माहितीपर लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माहितीपर लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाणी डोक्यावरून गेलंय आता...!

» रविवार, ७ फेब्रुवारी, २०१०

स्वतंत्र भारताच्या संविधानाने भारतवर्षाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, हे पुन्हा सांगावे लागू नये व माझ्या अश्या पोस्ट्सवर कसलीही बंधने येऊ नयेत, यासाठी आधीच हे नमूद करतो. पण आजकाल या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणारे भरपूर लोकं नजरेस पडताहेत. काय या लोकांना लोकशाही नकोशी झाली आहे (तसं लोकशाही पद्धती असण्यावर माझासुद्धा विरोध आहे.), या लोकांना अगदीच माज चढलाय की यांचा महाराष्ट्र या एकाच प्रांतावर तिरपा डोळा आहे...??? या प्रश्नांना या नेतेमंडळींकडूनच उत्तरे मिळाली तर माझ्या महाराष्ट्राला या सुवर्णमहोत्सवी वर्षातही पीडत असेलेले बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतील, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक म्हणून मला ज्या गोष्टींबद्दल आक्षेप आहे, त्या मी या ब्लॉगच्या स्वरूपाने जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. कित्येकांचा मी मांडलेल्या मुद्द्यांवरही आक्षेप असू शकतो, पण चर्चेने हा विषय-लेख बराचसा परिणामकारक होईल अशी आशा आहे. वाचकांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीने प्रतिक्रिया नोंदवावी.

माझे मुद्दे, आक्षेप, सुचना इत्यादी खालीलप्रमाणे:

१) संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुमारे १०५ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कसलीही तमा न बाळगता संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी (मराठीभाषिकांना एकत्र करण्यासाठी) "संयुक्त महाराष्ट्र लढा" चालू केला, अन आपल्या प्राणांची आहूती देऊन (त्यांचे प्राण कसे व का गेले, कोणी घेतले, त्यांच्या हत्यांमागचा मुख्य सुत्रधार कोण या गोष्टी अजुनही सामान्य मराठी माणसाला अज्ञातच आहेत.) संयुक्त १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . हे वर्ष त्यांच्या बलिदानाचे ५०वं वर्ष, पण आपल्या नेत्यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाला थोडी जरी लाज, शरम असती तर भव्य अन दिव्य असे कार्यक्रम आणि उत्सव साजरी केले असते. नाही काही तर हुतात्म्यांच्या मागासलेल्या व सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या परिवारांना भरघोस आर्थिक मदत तरी देऊ केली असती. पण जिंकल्याचा माज सध्याच्या सरकारकडून सध्या तरी उतरेल, असं दिसत नाही. आपण आपल्या खिशातून सरकारच्या तिजोरीत पैसे खाली करतो तो अशा सदुपयोगी अन समाजपयोगी कामांसाठीच ना....! नेतेमंडळी १ मे ची वाट पाहत असणार... १ मे ला सकाळी १०-११च्या सुमारास प्रत्येक शासकिय कार्यालयात झेंडावंदन करायचं... अन बाकी काय, झाला महाराष्ट्र दिन साजरी...

ब्लॉगरवरील "टॉप नेव्हिगेशन बार (Navbar)" कशी लपवावी आणि काढून टाकावी?

» मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

ब्लॉगरच्या "XXX.ब्लॉगस्पॉट.कॉम" डोमेनवर किंवा ब्लॉगरने होस्ट केलेल्या पण कस्टम डोमेन असलेल्या साईटवर ब्लॉग तयार केल्यानंतर तेथे ब्लॉगच्या सर्वात वर नॅव्हबार किंवा नेव्हिगेशन बार किंवा बॅनर दिसते. या नॅव्हबार वर "सर्च ब्लॉग" टेक्स्टबॉक्स, "फ्लॅग ब्लॉग" - अपरिहार्य ब्लॉग कन्टेन्ट बद्दल सुचित करण्यासाठी, "पुढील ब्लॉग" - ब्लॉगरवरील दुसर्‍या एखाद्या ब्लॉगला भेट देण्यासाठीची रॅण्डम लिंक येथे असते, तसेच नविन ब्लॉग तयार करण्यासाठी आणि साइन इन साठीच्या लिंक्स या नॅव्हबार असतात. (खालील प्रतिमा पहा.)



तुमच्या साईटला/ब्लॉगला भेट देणार्‍या बहुतेकांना ती नॅव्हबार मुळीच उपयोगी ठरत नाही. उलट त्या बारमुळे तुमचा ब्लॉग विचित्र दिसतो किंवा त्या बारसाठी अनावश्यक जागा गेलेली असते. पण तुमच्या ब्लॉग टेम्प्लेटच्या CSS मध्ये थोडेफार बदल करून तुम्ही ती नॅव्हबार, तुमच्या ब्लॉगवर लपवू शकता. हे अगदी १ मिनिटात होणारे आहे आणि यात अवघड असे काहीही नाही.

जळगावची सफर - पद्मालय

» शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून छोट्या भाऊजींनी आम्हां दोघांना मोठ्या भाऊजींकडे नेले. तेथे माझी मोठी ताई ऑल्रेडि शेतात गेलेली होती व मोठे भाऊजी घरासमोरील छोट्याश्या बदामीच्या झाडाला कूंपन करीत होते. त्यावेळी मस्त ऊन पडले होते, दूपार होती ना.....! त्यातच अर्धा तास किंवा जरा जास्तच वेळ गेला. फूल जेवण अन त्यातच ते गोड होतं, त्यामूळे मी, गौरव अन छोटे भाऊजी, तिघांनाही सुस्ती आली, अन तिघेही तिथेच जरासं लोळलो...(!) मोठ्या भाऊजींचे जेव्हा काम आटोपले, तेव्हा बहुतेक दुपारचा सव्वा झालेला असावा. लगेच त्यांनी एकदम फास्ट मध्ये आम्हाला उठवलं अन फ्रेश होऊन पटकण रेडी व्हायचं सांगितलं. आम्ही घाई-घाईत रेडी झालो अन जायला निघालो. गौरव छोट्या भाऊजींच्या (प्रविण भाऊजींच्या) तर मी मोठ्या (अनिल भाऊजींच्या) गाडीवर पाठीमागे बसलो. एक गोष्ट सांगायची राहिलीच, हसू नका, कारण मला अजुनही गाडी चालवता येत नाही......! त्यामूळे भाऊजींच्या हातातून गाडी घेण्याचा प्रश्नच नव्हता, बस्स... पाठीमागे बसून आपलं चुप-चाप बसायचं अन ऐश करायची, ती पण अगदी आरामात.....!

आम्ही "शिरसोली"ला (ता/जि. जळगाव) होतो, ते जळगावपासून १० किमी लांब होते. अन "पद्मालय" (ता. एरंडोल, जि. जळगाव) हे जळगावपासून ४०-४२ किमी दूर आहे. म्हणजे आम्हाला तरी पण ३० ते ३२ किमी जायचे होते. जातेवेळी रस्त्यात गाडी पेट्रोलची टंकी फुल केली. साला रस्ता एकदम हाय-वे टाईप अन रस्त्यावर एवढी वर्दळ पण नव्हती, पण प्रविण भाऊजींची "हिरो होंडा करिज्मा" ३०-४०kmph च्या पुढे जातच नव्हती, अन अनिल भाऊजींची (ज्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो), "हिरो होंडा स्प्लेण्डर प्लस" ७०-८०kmph या स्पीडने पळत होती. आम्ही पाच-पाच मिनिटांनी मागे वळून पाहू, तर ते आम्ही एखाद्या ठिकाणी थांबल्यावर दहा-एक मिनिटांनी दिसत होते, अन गाडी चालवत असतांना तर ते आम्हांला दिसतच नव्हते, एवढी त्यांची करिज्मा "फास्ट" पळत होती.....!


ब्लॉगला 'Favicon' प्रतिमा जोडण्यासाठी मार्गदर्शन...

» गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

काय तुम्ही तुमच्या ऍड्रेसबारवर तुमच्या ब्लॉगच्या/साइटच्या अगोदर ब्लॉगरच्या लोगो ऐवजी तुमचा स्वतःचा लोगो, फोटो लावू इच्छिता, जसे की खालील प्रतिमेत दिसतयं....?
 
ठिक आहे, या अशा लोगोला फ़ेविकॉन (Favicon) लोगो म्हणतात. तो टाकण्यासाठी तुमच्या डॅशबोर्डवरून टेम्प्लेट टॅबवरून एडिट HTML मध्ये जाऊन विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड करून घ्या. त्यानंतर ते टेम्प्लेट डाऊनलोड करून बॅक-अप साठी जतन करून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला नंतर वाटलं की काहीतरी चुकतयं, तेव्हा ते पुन्हा अपलोड करू शकाल.
बरं आता तुमच्या ब्राऊजरमध्ये 'ctrl+F' ही की दाबून पुढील कोड शोधा:
<title><data:blog.pageTitle/></title>

आता त्याखाली लगेच पुढीलपैकी कोणताही एक कोड टाका:


"Add Page Element" तुमच्या ब्लॉगरच्या हेडरला जोडायचे आहे ?

» बुधवार, १६ सप्टेंबर, २००९

नमस्कार मित्रहो, तुम्ही बघितले असेल की, तुमच्या ब्लॉगरच्या लेआउट -> Page Elements (पृष्ठ घटक) येथे तुमच्या ब्लॉगच्या साइडबार आणि फुटर ला पेज एलिमेण्ट्स जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. पण, असे असले तरी तेथे हेडर आणि ब्लॉग पोस्ट्स साठी मात्र असे पर्याय उपलब्ध नसतात. या ठिकाणी पेज एलिमेण्ट चे ऑप्शन असणं हे खुप महत्वाचं आणि फायदेशिर ठरू शकतं. कारण, तुम्ही अशावेळी तुमच्या ब्लॉगच्या टॉपला प्रतिमा जोडू शकता, किंवा तुमच्या ब्लॉग पोस्ट्सच्या टॉप किंवा बॉटमला गुगल ऍडसीन जाहीरात लावू शकता. तेव्हा तुम्हाला हे सर्व करण्यासाठी खालील माहीती नक्कीच उपयोगी पडेल. मी ही ट्रिक सक्सेसफुली युज करून बघितली आहे, त्यामुळे कोडमध्ये फॉल्ट असणं किंवा त्रुटी उद्भवण्याचा तर प्रश्नच नाही....!

"Add a Page Element" हे ऑप्शन असण्यासाठी, तुमच्या डॅशबोर्ड वरून "Template" किंवा लेआउट मधील "Edit HTML" ही टॅब क्लिक करा. तुमच्या ब्लॉग टेम्प्लेट कोड मध्ये काहीही बदल करण्याअगोदर टेम्प्लेट डाउनलोड करून विशिष्ट जागी जतन करून ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला केलेले बदल नको हवे असतील तर ते टेम्प्लेट तुम्ही पुन्हा अपलोड करून वापरू शकता. बरं, आता तुमच्या "Expand Widget Template" हे केलेले आहे का ते प्रथम पाहून घ्या, जर तुम्ही विजेट टेम्प्लेट एक्स्पाण्ड नाही केले, तर कदाचित तुम्हाला खाली दिलेले काही कोड्स सापडणार नाहीत, तेव्हा सर्वप्रथम याची दक्षता घ्या. आणि सर्वात महत्वाची सुचना म्हणजे जोपर्यंत सर्व बदल होत नाहीत तोपर्यंत टेम्प्लेट जतन करू नका, प्रिव्ह्यू (पुर्वावलोकन) मात्र पाहू शकता.

ठिक आहे, तर आता पुढे दिलेल्या काही कोडिंग लाइन्स तुमच्या ब्राउजर मध्ये "ctrl+F" ही की दाबून शोधा, किंवा पहिलीच लाइन शोधली तरी चालेल.


सौर ऊर्जेपासून वीजनिर्मीती

» रविवार, १३ सप्टेंबर, २००९

नविनच संकल्पना असलेला हा प्लान्ट आहे. सन १९७०-८० मध्ये या प्रकल्पावर संशोधन चालू होते. मध्यंतरी त्यावर दुर्लक्ष देखील झाले. पण वीस वर्षांनंतर एकविसाव्या शतकात वीजेची पुरती गरज भागवणारा हा एक्स्ट्रीम प्लान्ट पर्वणीच म्हणावा लागेल.

सध्या तरी दगडी कोळसा वापरून आणि इरिगेशन प्रकल्पांद्वारे वीजेची निर्मिती आपण तयार होतांना बघतो आहोत. आपल्या घराला मिळणारी वीज देखील हीच तर आहे ना ! माहीत असेलच, त्यात काय नवल ? बहुतेक जणांना तर हे पण माहीत असेल, की गेल्या दोन ते तीन दशकांपासून अणुऊर्जेद्वारे देखील वीजनिर्मितीवर संशोधनाला जोर येतोय.

पण आता तुम्ही पुढे जे काय वाचणार आहात, ते देखील तुमच्या किंचित परिचयाचे असेल. हो, सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करणे. शालेय काळात कुठे तरी वाचले किंवा ऐकले तरी असेलच ! काय, तुम्हाला वाटतयं तेवढं बिल्कुल सोपं नाही हे काम, म्हणूनच तर १९७०-८० नंतर आता कुठे याची चुणुक दिसते आहे. कारण विचाराल तर एक नव्हे किती असे विचारावे लागेल, आहेच हो तेवढी कारणे ! एक तर पहिल्यांदाच अशा नविनतम प्रकल्पाची संकल्पना मांडणे (मग त्यात किंवा नंतर, प्रथम संशोधन, आणि मग निकाल ऍप्रुव्ह्ड किंवा अन-ऍप्रुव्ह्ड...!), आणि जर ऍप्रुव्ह्ड केला गेला त्यानंतर देखील प्रकल्पासाठी जागा, नविनच साधन सामग्री (अद्याप तयारच न झालेली), निष्ठावान कर्मचारी, कामगार, प्लान्ट साइट पर्यंत दळण-वळणाची साधने व मार्ग, आणि याहूनही सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अर्थ-सहाय्य...(पैसा हो !), आणि या सर्व गोष्टींचा पाठ-पुरवठा करणारे त्या राष्ट्राचे शासन नेमकी काय भूमिका घेते ही प्रामुख्याने भेडसावणारी कारणे असतात. आणि ही सर्व कारणे प्रत्येक नविन प्रकल्पाला भेडसावत असतात, हे तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण हा प्लान्ट इतरांप्रमाणे तर नक्कीच नाही, कारण यासमोर सर्वात मोठी समस्या आहे (अजुनही आहेच), ती म्हणजे  एवढं काही करून OUTPUT काय मिळणार?

संकल्पना

सुर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा मोठाल्या खास बनवलेल्या सोलार पॅनेल्स वर एकवटून त्यापासून वाफेची निर्मीती करून व त्याद्वारे टर्बाइन्स फिरवून वीजनिर्मिती करणे.

कार्य-प्रणाली

प्रती मैल प्रती कॅपिटा हजारो ज्युल ऊर्जा प्रती सेकंदाला जमिनीवर वाया जाते. (विनाकारण...!) अशा परिस्थितीत ही ऊर्जा आपल्या निजी कामासाठी वापरली जावी अशी प्रत्येकाला अपेक्षा असेल. आजची स्थिती पाहता, वीज महावितरण कंपनीला वीज महाभारनियमन म्हणण्याची वेळ आली आहे. एवढी वीजटंचाई असताना या प्रकारच्या धाडसी प्रकल्पाबद्दल कोणाचीही उत्सुकता शिगेला पोहोचण्यात काही वावगे नाही.

तर या प्रकल्पाचे कन्स्ट्रक्शन करताना प्रथम जागेचा विचार करावा लागेल, तो त्या जागेची सभोवतालची तसेच भौगोलिक माहिती मिळवावी लागेल. साधारणतः प्रकल्पास अशी जागा लागेल, जेथे वर्षभर पुष्कळ सुर्यप्रकाश मिळण्यास काहीही अडचण येणार नाही. योग्य ओळखले, रेगिस्तानच (वाळवंट हो !) योग्य...! ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेच्या न्युयॉर्क नजिकच्या परिसरात हा प्लान्ट रेडी टू युज आहे...


मराठीत लिहिणे अगदी सोपे.......!!!

» रविवार, १२ जुलै, २००९

आता माहितीजालावर मराठीत लिहिणे अगदी सोपे झाले आहे ना की विचारूच नका, तरी सुद्धा काही लोकं नुसते विचारत राहतात की मी देवनागरी लिपीमध्ये कसे लिहू?
तुम्हाला सांगतो, अहो आता कुठेही सहजच मराठीमध्ये लिहिता येऊ शकते! त्याला कारण पण तसेच आहे, आपल्या मराठी भूमीत एवढे मौल्यवान रत्न तयार होत आहेत, ज्यांच्या नसल्यामुळे कदाचित आजचे जग जरा वेगळेच (मागासलेलेच म्हणा ना!) दिसले असते! त्यांच्यासाठीच बहुतेक जगानेच मराठी जणांना हा सन्मान देऊ केलाय जणू...!
तर मी तुम्हाला सांगत होतो की मराठीत आता नेटवर कसे लिहायचे ते?
खुप साधे आणि सोपे पर्याय नेटवर उपलब्ध आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत, आपण ते सर्व किंवा आपल्या गरजेप्रमाणे थोडेफार वापरू शकता :

"जय महाराष्ट्र ! करा कष्ट अन् खा उष्ट-पाष्टं ! "

» शनिवार, ४ जुलै, २००९


काय मित्रहो, मजेत ना की...!
तसा जरा तुम्हां वाचकांवर जरा नाराज आहे, कारण माझ्या यापूर्वीच्या "मी शिवाजीराजे"ला म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला, हो पण सबब पण तशीच होती, माझं मराठी काही एवढं सुसंस्कृत नाहिये हं!
बरं, पण माझा लेखन करण्याचा छंद तरी मला जोपासायला हवाच ना, त्याकरिता मी हा नविन लेख लिहितोय, महाराष्ट्राच्या वर्तमान हवामानाचा आढावा!


तर मित्रांनो, आपला प्रिय महाराष्ट्र देश नेमक्या कोणत्या परिस्थितींशी व महाराष्ट्रद्वेष्ट्या कंटकांशी झुंज देत आहे व त्यामुळे कसा पिछाडीवर पडला आहे, हे जाणून घेण्याची ऊत्सुकता आपल्याला असेलच, त्यात नवल तरी काय हो, प्रत्येक मराठी माणूस हेच अनुभवतोय आजच्या घडीला!

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, शेकडो हुतात्म्यांचे सांडलेले रक्त अखेर कामी आले. मुंबईसारखी आर्थिकदृष्ट्या प्रबल व सर्वगुणसंपन्न अशी राजधानी मिळाली. भाषावर रचना झाल्यामुळे शिवरायांची मराठी साम्राज्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेच वाटले होते त्या काळी, पण आता मला तरी तसे वाटत नाही राव!

कारण माझ्यामते तरी महाराष्ट्र हा अजुनसुद्धा सार्विकदृष्ट्या मागासलेलाच आहे. अहो महाराष्ट्राला कशाची कमी आहे, हं तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र खूपच प्रगतिशील राज्य आहे भारतातील, अहो फक्त भारतातलचं ना! जगाशी तुलना करता आपली लायकी पण नाही, हे म्हणायची की आमचा देश किंवा राज्य १९२० पर्यंत सर्व दृष्टीने महासत्ता बनेल म्हणून!


हो तर मी म्हणत होतो की महाराष्ट्राला कमी तरी कशाची आहे, अहो माझ्यामते दीडदमडीची सुद्धा नाही! दीड हजार किमीचा अरूंद असा समुद्रकिनारा, दख्खन पठारी मैदानी माळरान, सह्याद्रिच्या अखंड पर्वतरांगा ही झाली प्राकृतिक रचना, ना कुठे वाळवंट अन् ना कुठे हिमभाग, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल महाराष्ट्राला!


Vishal Telangre