महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाणी डोक्यावरून गेलंय आता...!

» रविवार, ७ फेब्रुवारी, २०१०

स्वतंत्र भारताच्या संविधानाने भारतवर्षाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, हे पुन्हा सांगावे लागू नये व माझ्या अश्या पोस्ट्सवर कसलीही बंधने येऊ नयेत, यासाठी आधीच हे नमूद करतो. पण आजकाल या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे भरपूर लोकं नजरेस पडताहेत. काय या लोकांना लोकशाही नकोशी झाली आहे (तसं लोकशाही पद्धती असण्यावर माझासुद्धा विरोध आहे.), या लोकांना अगदीच माज चढलाय की यांचा महाराष्ट्र या एकाच प्रांतावर तिरपा डोळा आहे...??? या प्रश्नांना या नेतेमंडळींकडूनच उत्तरे मिळाली तर माझ्या महाराष्ट्राला या सुवर्णमहोत्सवी वर्षातही पीडत असेलेले बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतील, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक म्हणून मला ज्या गोष्टींबद्दल आक्षेप आहे, त्या मी या ब्लॉगच्या स्वरूपाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कित्येकांचा मी मांडलेल्या मुद्द्यांवरही आक्षेप असू शकतो, पण चर्चेने हा विषय-लेख बराचसा परिणामकारक होईल अशी आशा आहे. वाचकांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीने प्रतिक्रिया नोंदवावी.

माझे मुद्दे, आक्षेप, सुचना इत्यादी खालीलप्रमाणे:

१) संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुमारे १०५ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कसलीही तमा न बाळगता संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी (मराठीभाषिकांना एकत्र करण्यासाठी) "संयुक्त महाराष्ट्र लढा" चालू केला, अन आपल्या प्राणांची आहूती देऊन (त्यांचे प्राण कसे व का गेले, कोणी घेतले, त्यांच्या हत्यांमागचा मुख्य सुत्रधार कोण या गोष्टी अजुनही सामान्य मराठी माणसाला अज्ञातच आहेत.) संयुक्त १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . हे वर्ष त्यांच्या बलिदानाचे ५०वं वर्ष, पण आपल्या नेत्यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाला थोडी जरी लाज, शरम असती तर भव्य अन दिव्य असे कार्यक्रम आणि उत्सव साजरी केले असते. नाही काही तर हुतात्म्यांच्या मागासलेल्या व सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या परिवारांना भरघोस आर्थिक मदत तरी देऊ केली असती. पण जिंकल्याचा माज सध्याच्या सरकारकडून सध्या तरी उतरेल, असं दिसत नाही. आपण आपल्या खिशातून सरकारच्या तिजोरीत पैसे खाली करतो तो अशा सदुपयोगी अन समाजपयोगी कामांसाठीच ना....! नेतेमंडळी १ मे ची वाट पाहत असणार... १ मे ला सकाळी १०-११च्या सुमारास प्रत्येक शासकिय कार्यालयात झेंडावंदन करायचं... अन बाकी काय, झाला महाराष्ट्र दिन साजरी...

मराठीत लिहिणे अगदी सोपे.......!!!

» रविवार, १२ जुलै, २००९

आता माहितीजालावर मराठीत लिहिणे अगदी सोपे झाले आहे ना की विचारूच नका, तरी सुद्धा काही लोकं नुसते विचारत राहतात की मी देवनागरी लिपीमध्ये कसे लिहू?
तुम्हाला सांगतो, अहो आता कुठेही सहजच मराठीमध्ये लिहिता येऊ शकते! त्याला कारण पण तसेच आहे, आपल्या मराठी भूमीत एवढे मौल्यवान रत्न तयार होत आहेत, ज्यांच्या नसल्यामुळे कदाचित आजचे जग जरा वेगळेच (मागासलेलेच म्हणा ना!) दिसले असते! त्यांच्यासाठीच बहुतेक जगानेच मराठी जणांना हा सन्मान देऊ केलाय जणू...!
तर मी तुम्हाला सांगत होतो की मराठीत आता नेटवर कसे लिहायचे ते?
खुप साधे आणि सोपे पर्याय नेटवर उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत, आपण ते सर्व किंवा आपल्या गरजेप्रमाणे थोडेफार वापरू शकता :

"जय महाराष्ट्र ! करा कष्ट अन् खा उष्ट-पाष्टं ! "

» शनिवार, ४ जुलै, २००९


काय मित्रहो, मजेत ना की...!
तसा जरा तुम्हां वाचकांवर जरा नाराज आहे, कारण माझ्या यापूर्वीच्या "मी शिवाजीराजे"ला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला, हो पण सबब पण तशीच होती, माझं मराठी काही एवढं सुसंस्कृत नाहिये हं!
बरं, पण माझा लेखन करण्याचा छंद तरी मला जोपासायला हवाच ना, त्याकरिता मी हा नविन लेख लिहितोय, महाराष्ट्राच्या वर्तमान हवामानाचा आढावा!


तर मित्रांनो, आपला प्रिय महाराष्ट्र देश नेमक्या कोणत्या परिस्थितींशी व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंटकांशी झुंज देत आहे व त्यामुळे कसा पिछाडीवर पडला आहे, हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आपल्याला असेलच, त्यात नवल तरी काय हो, प्रत्येक मराठी माणूस हेच अनुभवतोय आजच्या घडीला!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, शेकडो हुतात्म्यांचे सांडलेले रक्त अखेर कामी आले. मुंबईसारखी आर्थिकदृष्ट्या प्रबल व सर्वगुणसंपन्न अशी राजधानी मिळाली. भाषावर रचना झाल्यामुळे शिवरायांची मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच वाटले होते त्या काळी, पण आता मला तरी तसे वाटत नाही राव!

कारण माझ्यामते तरी महाराष्ट्र हा अजुनसुद्धा सार्विकदृष्ट्या मागासलेलाच आहे. अहो महाराष्ट्राला कशाची कमी आहे, हं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र खूपच प्रगतिशील राज्य आहे भारतातील, अहो फक्त भारतातलचं ना! जगाशी तुलना करता आपली लायकी पण नाही, हे म्हणायची की आमचा देश किंवा राज्य १९२० पर्यंत सर्व दृष्टीने महासत्ता बनेल म्हणून!


हो तर मी म्हणत होतो की महाराष्ट्राला कमी तरी कशाची आहे, अहो माझ्यामते दीडदमडीची सुद्धा नाही! दीड हजार किमीचा अरूंद असा समुद्रकिनारा, दख्खन पठारी मैदानी माळरान, सह्याद्रिच्या अखंड पर्वतरांगा ही झाली प्राकृतिक रचना, ना कुठे वाळवंट अन् ना कुठे हिमभाग, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल महाराष्ट्राला!


१ मे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

»


जय महाराष्ट्र मित्रांनो...!

आगामी १ मे दिनाच्या आपणा सर्व मराठी बाधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा लेख लिहित आहे.

दरवर्षी आपण शिवजयंती (१ नाही तर ३ वेळा) अगदी धुमधामात साजरी करतो, पण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असे काहीच वातावरण दिसत नाही, ना जास्त काही कार्यक्रम योजिले असतात, ना काही समारंभ असतात.

जाऊ द्या, माझ्यामते यंदा तरी महाराष्ट्र दिन अत्यंत धूमधडाक्यात साजरा होण्याची चिन्हे दिसताहेत. त्याला कारण पण तसेच आहे ना हो...

मा. राजसाहेबांनी जसे यूपीवाल्यांना त्यांचा राज्यदिन, सण वगैरे त्यांच्याच राज्यात साजरे करण्याची ताकिद दिली होती, त्यामुळे यंदा मनसे कडून महाराष्ट्र दिनाचा सोहळा पाहण्यासारखा असेल.
तसेच शिवसेनेकडूनही त्याचप्रकारच्या अपेक्षा असतील आपल्या...


Vishal Telangre