">»»</span> <a href="http://picasaweb.google.com/vaibhavpbhosale/HNhpuC" target="_blank">येथे</a> वैभव भोसले यांनी टाकलेले फोटोज मस्त आहेत.<br />
<br />
<span style="color: #009900;">»»</span> तसेच <a href="http://72.78.249.124/esakal/20100117/4924871760917886120.htm" target="_blank">इ-सकाळ</a><br />
व <a href="http://epaper.dnaindia.com/newsview.aspx?eddate=1/18/2010&pageno=7&edition=40&prntid=108754&bxid=30791488&pgno=7" target="_blank">DNA</a> वरील बातम्या सुद्धा बघा!</td> </tr>
</tbody></table>Unknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-88224167579097161642010-01-16T10:30:00.004+05:302010-02-14T14:08:35.653+05:30महाराष्ट्राचा भारत-पाकिस्तान?तेलंगानाचा मुद्दा गेल्या दिड-दोन महिन्यांपासून खुपच गाजतोय. या तेलंगानाच्या विभक्त करण्याच्या मुद्दयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याच प्रकारची हवा वाहतांना दिसतेय. कोणाला याविषयी जास्त माहिती नसल्याने बहुतेकजण या मुद्दयाला टाळतांना दिसताहेत. मलाही याविषयाशी निगडित जराशीही माहिती नाही की का विदर्भाला विभक्त करण्याची मागणी जोर धरतेय ते... पण माझा या गोष्टीला विरोध आहे. मी मराठवाड्यातला आहे, पण मला नाही वाटत की स्वतंत्र विदर्भ असावा म्हणून....<br />
<br />
२०१० हे महाराष्ट्रासाठी स्वर्णमहोत्सवी वर्ष आहे. शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने आपला संयुक्त महाराष्ट्र १ मे, १९६० ला निर्माण झाला. त्यावेळी जर या वीरमरण आलेल्या मराठी भूमीपुत्रांना ही गोष्ट माहित असती की आपण ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढतोय तोच महाराष्ट्र भविष्यात फाळणीकरता फासावर चढवला जाईल, तर नक्कीच त्यांनी आपले प्राण कदापि दिले नसते. आजवरच्या या घडामोडी पाहता त्यांचे प्राण व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल. यापासून असा बोध घ्यावा का की यापुढे आपल्या लोकांसाठी काहीच करू नये, कारण तीच लोकं भविष्यात आपल्याच पाठीत खंजीर खुपसतात. आज ज्या कोणी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरलिय, ते बहुतेकजण विदर्भातील आहेत. त्यात काही उच्च-पदस्थ नेते-मंडळी ते सर्वसाधारण रहिवासी यांचा समावेश आहे.<br />
<a name='more'></a>हे एकदम खरं आहे आणि सर्वांनाच माहित आहे की संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रासाठी केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून विकासासाठी, आर्थिक हानी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी पॅकेज जाहीर केले गेले, तेव्हा-तेव्हा विदर्भ हा एकमेव प्रांत या सर्व गोष्टींपासून वंचित राहिला (ठेवला गेला....!) आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा-सांगली-पुणे अन मराठवाड्यातील नेतेमंडळींनीच आपले वर्चस्व गाजवल्याचे आपला इतिहास सांगतो. विदर्भातील काही थोडेफारच नेते महाराष्ट्राच्या राजकारणात उतरू शकले. आणि जे कोणी उतरले ते इतर मंडळींकडून नेहमी डावलले गेले. हे एकदम खरंय... आणि याच कारणांमुळे आपापला मतदार-संघ वाचवण्याच्या प्रयत्नांत इतर-प्रांतिय (विदर्भ सोडून) मंडळींनी विदर्भाला मागास ठेवण्याचा अतिशय घाणेरडा अन माणुसकीला आणि माणसाच्या अंगिभूत अधिकारांना काळिमा फासण्याच्या अघोरी प्रकार चालू ठेवला. यामुळे आज विदर्भाची परिस्थिती भूटान या राष्ट्रासारखी झालेली दिसतेय. नागपूरसारखी महाराष्ट्राची उप-राजधानी असलेली राजधानी मिळालेल्या विदर्भात अजुनही औद्योगिक-क्रांती तर सोडाच, सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्या मूलभूत सुविधाही येथे क्वचितच पाहायला मिळतील. <br />
<br />
यावरून तुम्ही म्हणाल की जर अशी बाब असेल तर विदर्भ नक्कीच विभक्त व्हावा अन त्याला योग्य नेतृत्व मिळावे जेणेकरून विदर्भाचा सर्वांगिण विकास होईल व हा प्रांत मागासवर्गियांमध्ये गणला जाणार नाही. हो मलाही येथे असेच वाटले. पण जर असे घडले तर ही खूप मोठी चूक ठरेल. आपल्यासमोर भरपूर उदाहरणे आहेत ज्यांचा आपण खोलवर विचार करणे गरजेचे मला भासते. मुस्लिम समाजाच्या लोकांनी जास्त असलेला पाकिस्तान(सध्याचा बांग्लादेशही त्यातच होता.) भारत स्वतंत्र होण्याच्या वेळी फाळणीद्वारे विभक्त केला गेला. यात सर्वांत मोठा वाटा होता तो मोहम्मद जिन्ना, जवाहर नेहरू (भारताचे गत-प्रधानमंत्री), तेव्हाचे भारतातील शेवटचे ब्रिटीश जनरल माउंटबेटेन आणि (मोहनदास गांधी) या विभूतींचा..... भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचा विकास होईल अशी आशा (काही) पाकिस्तानवासियांना आणि या विभूतींना होती. पण आज आपल्यासमोर निकाल आहेतच. पाकिस्तानव्याप्त पश्चिम-बंगालनजिकचा प्रदेश, म्हणजे आजचा बांग्लादेश ७०च्या दशकात भारताच्या मदतीने पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यात आला. पण तोही अजुनही आपल्या पायांवर उभा राहू शकलेला नसल्याचे दिसते. आत्ताच ९ वर्षांपूर्वी झारखंड हा भारतातील एक प्रदेश विभक्त करण्यात आला, पण तेथे विकास तर सोडाच लोकांचे अगदीच हाल आहेत. माझे या संदर्भात ज्ञान अतिशय कमी आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा या विषयाशी निगडित खूप खोलवर माहिती असेल, आणि मला नेमके काय म्हणायचे आहे ते तुम्ही समजला असालच....<br />
<br />
आता एक उदाहरण आहे आपल्या संयुक्त महाराष्ट्राचे... संयुक्त महाराष्ट्र उदयास आल्यापासून आपला [विदर्भ सोडून :-(...] खुप (सर्वांगिण म्हणता येणार नाही...) विकास झाला. आपल्याकडे शिक्षितांचे प्रमाण खुप वाढले, औद्योगिक क्रांती झाली, अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या... इत्यादी.... शेवटी काही का असेना, आपण संयुक्त आहोत, त्याचाच सर्वांत जास्त फायदा या गोष्टींना कारणीभूत आहे. मुद्दा हा आहे की वरील उदाहरणे पाहता आपल्या असे लक्षात येईल की विभक्त होण्याने काही होऊ शकेल हा विचार फोल ठरलेला आहे. यांस जबाबदार तेथील नेतृत्व आहे, कारण भ्रष्टाचारच एवढी घाणेरडी बला आहे की ती आनंदाने फुलणार्या अन वाढणार्या समाजाला, प्रांताला, राष्ट्राला अगदी रसातळाला नेवू शकते. माझी ही कळकळीची निःस्वार्थ अन निष्पक्ष अशी विनंती आणि मागणी आहे की विभक्त विदर्भाची मागणी करणार्यांनी जरा व्यवस्थित विचार करावा. कारण एकदा का पायावर कुर्हाड मारली की पाय तुटलाच म्हणून समजा, अन भरपाईची तर आशाच सोडा मग..... आणि जी नेतेमंडळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीस दुजोरा देताहेत, त्यांचा यात काही फायदा नसेल हे कशावरून??? <b>उलट स्वतंत्र विदर्भानंतर यांना सध्यापेक्षा १००पटीने जास्त खायाला मिळेल....</b> विचार करा राव....<br />
<br />
विदर्भाचा विकास होवू शकतो... यासाठी आपल्यासारखा सर्वसामान्यांनाच काहीतरी करण्याची गरज आहे. <b>भ्रष्टाचारी लोकांना चौका-चौकात नागडं करून त्यांना फासावर लटकवावं... जेणेकरून यापूढे कोणीही भ्रष्टाचार करण्याची हिंम्मत देखील करणार नाही.</b> शेवटी एकजुटीची हीच एकमेव ताकद आहे. मग बघा, कसा विदर्भाचा कसा सर्वांगिण विकास होत नाही ते.... अजुन एक मुद्दा आहे, ज्याची चर्चादेखील खुपच विरळ दिसते, तो म्हणजे बेळगाव सीमा-प्रश्न.... बेळगावमधील सत्तर टक्के मराठी जनता वाट पाहतेय की कधी ते महाराष्ट्रात येते... पण आपल्या हरामखोर नेत्यांना खाण्याशिवाय दुसरं काही दिसलं तर नवलच....! <b>या स्वर्णमहोत्सवी वर्षात तरी बेळगाव महाराष्ट्रात यावा ही आशा..... </b><br />
<br />
मी पक्का महाराष्ट्रीय आहे आणि या मुद्दयावर मी माझे वैयक्तिक मत मांडले... तुमची खुन्नस, दुजोरा सर्व स्वागतार्ह आहेत. शेवटी चर्चेतूनच हा विषय मार्गी लागेल. त्यामुळे प्रत्येकाचे याविषयीचे मत मोलाचे आहे.<br />
<br />
धन्यवाद...<br />
<br />
<span style="color: #bf9000; font-size: small;">जय महाराष्ट्र......!</span>Unknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-88647085845473234792010-01-01T19:25:00.002+05:302010-01-01T19:59:11.554+05:30नविन वर्ष - माझं रीझोल्युशन...दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...<br />
<br />
काल रात्री मी घराबाहेर होतो, मामांच्या घरी, मामांच्या मुलासोबत कालची ३१st ची रात्र मी सेव्हन अप च्या बर्फ झालेल्या बाटलीवर सेलिब्रेट केली. असो, असं सेलिब्रेशनही मी पहिल्यांदाच करत होतो, कारण याअगोदर तरी मी कधीच ३१ला घराबाहेर पडलो नव्हतो. रात्री डोक्यात विचार येत होते की आपण ३१ला नेमकं काहीतरी संकल्प नक्कीच करूया. ठरलं, रात्री २ नंतर जेव्हा फटाक्यांचा आवाज कमी झाला तेव्हा माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते.(आश्चर्य वाटतंय की मला अजुनही आठवतंय!!) सर्वात पहिले तर माझ्या आयटी फिल्ड संबंधित मी खुप विचार केला.. शेवटी माझं लक की मला आयटी मिळाली, कारण मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी आयटीतच जाणार हे पक्कं केलं होतं, तसं झालंही. पुढच्या पायर्या तर मला स्वतःच पार करणं आहेत... नंतर इतिहास, अन शेवटी सध्याचा अन या नविन वर्षातला सर्वात मोठा प्रश्न "दुष्काळ" हा माझ्या नजरेसमोर आला. आतापर्यंत मी अनुभवलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेल्यावरून या टॉपिकशी रीलेटेड सर्व गोष्टींबाबत मी माझ्या मानाने खुप विचार केला. मला डोकं दुखणं म्हणजे काय हे अजुनही कळलेलं नाहिये, म्हणून बहुतेकांना होणारा प्रॉब्लेम मला अडवत नव्हता.<br />
<a name='more'></a>जगातील पहिले स्टीम(वाफेचे) इंजिन, ज्याच्या पहिल्या परिक्षणात, त्यामधून हवेत मिसळलेले कार्बनचे अंश आजही आपल्या पृथ्वीच्या वातावरणात जसेच्या तसे आहेत. सुर्यापासून येणारे अतिनिल(अल्ट्रा-व्हायोलेट) किरणे आपल्या वातावरणातील ओझोन लेयर शोषून घेते, ज्यामूळे ती अतिनिल किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सहजासहजी येऊ शकत नाहीत, व आपले तसेच बहुतेक सजीवांचे रक्षण होते. पण वातावरणातील वाढत्या कार्बनच्या प्रमाणामुळे या ओझोनच्या लेयरवर दबाव पडत असावा. काही निवडक संशोधनांद्वारे ही गोष्ट सर्वमान्य झालिय की पृथ्वीच्या वाढत्या तापमानास जबाबदार हे कारण नसावे. तर ते बहुदा असे घडत असावे: पृथ्वीच्या दोन्ही धृवांवरील पांढरा-शुभ्र बर्फ सुर्यापासून निघालेल्या बहुतेक किरणांना परावर्तित करतो. ज्याद्वारे योग्य तापमान राखण्यास मदत होते. पण कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे हे परावर्तित झालेले किरणे ही कार्बनच्या तयार झालेल्या लेयरमुळे पृथ्वीच्या वातावरणातच अडवले जातात. व ही किरणे परत पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे परावर्तित केली जातात. साहजिकच, यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. या वाढत्या तापमानाचा पहिला फटका बसतो तो याच धृवांवरील ग्लेशियर्सना... हजारो वर्षांपासून असणारे ग्लेशियर्स आज-काल एकाएकी वितळायला लागलेत, खुप घातक परिणाम होत आहेत, अन होतील या वितळण्याचे... समुद्रांची भौगोलिक रचना पाहता, वातावरणातील बहुतेक कार्बन समुद्रांच्या तळाशी जमा होतो, याचे भरपूर पुरावे मिळालेत. पण कार्बनचे वाढते प्रमाण त्या मानाने खुपच जास्त आहे, काही वर्षांत असा दिवस येईल, जेव्हा समुद्रांची ही शक्तीसुद्धा नष्ट होईल. वाढत्या जागतिक तापमानाचे कीती हानिकारक अन घातक परिणाम होऊ शकतात हे आपण गेल्या काही वर्षांपासून तर पाहतो आहोच. भारतातील सर्वात जास्त वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण चेरापूंजी गतवर्षी (सन २००९)मध्ये दुष्काळाने ग्रासले होते अन अजुनही आहे. आणि राजस्थान सारख्या वाळवंटाच्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे आलेल्या भयंकर पूरामुळे झालेली हानीही आपल्या स्मरणात असेलच. हा प्रश्न भारतालाच नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला हैराण करणारा आहे. आता या नविन वर्षातच अजून आपण काय-काय नविन अनुभवू, याचा विचार करवत नाही. माझ्या मनात तर एकच विचार किती वेळपासून गोंघावतोय, तो म्हणजे आपल्या बळीराजाचे(मी सुद्धा शेतकर्याचाच पोरगा आहे हं..!!) काय हाल होतील. मागील वर्षीच एवढ्या आत्महत्या झाल्या, आता ह्यावेळी...??? तर विचार करा, त्या काळच्या म्हणजे १९व्या शतकातील नुकत्याच हळू-हळू फैलावणार्या औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत, तर आजचे आपले प्रदुषण पाहता, आपली पुढची पिढी(या पिढीत मीसुद्धा आहे!)... काय हाल होतील...???<br />
<imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><br />
माझं तरी एवढचं म्हणणं आहे (शेवती मी अजुन असमजंस आहे, वयाने लहान असल्याने माझा अभ्यास खूप कमी आहे, तेव्हा मी जी सांगतोय ते तुम्हाला पटेलच असं तर मुळीच नाही...) की हे आत्ताच वेळ आहे, काहीतरी करण्याची.. असं ना होवो की आपण त्यावर नुसता विचार करत होतो अन जे नेमकं करायची गरज होती, त्यापासूनच अलिप्त राहिलो. जग काहीही करो, मात्र स्व-परीने स्वतःच्या अभ्यासाचं जेवढं चीज करता येईल तेवढं करावं... कारण आज आपण अशा परिस्थितीत आहोत, तेथे करो या मरो हा शेवटचा पर्याय आपल्या हाती असेल. जेवढे जास्त पर्याय तुम्ही जन-माणसांत फैलावाल, पुढील असूचक घटनांपासून वाचण्यासाठी, तेवढं तुमचं स्टेटस वाढेल अन तुमच्या मनाला मिळणारे सुख काही औरच असेल. या लढ्यासाठी (ज्याच्याबद्दल मी वर काहीतरी बोंबलत होतो तो...) आता आपला सर्वांचा असा समज व्हायला पाहिजे की हे नविन वर्ष नविनच असेल आपल्या नव-नविन योजनांसाठी/रीझोल्युशन्ससाठी, पण हेच वर्ष शेवटचंही असू शकतं, आपल्या भावी पिढीसाठी काहीतरी करण्याचं... <br />
<br />
तुम्ही जर यासंबंधित अगोदरच किंवा आत्ताच काहितरी ठरवलं असेल तर तुम्ही ते या लेखाच्या वाचकांसोबत अगदी दिलखुलासपणे शेअर करू शकता, ज्याद्वारे या चर्चेला काही वेगळे वळणदेखील येईल.<br />
<br />
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अन तुमच्या नव्या संकल्पांनाही... <br />
</imageanchor="1">Unknownnoreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-338457459249403730.post-19542045498034779072009-12-28T16:13:00.000+05:302009-12-28T16:13:27.896+05:30२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडला की काय??परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी पहाट, ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत सर्व माहिती बघितली, फक्त डिस्कव्हरी अन नॅट जिओवर... नाताळाच्या अन ३१st च्या रंगात लोक आनंदात होते, पण सुमात्रा बेटांजवळ झालेल्या टेक्टॉनिक प्लेटांच्या ओव्हरलॅपिंगमुळे व त्यामूळे निर्माण झालेल्या भूकंपामुळे (सलग ७ मिनिटे चालला होता हा भूकंप - रिश्टर स्केलवर याची तिव्रता ९.५ एवढी मोजली गेली होती...!), हिंदी महासागरात सुमारे १६०० किमी एवढा भुखंड चिरत गेला.... अन त्यामूळे निर्माण झालेल्या ९ ते १० मजली इमारतींएवढ्या उंच लाटांनी लाखो लोकांचे प्राण घेतले...<br />
<br />
दोन्ही चॅनेलांवर यावरील डॉक्युमेण्ट्री फिल्म्स रात्री ९ ते ११ (दोन तास) चालू होत्या, पण कुठलेच न्युज चॅनेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा अन्य कोणतेही... कूठेच याविषयी "ब्र"सुद्धा बघायला तर सोडाच, ऐकायलाही मिळाला नाही... घटना आपल्या देशाला शोककळेत लोटणारी होती, पण आपले हे न्युज चॅनेल्स... जरा तरी लाज वाटायला हवी यांना... स्मृती पाळणं किंवा जनतेला त्याची जाणीव करून देणं हे यांचं कर्तव्य असतं, पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडलायं कि काय, असा प्रश्न उपस्थित होतो... अन बिचारे, बाहेरील चॅनेल्स (डिस्कव्हरी अन नॅशनल जिओग्राफिक) यांनी यासाठी एवढे कष्ट घेऊन सविस्तरपणे डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवावी... जास्त काही संबंध नसतांनाही... आतातरी आपल्या मिडियाने या चॅनेलांपासून काहीतरी शिकावे, असे मला वाटते... शेवटी हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या भावनेशी निगडित आहे...<br />
<br />
मला त्यावेळी(त्सुनामी आली होती, त्यावेळी) जास्त समज नव्हती, कारण मी तेव्हा त्यामानाने लहान होतो अन आमच्याकडे लाईव्ह न्युज बघायला टिव्ही पण नव्हती... म्हणून मलाही आठवण राहिली नाही... आता उशिरा का होईना, पण आपण सर्वजण मिळून त्यात अनामिकपणे मेलेल्या लाखो जीवांना श्रद्धांजली अर्पण करू...<br />
<br />
जय हिंद...Unknownnoreply@blogger.com8