संबोधन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संबोधन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

महाराष्ट्राचा भारत-पाकिस्तान?

» शनिवार, १६ जानेवारी, २०१०

तेलंगानाचा मुद्दा गेल्या दिड-दोन महिन्यांपासून खुपच गाजतोय. या तेलंगानाच्या विभक्त करण्याच्या मुद्दयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही याच प्रकारची हवा वाहतांना दिसतेय. कोणाला याविषयी जास्त माहिती नसल्याने बहुतेकजण या मुद्दयाला टाळतांना दिसताहेत. मलाही याविषयाशी निगडित जराशीही माहिती नाही की का विदर्भाला विभक्त करण्याची मागणी जोर धरतेय ते... पण माझा या गोष्टीला विरोध आहे. मी मराठवाड्यातला आहे, पण मला नाही वाटत की स्वतंत्र विदर्भ असावा म्हणून....

२०१० हे महाराष्ट्रासाठी स्वर्णमहोत्सवी वर्ष आहे. शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने आपला संयुक्त महाराष्ट्र १ मे, १९६० ला निर्माण झाला. त्यावेळी जर या वीरमरण आलेल्या मराठी भूमीपुत्रांना ही गोष्ट माहित असती की  आपण ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढतोय तोच महाराष्ट्र भविष्यात फाळणीकरता फासावर चढवला जाईल, तर नक्कीच त्यांनी आपले प्राण कदापि दिले नसते. आजवरच्या या घडामोडी पाहता त्यांचे प्राण व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल. यापासून असा बोध घ्यावा का की यापुढे आपल्या लोकांसाठी काहीच करू नये, कारण तीच लोकं भविष्यात आपल्याच पाठीत खंजीर खुपसतात. आज ज्या कोणी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरलिय, ते बहुतेकजण विदर्भातील आहेत. त्यात काही उच्च-पदस्थ नेते-मंडळी ते सर्वसाधारण रहिवासी यांचा समावेश आहे.

नविन वर्ष - माझं रीझोल्युशन...

» शुक्रवार, १ जानेवारी, २०१०

दोन दिवसांपासून मी जरा खुपच घाईत(गरबडीत) होतो, अन आता सुद्धा आहे. कारण तसं फॅमिलीशी मॅटरशी संबंधित आहे. असो... माझ्या मागील वर्षांच्या आठवणी (अमुल्य??? किंवा असतीलच असेही नाही...!) ३१st ला शेअर करण्याची संधी यावेळी तरी मी गमावली, कारण मी अगोदरच त्यावर लिहून ठेवायला हवं होतं.. एक-अर्धा जण चुकून तरी माझ्या या ब्लॉगकडे फिरकलं असेलच, या आशेने की या पोराने काहीतरी लिवलं असेल म्हणून... पण...

काल रात्री मी घराबाहेर होतो, मामांच्या घरी, मामांच्या मुलासोबत कालची ३१st ची रात्र मी सेव्हन अप च्या बर्फ झालेल्या बाटलीवर सेलिब्रेट केली. असो, असं सेलिब्रेशनही मी पहिल्यांदाच करत होतो, कारण याअगोदर तरी मी कधीच ३१ला घराबाहेर पडलो नव्हतो. रात्री डोक्यात विचार येत होते की आपण ३१ला नेमकं काहीतरी संकल्प नक्कीच करूया. ठरलं, रात्री २ नंतर जेव्हा फटाक्यांचा आवाज कमी झाला तेव्हा माझ्या डोक्यात असंख्य विचार येत होते.(आश्चर्य वाटतंय की मला अजुनही आठवतंय!!) सर्वात पहिले तर माझ्या आयटी फिल्ड संबंधित मी खुप विचार केला.. शेवटी माझं लक की मला आयटी मिळाली, कारण मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी आयटीतच जाणार हे पक्कं केलं होतं, तसं झालंही. पुढच्या पायर्‍या तर मला स्वतःच पार करणं आहेत... नंतर इतिहास, अन शेवटी सध्याचा अन या नविन वर्षातला सर्वात मोठा प्रश्न "दुष्काळ" हा माझ्या नजरेसमोर आला. आतापर्यंत मी अनुभवलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेल्यावरून या टॉपिकशी रीलेटेड सर्व गोष्टींबाबत मी माझ्या मानाने खुप विचार केला. मला डोकं दुखणं म्हणजे काय हे अजुनही कळलेलं नाहिये, म्हणून बहुतेकांना होणारा प्रॉब्लेम मला अडवत नव्हता.

२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडला की काय??

» सोमवार, २८ डिसेंबर, २००९

परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच  चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी पहाट, ’अ’पासून ’ज्ञ’पर्यंत सर्व माहिती बघितली, फक्त डिस्कव्हरी अन नॅट जिओवर... नाताळाच्या अन ३१st च्या रंगात लोक आनंदात होते, पण सुमात्रा बेटांजवळ झालेल्या टेक्टॉनिक प्लेटांच्या ओव्हरलॅपिंगमुळे व त्यामूळे निर्माण झालेल्या भूकंपामुळे (सलग ७ मिनिटे चालला होता हा भूकंप - रिश्टर स्केलवर याची तिव्रता ९.५ एवढी मोजली गेली होती...!), हिंदी महासागरात सुमारे १६०० किमी एवढा भुखंड चिरत गेला.... अन त्यामूळे निर्माण झालेल्या ९ ते १० मजली इमारतींएवढ्या उंच लाटांनी लाखो लोकांचे प्राण घेतले...

दोन्ही चॅनेलांवर यावरील डॉक्युमेण्ट्री फिल्म्स रात्री ९ ते ११ (दोन तास) चालू होत्या, पण कुठलेच न्युज चॅनेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा अन्य कोणतेही... कूठेच याविषयी "ब्र"सुद्धा बघायला तर सोडाच, ऐकायलाही मिळाला नाही... घटना आपल्या देशाला शोककळेत लोटणारी होती, पण आपले हे न्युज चॅनेल्स... जरा तरी लाज वाटायला हवी यांना... स्मृती पाळणं किंवा जनतेला त्याची जाणीव करून देणं हे यांचं कर्तव्य असतं, पण त्यांना त्या गोष्टीचा विसर पडलायं कि काय, असा प्रश्न उपस्थित होतो... अन बिचारे, बाहेरील चॅनेल्स (डिस्कव्हरी अन नॅशनल जिओग्राफिक) यांनी यासाठी एवढे कष्ट घेऊन सविस्तरपणे डॉक्युमेण्ट्री फिल्म बनवावी... जास्त काही संबंध नसतांनाही... आतातरी आपल्या मिडियाने या चॅनेलांपासून काहीतरी शिकावे, असे मला वाटते... शेवटी हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या भावनेशी निगडित आहे...

मला त्यावेळी(त्सुनामी आली होती, त्यावेळी) जास्त समज नव्हती, कारण मी तेव्हा त्यामानाने लहान होतो अन आमच्याकडे लाईव्ह न्युज बघायला टिव्ही पण नव्हती... म्हणून मलाही आठवण राहिली नाही... आता उशिरा का होईना, पण आपण सर्वजण मिळून त्यात अनामिकपणे मेलेल्या लाखो जीवांना श्रद्धांजली अर्पण करू...

जय हिंद...

पेट्रोल महागलं हो!

» शनिवार, ४ जुलै, २००९


अवघे १०० दिवस पुर्ण केलेल्या नपुंसक सरकारची कमजोरी त्यांनी आज पुन्हा दाखवली तर...! यात नवल तरी काय म्हणा...!

देशद्रोही काँग्रेसी गांधी घराण्याने भारताला जे मागासत ठेवले आहे त्याची आज पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती केली.

मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत १६० डॉलर प्रति बॅरेल वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल एवढे घसरले होते (त्यावेळी डॉलरमागे फक्त ३९ एवढेच रूपये मोजावे लागत होते), आठवतयं ना! आणि हो त्यावेळी पेट्रोलचा भारतातील भाव अंदाजे ४५ रूपये प्रति लिटर एवढा होता.
म्हणजे अंदाजे ३००% (१६० वरून ३९ डॉलर प्रति बॅरेल) भाव घसरून सुद्धा आपल्या नासमजंस काँग्रेसी सरकारने का त्यावेळीच पेट्रोल व इतर तेलांचे भाव त्यापटीने कमी केले नाही? काय झोपले होते की मेले होते ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवडा (बेवडाच म्हणा की त्या नपुंसकाला)....? अहो १ रूपयाने तरी किमती कमी कराव्यात की नाही हो त्या बावळटाने? पण नाही, त्यांचा घसा कोरडाच हो .......!!!

काही दिवसांत पुन्हा आश्वासनांचा पाऊस (यावर्षीचा मॉन्सूनचा पाऊस तर कोरडाच गेला हो) म्हणजे नविन वित्तिय बजेट आपले नपुंसक सरकार सादर करणार, तेवढ्यात आज ही बातमी, याचा अर्थ असाच होतो ना की आज किमती वाढल्या त्या बजेटच्या वेळी कमी (४ रूपये नव्हे तर २ रूपये तरी समजा) केल्या जातील व जनतेच्या उघड्या डोळ्यांत सरकार भुरळ पाडण्यास यशस्वी होईल.


"जय महाराष्ट्र ! करा कष्ट अन् खा उष्ट-पाष्टं ! "

»


काय मित्रहो, मजेत ना की...!
तसा जरा तुम्हां वाचकांवर जरा नाराज आहे, कारण माझ्या यापूर्वीच्या "मी शिवाजीराजे"ला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला, हो पण सबब पण तशीच होती, माझं मराठी काही एवढं सुसंस्कृत नाहिये हं!
बरं, पण माझा लेखन करण्याचा छंद तरी मला जोपासायला हवाच ना, त्याकरिता मी हा नविन लेख लिहितोय, महाराष्ट्राच्या वर्तमान हवामानाचा आढावा!


तर मित्रांनो, आपला प्रिय महाराष्ट्र देश नेमक्या कोणत्या परिस्थितींशी व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंटकांशी झुंज देत आहे व त्यामुळे कसा पिछाडीवर पडला आहे, हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आपल्याला असेलच, त्यात नवल तरी काय हो, प्रत्येक मराठी माणूस हेच अनुभवतोय आजच्या घडीला!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, शेकडो हुतात्म्यांचे सांडलेले रक्त अखेर कामी आले. मुंबईसारखी आर्थिकदृष्ट्या प्रबल व सर्वगुणसंपन्न अशी राजधानी मिळाली. भाषावर रचना झाल्यामुळे शिवरायांची मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच वाटले होते त्या काळी, पण आता मला तरी तसे वाटत नाही राव!

कारण माझ्यामते तरी महाराष्ट्र हा अजुनसुद्धा सार्विकदृष्ट्या मागासलेलाच आहे. अहो महाराष्ट्राला कशाची कमी आहे, हं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र खूपच प्रगतिशील राज्य आहे भारतातील, अहो फक्त भारतातलचं ना! जगाशी तुलना करता आपली लायकी पण नाही, हे म्हणायची की आमचा देश किंवा राज्य १९२० पर्यंत सर्व दृष्टीने महासत्ता बनेल म्हणून!


हो तर मी म्हणत होतो की महाराष्ट्राला कमी तरी कशाची आहे, अहो माझ्यामते दीडदमडीची सुद्धा नाही! दीड हजार किमीचा अरूंद असा समुद्रकिनारा, दख्खन पठारी मैदानी माळरान, सह्याद्रिच्या अखंड पर्वतरांगा ही झाली प्राकृतिक रचना, ना कुठे वाळवंट अन् ना कुठे हिमभाग, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल महाराष्ट्राला!


१ मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

»


जय महाराष्ट्र मित्रांनो...!

आगामी १ मे दिनाच्या आपणा सर्व मराठी बाधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा लेख लिहित आहे.

दरवर्षी आपण शिवजयंती (१ नाही तर ३ वेळा) अगदी धुमधामात साजरी करतो, पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असे काहीच वातावरण दिसत नाही, ना जास्त काही कार्यक्रम योजिले असतात, ना काही समारंभ असतात.

जाऊ द्या, माझ्यामते यंदा तरी महाराष्ट्र दिन अत्यंत धूमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे दिसताहेत. त्याला कारण पण तसेच आहे ना हो...

मा. राजसाहेबांनी जसे यूपीवाल्यांना त्यांचा राज्यदिन, सण वगैरे त्यांच्याच राज्यात साजरे करण्याची ताकिद दिली होती, त्यामुळे यंदा मनसे कडून महाराष्ट्र दिनाचा सोहळा पाहण्यासारखा असेल.
तसेच शिवसेनेकडूनही त्याचप्रकारच्या अपेक्षा असतील आपल्या...


Vishal Telangre